मुंबई टाइम्स टीम
शूटिंगच्या निमित्तानं कलाकारांची होणारी धावपळ, सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरावं लागणं नवीन नाही. त्यातून डेली सोप असेल तर ही पळापळ, प्रवास आणखीन जास्त असतो. सध्या सुरू असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’मधल्या अपूर्वा नेमळेकरची सध्या अशीच धावपळ होतेय. मालिकेचं सावंतवाडीमध्ये सुरू असलेलं शूटिंग सांभाळून ती बऱ्याचदा रांचीला ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटाच्या शूटसाठी जात असते. त्यासाठी तिला सावंतवाडी ते मुंबई आणि पुढे रांची असा प्रवास करावा लागतो.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतली तिची भूमिका चर्चेत आहे. त्याशिवाय, अपूर्वा सध्या ‘सब कुशल मंगल’ नावाचा हिंदी चित्रपटही करते. त्यासाठी अधूनमधून तिला रांचीला जावं लागतं. रांचीचं शूटिंगचं वेळापत्रक संपवून मुंबईला परतायचं आणि मुंबईहून रेल्वेनं सावंतवाडीला मालिकेच्या शूटसाठी हजर व्हायचं अशी तिची कसरत होत असते. मालिका आणि चित्रपटातल्या तिच्या दोन्ही भूमिकाही एकदम वेगळ्या आहेत. आपल्या धावपळीबाबत ती म्हणाली, की ‘रांचीला जाण्यासाठी मुंबईहून एकच विमान आहे. ते विमान पकडण्यासाठी मी सावंतवाडीहून मुंबईला येते. रांची ते मुंबई आणि पुन्हा मुंबई ते सावंतवाडी असा प्रवास मी करतेय. गेला दीड महिना माझा हा प्रवास सुरू आहे. एकदा तर असंही झालं होतं की एकाच दिवशी मी महाराष्ट्र, गोवा आणि रांची अशा तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये होते. दुपारी दोन वाजता सुरू झालेला तो प्रवास रात्री दोनला संपला. त्यानंतर सकाळी सहा वाजता मला पुन्हा मालिकेचं चित्रीकरणाला पोहोचायचं होतं. धावपळ कितीही असली तरी काम करायला मात्र मजा येतेय. त्यामुळे सध्या 'सब कुशल मंगल' आहे असं मी म्हणेन.’
शूटिंगच्या निमित्तानं कलाकारांची होणारी धावपळ, सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरावं लागणं नवीन नाही. त्यातून डेली सोप असेल तर ही पळापळ, प्रवास आणखीन जास्त असतो. सध्या सुरू असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’मधल्या अपूर्वा नेमळेकरची सध्या अशीच धावपळ होतेय. मालिकेचं सावंतवाडीमध्ये सुरू असलेलं शूटिंग सांभाळून ती बऱ्याचदा रांचीला ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटाच्या शूटसाठी जात असते. त्यासाठी तिला सावंतवाडी ते मुंबई आणि पुढे रांची असा प्रवास करावा लागतो.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतली तिची भूमिका चर्चेत आहे. त्याशिवाय, अपूर्वा सध्या ‘सब कुशल मंगल’ नावाचा हिंदी चित्रपटही करते. त्यासाठी अधूनमधून तिला रांचीला जावं लागतं. रांचीचं शूटिंगचं वेळापत्रक संपवून मुंबईला परतायचं आणि मुंबईहून रेल्वेनं सावंतवाडीला मालिकेच्या शूटसाठी हजर व्हायचं अशी तिची कसरत होत असते. मालिका आणि चित्रपटातल्या तिच्या दोन्ही भूमिकाही एकदम वेगळ्या आहेत. आपल्या धावपळीबाबत ती म्हणाली, की ‘रांचीला जाण्यासाठी मुंबईहून एकच विमान आहे. ते विमान पकडण्यासाठी मी सावंतवाडीहून मुंबईला येते. रांची ते मुंबई आणि पुन्हा मुंबई ते सावंतवाडी असा प्रवास मी करतेय. गेला दीड महिना माझा हा प्रवास सुरू आहे. एकदा तर असंही झालं होतं की एकाच दिवशी मी महाराष्ट्र, गोवा आणि रांची अशा तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये होते. दुपारी दोन वाजता सुरू झालेला तो प्रवास रात्री दोनला संपला. त्यानंतर सकाळी सहा वाजता मला पुन्हा मालिकेचं चित्रीकरणाला पोहोचायचं होतं. धावपळ कितीही असली तरी काम करायला मात्र मजा येतेय. त्यामुळे सध्या 'सब कुशल मंगल' आहे असं मी म्हणेन.’