मुंबई टाइम्स टीम
शाहरुख खानला सध्या खूप ‘रुखरुख’ लागली आहे! त्याला कारणच तसं आहे, त्याच्या लागोपाठ गेल्या पाच सिनेमांना म्हणावे तसं बम्पर यश मिळालेलं नाही.
शाहरुख खानला सध्या खूप ‘रुखरुख’ लागली आहे! त्याला कारणच तसं आहे, त्याच्या लागोपाठ गेल्या पाच सिनेमांना म्हणावे तसं बम्पर यश मिळालेलं नाही. ‘दिलवाले’, ‘फॅन’, ‘रईस’, ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटांपाठोपाठ आणि आता ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमालाही प्रेक्षकांची फारशी पसंती मिळालेली दिसत नाही. ‘जब हॅरी...’बाबत तज्ज्ञही निराश असून सिनेमाच्या विश्लेषणाला मिळालेल्या दोन-अडीच स्टारवरुन ते अधोरेखित होते आहे. तरीही प्रेक्षक शाहरुखवरील प्रेमापोटी सिनेमा खपवून घेत होता. ‘हॅपी न्यू इयर’सारखा यशस्वी सिनेमा हे त्याचं उदाहरणच होतं; पण प्रेक्षकांनी शाहरुखच्या नव्या सिनेमाला पुरतंच नाकारलं असल्याचं सुरुवातीच्या दिवसांतल्या गल्ल्यावरून स्पष्ट होते आहे. शाहरुखसाठी निराशेची बाब म्हणजे, या पाचही सिनेमांमध्ये तो निर्माता म्हणूनही गुंतला होता. त्यामुळे त्याचं हे दुहेरी नुकसानही आहे.
विकिपिडीयावर या पाच सिनेमांची कमाई काही कोटींमध्ये दिसत असली, तरी सिनेमागृहातील रिकाम्या खुर्च्या थोडं वेगळं चित्र सांगून जात आहेत. या अपयशी सिनेमांच्या नफ्याचं गणित मांडताना जागतिक कमाई आणि प्रक्षेपणाचे हक्क असा हिशेब केला गेला असेलही; पण सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या अपयशाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. शाहरुखचे ढिगभर फॅन क्लब ‘त्याचा अभिनय बघा’, असं उत्तर देत असले, तरी बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या कौतुकापेक्षा बॉक्सऑफिसवरील यशाचा मापदंडच मोठा मानला जातो. ज्या शर्यतीत शाहरूख काहीसा मागे पडलेला दिसतो आहे.
तरन आदर्श, अनुपमा चोप्रा अशा सगळ्यांनीच ‘जब हॅरी...’ बाबत निराशा व्यक्त केली आहे.
आपल्या ‘हॅपी न्यू इयर’वर तज्ज्ञ व बॉलिवूडमधल्या बुजूर्गांनी सडकून टीका केल्यानंतर, ‘यापुढे सकस कथानकांनाच प्राधान्य देऊ’, असं शाहरुखने आपल्या मुलाखतींमधून अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं. ‘रईस’, ‘डिअर जिंदगी’ आणि ‘जब हॅरी...’ या त्याच्या निवडींवरुन त्याने शब्द राखल्याचं दिसलं. या सिनेमांचे दिग्दर्शकही हुशार निवडले गेले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सध्याच्या प्रेक्षकांना बहुधा शाहरुखचे हे प्रयत्न तोकडे वाटू लागले असावेत. यातून मार्ग काढण्यासाठी शाहरुखला निर्मिती आणि अभिनयात आणखी नावीन्य आणावं लागेल, असं बोललं जातंय.
‘ट्यूबलाइट’, ‘जग्गा जासूस’, ‘जब हॅरी मेट सेजल’... फ्लॉप्सची यादीच तयार झाली आहे. बॉलिवूड सध्या कठीण काळातून जात असून एका दमदार हिटची खरोखरच गरज आहे. यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, फक्त स्टार पॉवर कामाला येत नाही. सिनेमा चालायचा असेल, तर ताकदीची गोष्ट आणि तेवढीच दमदार पटकथाही हवी. ‘बाहूबली २’च्या यशानंतर बॉलिवूड तळात गेल्यासारखं वाटतं आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ तरी हा दुष्काळ दूर करेल?
