मुंबई टाइम्स टीम
लातूरमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना लातूरचा सुपुत्र रितेश देशमुख दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये चांगला पाऊस पडत असून, 'सर्वांसाठी पाणी' अशी टॅगलाईन असलेल्या या मोहिमेला यश मिळू लागलं आहे. त्यामुळे सगळ्यांची मेहनत फळाला आली असून, दुष्काळग्रस्तांसाठीची ही योजना खऱ्या अर्थानं ‘लइ भारी’ ठरली आहे, असं रितेशनं म्हटलं आहे.
लातूरमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना लातूरचा सुपुत्र रितेश देशमुख दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला. आर्थिक मदत देण्याबरोबरच 'जलयुक्त लातूर' या उपक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तो सध्या काम करतोय. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये चांगला पाऊस पडत असून, 'सर्वांसाठी पाणी' अशी टॅगलाईन असलेल्या या मोहिमेला यश मिळू लागलं आहे. त्यामुळे सगळ्यांची मेहनत फळाला आली असून, दुष्काळग्रस्तांसाठीची ही योजना खऱ्या अर्थानं ‘लइ भारी’ ठरली आहे, असं रितेशनं म्हटलं आहे.
या मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून तिथल्या मांजरा नदीचं पात्र खोल करण्यात आलं आहे. त्यामुळे पावसाचं पाणी साठवलं जातंय. लातूरला पुरेसं पाणी मिळावं यासाठी स्थानिकांनी सुरू केलेल्या उपक्रमाला रितेशनंही पाठिंबा दिला. ज्या ठिकाणी ही कामं सुरू होती तिथे भेट देऊन रितेश या कामांची माहिती घेत होता. लातूरला चांगला पाऊस पडतोय. जलयुक्त लातूरतर्फे करण्यात आलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय. वरुण देवतेची अशी कृपा असू द्यावी, असं ट्विट रितेशने केलं आहे.
लातूरमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना लातूरचा सुपुत्र रितेश देशमुख दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये चांगला पाऊस पडत असून, 'सर्वांसाठी पाणी' अशी टॅगलाईन असलेल्या या मोहिमेला यश मिळू लागलं आहे. त्यामुळे सगळ्यांची मेहनत फळाला आली असून, दुष्काळग्रस्तांसाठीची ही योजना खऱ्या अर्थानं ‘लइ भारी’ ठरली आहे, असं रितेशनं म्हटलं आहे.
लातूरमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना लातूरचा सुपुत्र रितेश देशमुख दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला. आर्थिक मदत देण्याबरोबरच 'जलयुक्त लातूर' या उपक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तो सध्या काम करतोय. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये चांगला पाऊस पडत असून, 'सर्वांसाठी पाणी' अशी टॅगलाईन असलेल्या या मोहिमेला यश मिळू लागलं आहे. त्यामुळे सगळ्यांची मेहनत फळाला आली असून, दुष्काळग्रस्तांसाठीची ही योजना खऱ्या अर्थानं ‘लइ भारी’ ठरली आहे, असं रितेशनं म्हटलं आहे.
या मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून तिथल्या मांजरा नदीचं पात्र खोल करण्यात आलं आहे. त्यामुळे पावसाचं पाणी साठवलं जातंय. लातूरला पुरेसं पाणी मिळावं यासाठी स्थानिकांनी सुरू केलेल्या उपक्रमाला रितेशनंही पाठिंबा दिला. ज्या ठिकाणी ही कामं सुरू होती तिथे भेट देऊन रितेश या कामांची माहिती घेत होता. लातूरला चांगला पाऊस पडतोय. जलयुक्त लातूरतर्फे करण्यात आलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय. वरुण देवतेची अशी कृपा असू द्यावी, असं ट्विट रितेशने केलं आहे.