मुंबई टाइम्स टीम
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर हिंदी रंगभूमी गाजवत आहे. सध्या तिची 'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशी एकाचवेळी पाच हिंदी नाटकं गाजत आहेत. नेहमी हसतमुख असणारी सुखदा आता मराठी रंगभूमीवर यायला सज्ज झाली आहे. काही वर्षांपूर्वी विजय केंकरे यांच्या 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' आणि मकरंद देशपांडे यांच्या 'शेक्सपिअरचा म्हातारा' या मराठी नाटकातून तिनं काम केलं होतं. पण, मधल्या काळात ती हिंदी रंगभूमीवर स्थिरावली होती. मराठी रंगभूमीवर पुनरागमन करण्यासाठी ती नव्या कोऱ्या संहितेच्या शोधात होती; आणि हा शोध 'तेरी भी चुप' या नाटकाच्या निमित्तानं पूर्ण झाल्याचं ती सांगते.
तेजस रानडे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित 'तेरी भी चुप' हे गुंतागुंतीच्या नाते संबंधावर भाष्य करणारं नाटक आहे. याविषयी बोलताना सुखदा सांगते की, 'पुन्हा एकदा केंकरे सरांबरोबर काम करायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणी आहे. मधल्याकाळात मी हिंदी रंगभूमीवर फार काम करत असल्यामुळे माझ्या तोंडी असलेली मराठी काहीशी बिघडलेली. पण, आता नाटकाच्या तालमीनिमित्त ती सुधारली आहे. त्याचा अधिक आनंद आहे. सोबतच माझ्यासोबत नाटकात हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि मधुरा पालांडे यांसारखी मंडळी असल्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय. त्यामुळे मराठी नाटक करताना माझी मराठी भाषा सुधारतेय; या गोष्टीच अधिक समाधान आहे'.
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर हिंदी रंगभूमी गाजवत आहे. सध्या तिची 'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशी एकाचवेळी पाच हिंदी नाटकं गाजत आहेत. नेहमी हसतमुख असणारी सुखदा आता मराठी रंगभूमीवर यायला सज्ज झाली आहे. काही वर्षांपूर्वी विजय केंकरे यांच्या 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' आणि मकरंद देशपांडे यांच्या 'शेक्सपिअरचा म्हातारा' या मराठी नाटकातून तिनं काम केलं होतं. पण, मधल्या काळात ती हिंदी रंगभूमीवर स्थिरावली होती. मराठी रंगभूमीवर पुनरागमन करण्यासाठी ती नव्या कोऱ्या संहितेच्या शोधात होती; आणि हा शोध 'तेरी भी चुप' या नाटकाच्या निमित्तानं पूर्ण झाल्याचं ती सांगते.
तेजस रानडे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित 'तेरी भी चुप' हे गुंतागुंतीच्या नाते संबंधावर भाष्य करणारं नाटक आहे. याविषयी बोलताना सुखदा सांगते की, 'पुन्हा एकदा केंकरे सरांबरोबर काम करायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणी आहे. मधल्याकाळात मी हिंदी रंगभूमीवर फार काम करत असल्यामुळे माझ्या तोंडी असलेली मराठी काहीशी बिघडलेली. पण, आता नाटकाच्या तालमीनिमित्त ती सुधारली आहे. त्याचा अधिक आनंद आहे. सोबतच माझ्यासोबत नाटकात हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि मधुरा पालांडे यांसारखी मंडळी असल्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय. त्यामुळे मराठी नाटक करताना माझी मराठी भाषा सुधारतेय; या गोष्टीच अधिक समाधान आहे'.