अ‍ॅपशहर

सचिन खेडेकर उलगडत आहेत पोलिसांच्या 'शौर्य गाथा'

झी युवाने आजच्या तरुणाईचा विचार करत, “शौर्य-गाथा अभिमानाची” या कार्यक्रमाद्वारे एक हटके प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणाईला महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य समजावे आणि आजच्या पिढीने आपल्या पोलिसांचा गर्व बाळगावा ; यासाठी, महाराष्ट्र पोलिसांची शौर्य गाथा सांगणारा हा एक नवीन दर्जेदार कार्यक्रम सुरु केला आहे.

Maharashtra Times 20 Jan 2017, 7:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shaurya gatha zee yuva channel
सचिन खेडेकर उलगडत आहेत पोलिसांच्या 'शौर्य गाथा'


झी युवाने आजच्या तरुणाईचा विचार करत, “शौर्य-गाथा अभिमानाची” या कार्यक्रमाद्वारे एक हटके प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणाईला महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य समजावे आणि आजच्या पिढीने आपल्या पोलिसांचा गर्व बाळगावा ; यासाठी, महाराष्ट्र पोलिसांची शौर्य गाथा सांगणारा हा एक नवीन दर्जेदार कार्यक्रम सुरु केला आहे. २६/११ चा अतिरेकी हल्ल्याच्या थरारक गोष्टीपासून सुरु झालेला प्रवास , हा १९९३ चा बॉम्बब्लास्ट चा भयाण अनुभव , अमीरजादा केस , निडर महिला अधिकाऱ्यांचे शौर्य , शेरू मर्डर केस आणि शेंडे मिसळ केस मधील पोलिसांचे शौर्य , मन्या सुर्वेचा एन्काउंटर तर चार्ल्स शोभराजला जेरीस आणणाऱ्या पोलिसांची कथा आणि आता या शुक्रवारची राम आणि श्याम ह्या जोडगोळीचा गुन्ह्यांचा अंत करणारी आणि त्याचबरोबर अत्यंत गाजलेली अशी किरण दवे अपहरण केस , अश्या अनेक गोष्टींनी , प्रेक्षकांना पोलिसांच्या शौर्याची खरी माहिती देत , “शौर्य-गाथा अभिमानाची” लोकांच्या सर्वात आवडीचा कार्यक्रम बनला आहे .

शौर्य - गाथा अभिमानाची या मालिकेद्वारे सर्वच प्रेक्षकांच्या मनातला, निधड्या छातीचा पोलीस, झी युवा, पुन्हा अत्यंत गर्वाने उभा करीत आहे. गाजलेल्या मराठी आणि तेवढ्याच ताकदीने हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा एक वेगळाच प्रभाव प्रेक्षकांवर पडणारे अभिनेते, ज्याची मराठीशी असलेली नाळ अतिशय घनिष्ठ आहे, ते म्हणजेच आपल्या सर्वांचे आवडते सचिन खेडेकर. अश्या ह्या, लोकांच्या आवडत्या अभिनेत्याचा,सच्चा आवाज, झी युवाच्या "शौर्य - गाथा अभिमानाची " या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळत आहे. “शौर्य-गाथा अभिमानाची” या कार्यक्रमात सचिन खेडेकर यांचा खरंच मोलाचा वाटा आहे. ज्या पद्धतीने ते मालिकेतील घडलेल्या आणि घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना सांगतात, त्या घटना प्रेक्षकांना पोलिसांच्या सत्य शौर्याची आणि त्यावेळीच्या परिस्थितीची जाणीव करून देतात, ते लक्षणीय आहे. या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक, जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज