मुंबई:
'कभी कभी लगता है अपुन ही भगवान है' म्हणणारा 'सर्वसक्तीसाली' गणेश गायतोंडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार आहे. नेटफ्लिक्सने 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा सीझन १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केलीय.
'सेक्रेड गेम्स'चा पुढचा सीझन कधी येणार हा प्रश्न गेले अनेक महिने चाहत्यांना सतावत असताना नेटफ्लिक्स इंडियानं दुसऱ्या सीझनचा ट्रेलर अपलोड करत या प्रश्नाचे उत्तर दिलंय. ‘जंग का वक्त आ गया है’, म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देतो. 'क्या ये दुनिया बचाने लायक है' असा प्रश्न विचारणारा हा ट्रेलर या सीझनमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची सफर घडवून आणतो. पहिल्या सीझनमधील कलाकारांसोबत ट्रेलरमध्ये कलकी आणि रणवीर शौरी हे दोन नवे चेहरेदेखील पाहायला मिळतात.
गणेश गायतोंडे असो किंवा सरताज या सगळ्या कलाकारांची गोष्ट पुन्हा एकदा पाहण्यासाठी 'सेक्रेड गेम्स'च्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. या सीझनमध्ये नेमकी कोणती 'जंग' दाखवली जाणार आहे? असं नेमकं काय होणार आहे ज्यामुळे 'सब चले जाएँगे, सिर्फ़ त्रिवेदी बच जाएगा!' असं म्हटलं जातंय. या
२५ दिवसात नेमकं काय घडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या १५ ऑगस्टला मिळणार आहेत.
'कभी कभी लगता है अपुन ही भगवान है' म्हणणारा 'सर्वसक्तीसाली' गणेश गायतोंडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार आहे. नेटफ्लिक्सने 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा सीझन १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केलीय.
'सेक्रेड गेम्स'चा पुढचा सीझन कधी येणार हा प्रश्न गेले अनेक महिने चाहत्यांना सतावत असताना नेटफ्लिक्स इंडियानं दुसऱ्या सीझनचा ट्रेलर अपलोड करत या प्रश्नाचे उत्तर दिलंय. ‘जंग का वक्त आ गया है’, म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देतो. 'क्या ये दुनिया बचाने लायक है' असा प्रश्न विचारणारा हा ट्रेलर या सीझनमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची सफर घडवून आणतो. पहिल्या सीझनमधील कलाकारांसोबत ट्रेलरमध्ये कलकी आणि रणवीर शौरी हे दोन नवे चेहरेदेखील पाहायला मिळतात.
गणेश गायतोंडे असो किंवा सरताज या सगळ्या कलाकारांची गोष्ट पुन्हा एकदा पाहण्यासाठी 'सेक्रेड गेम्स'च्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. या सीझनमध्ये नेमकी कोणती 'जंग' दाखवली जाणार आहे? असं नेमकं काय होणार आहे ज्यामुळे 'सब चले जाएँगे, सिर्फ़ त्रिवेदी बच जाएगा!' असं म्हटलं जातंय. या
२५ दिवसात नेमकं काय घडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या १५ ऑगस्टला मिळणार आहेत.