मुंबई: पती बोनी कपूर यांनी आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग निघून गेल्याचं दु:ख एका पत्रातून व्यक्त केल्यानंतर, तसेच कपूर कुटुंबीयांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंत आता श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने एक पत्र लिहित आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जान्हवी आपल्याला सोडून गेलेल्या आईबाबत या पत्रात लिहिते, ' आई, आता तू माझ्या आयुष्यात जरी नसलीस तरीही तुझ्या प्रेमाची अनुभूती मात्र अजूनही होत आहे. दु:ख आणि त्रास या सगळ्यापासून तू माझे रक्षण करत आहेस असा मला भास होतो आहे. जेव्हा जेव्हा मी माझे डोळे बंद करते तेव्हा तेव्हा चांगल्याच गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येण्यास सुरुवात होते.'
जान्हवी आपल्या पत्रात आई-वडिलांच्या नात्याकडे आदराने पाहण्याचे सर्वांना आवाहन करत पुढे म्हणते की, 'माझी आई आणि बाबांमध्ये असणारे प्रेम हा तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग होता हे लक्षात असू द्यावे. दोघांचे प्रेम अमर आहे. त्याच्यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट या जगात अस्तित्वात नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या नात्याचा आदर करा अशी विनंती मी तुम्हाला करते. त्यांच्या नात्याबाबत कुणी वेडेवाकडे बोललेले ऐकून मनाला खूप वेदना होतात. मी आणि खुशीने आई गमावली आहे. परंतु, बाबांनीतर त्यांचा जीवच गमावला आहे. एक आई आणि पत्नी या पलिकडे जाऊन तिने प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे बजावली आहे.'
गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यासाठी सर्वांनीच आपुलकी दाखवली याबाबत जान्हवीने सर्वांचे आभारही मानले आहेत.
जान्हवी आपल्याला सोडून गेलेल्या आईबाबत या पत्रात लिहिते, ' आई, आता तू माझ्या आयुष्यात जरी नसलीस तरीही तुझ्या प्रेमाची अनुभूती मात्र अजूनही होत आहे. दु:ख आणि त्रास या सगळ्यापासून तू माझे रक्षण करत आहेस असा मला भास होतो आहे. जेव्हा जेव्हा मी माझे डोळे बंद करते तेव्हा तेव्हा चांगल्याच गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येण्यास सुरुवात होते.'
जान्हवी आपल्या पत्रात आई-वडिलांच्या नात्याकडे आदराने पाहण्याचे सर्वांना आवाहन करत पुढे म्हणते की, 'माझी आई आणि बाबांमध्ये असणारे प्रेम हा तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग होता हे लक्षात असू द्यावे. दोघांचे प्रेम अमर आहे. त्याच्यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट या जगात अस्तित्वात नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या नात्याचा आदर करा अशी विनंती मी तुम्हाला करते. त्यांच्या नात्याबाबत कुणी वेडेवाकडे बोललेले ऐकून मनाला खूप वेदना होतात. मी आणि खुशीने आई गमावली आहे. परंतु, बाबांनीतर त्यांचा जीवच गमावला आहे. एक आई आणि पत्नी या पलिकडे जाऊन तिने प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे बजावली आहे.'
गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यासाठी सर्वांनीच आपुलकी दाखवली याबाबत जान्हवीने सर्वांचे आभारही मानले आहेत.