मुंबई: पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट परिसरातील तळांवर बॉम्ब्सचा वर्षाव केला. या हल्ल्याचा थरार आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले अभिषेक कपूर सांभाळणार आहे. संजय लीला भन्साळींसोबत भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ठरले असले तरी चित्रपटात कोण कलाकार दिसणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलं नाही.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, 'बालाकोट एअर स्ट्राइक ही घटना आपल्या देशातील शौर्य, देशभक्ती आणि देशप्रेमाच प्रतीक आहे. हा चित्रपट भारतीय सैन्यातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा प्रयत्न आहे.'
भारतीय हवाई दलानं दाखवलेल्या या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी दिग्दर्शक अभिषेक कपूर सज्ज आहे. 'भारताच्या इतिहासात नाव कोरली गेलेली ही घटना आहे. या ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मला मिळणं हा मी माझा सन्मान मानतो. बालाकोट हल्ल्याच्या बातम्या पाहताना देशवासीयांच्या भावना काय होत्या हे मी जाणतो. त्यामुळे मी चित्रपटाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन' असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या हवाई स्ट्राईक कारवाईनंतर पाकिस्ताननं भारतीय हद्दीत 'एफ-१६' या लढाऊ विमानांनी घुसखोरी केली होती. यावेळेस हवाई दलाच्या मिग-२१ बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्तमान यांचं मिग-२१ विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅरशूटच्या मदतीने खाली उडी मारली. पण चुकून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. यानंतर अभिनंदन यांना पाक सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलं. हा सगळा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले अभिषेक कपूर सांभाळणार आहे. संजय लीला भन्साळींसोबत भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ठरले असले तरी चित्रपटात कोण कलाकार दिसणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलं नाही.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, 'बालाकोट एअर स्ट्राइक ही घटना आपल्या देशातील शौर्य, देशभक्ती आणि देशप्रेमाच प्रतीक आहे. हा चित्रपट भारतीय सैन्यातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा प्रयत्न आहे.'
भारतीय हवाई दलानं दाखवलेल्या या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी दिग्दर्शक अभिषेक कपूर सज्ज आहे. 'भारताच्या इतिहासात नाव कोरली गेलेली ही घटना आहे. या ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मला मिळणं हा मी माझा सन्मान मानतो. बालाकोट हल्ल्याच्या बातम्या पाहताना देशवासीयांच्या भावना काय होत्या हे मी जाणतो. त्यामुळे मी चित्रपटाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन' असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या हवाई स्ट्राईक कारवाईनंतर पाकिस्ताननं भारतीय हद्दीत 'एफ-१६' या लढाऊ विमानांनी घुसखोरी केली होती. यावेळेस हवाई दलाच्या मिग-२१ बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्तमान यांचं मिग-२१ विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅरशूटच्या मदतीने खाली उडी मारली. पण चुकून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. यानंतर अभिनंदन यांना पाक सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलं. हा सगळा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.