तरन आदर्श (सिनेतज्ज्ञ)
शाहरुख खानला सध्या खूप ‘रुखरुख’ लागली आहे! त्याला कारणच तसं आहे, त्याच्या लागोपाठ गेल्या पाच सिनेमांना म्हणावे तसं बम्पर यश मिळालेलं नाही.
शाहरुख खानला सध्या खूप ‘रुखरुख’ लागली आहे! त्याला कारणच तसं आहे, त्याच्या लागोपाठ गेल्या पाच सिनेमांना म्हणावे तसं बम्पर यश मिळालेलं नाही. ‘दिलवाले’, ‘फॅन’, ‘रईस’, ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटांपाठोपाठ आणि आता ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमालाही प्रेक्षकांची फारशी पसंती मिळालेली दिसत नाही. ‘जब हॅरी...’बाबत तज्ज्ञही निराश असून सिनेमाच्या विश्लेषणाला मिळालेल्या दोन-अडीच स्टारवरुन ते अधोरेखित होते आहे. तरीही प्रेक्षक शाहरुखवरील प्रेमापोटी सिनेमा खपवून घेत होता. ‘हॅपी न्यू इयर’सारखा यशस्वी सिनेमा हे त्याचं उदाहरणच होतं; पण प्रेक्षकांनी शाहरुखच्या नव्या सिनेमाला पुरतंच नाकारलं असल्याचं सुरुवातीच्या दिवसांतल्या गल्ल्यावरून स्पष्ट होते आहे. शाहरुखसाठी निराशेची बाब म्हणजे, या पाचही सिनेमांमध्ये तो निर्माता म्हणूनही गुंतला होता. त्यामुळे त्याचं हे दुहेरी नुकसानही आहे.
विकिपिडीयावर या पाच सिनेमांची कमाई काही कोटींमध्ये दिसत असली, तरी सिनेमागृहातील रिकाम्या खुर्च्या थोडं वेगळं चित्र सांगून जात आहेत. या अपयशी सिनेमांच्या नफ्याचं गणित मांडताना जागतिक कमाई आणि प्रक्षेपणाचे हक्क असा हिशेब केला गेला असेलही; पण सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या अपयशाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. शाहरुखचे ढिगभर फॅन क्लब ‘त्याचा अभिनय बघा’, असं उत्तर देत असले, तरी बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या कौतुकापेक्षा बॉक्सऑफिसवरील यशाचा मापदंडच मोठा मानला जातो. ज्या शर्यतीत शाहरूख काहीसा मागे पडलेला दिसतो आहे.
तरन आदर्श, अनुपमा चोप्रा अशा सगळ्यांनीच ‘जब हॅरी...’ बाबत निराशा व्यक्त केली आहे.
आपल्या ‘हॅपी न्यू इयर’वर तज्ज्ञ व बॉलिवूडमधल्या बुजूर्गांनी सडकून टीका केल्यानंतर, ‘यापुढे सकस कथानकांनाच प्राधान्य देऊ’, असं शाहरुखने आपल्या मुलाखतींमधून अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं. ‘रईस’, ‘डिअर जिंदगी’ आणि ‘जब हॅरी...’ या त्याच्या निवडींवरुन त्याने शब्द राखल्याचं दिसलं. या सिनेमांचे दिग्दर्शकही हुशार निवडले गेले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सध्याच्या प्रेक्षकांना बहुधा शाहरुखचे हे प्रयत्न तोकडे वाटू लागले असावेत. यातून मार्ग काढण्यासाठी शाहरुखला निर्मिती आणि अभिनयात आणखी नावीन्य आणावं लागेल, असं बोललं जातंय.
‘ट्यूबलाइट’, ‘जग्गा जासूस’, ‘जब हॅरी मेट सेजल’... फ्लॉप्सची यादीच तयार झाली आहे. बॉलिवूड सध्या कठीण काळातून जात असून एका दमदार हिटची खरोखरच गरज आहे. यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, फक्त स्टार पॉवर कामाला येत नाही. सिनेमा चालायचा असेल, तर ताकदीची गोष्ट आणि तेवढीच दमदार पटकथाही हवी. ‘बाहूबली २’च्या यशानंतर बॉलिवूड तळात गेल्यासारखं वाटतं आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ तरी हा दुष्काळ दूर करेल?
तरन आदर्श (सिनेतज्ज्ञ)