मुंबई:
'कलाकारांची गरज प्रत्येक क्षेत्रात असते. मात्र, कलाकारांनी काही मत मांडू नये अशी अनेकांची अपेक्षा असते. ते काही बोलले की त्यांना लक्ष्य केलं जातं. ते सगळ्यांचेच सॉफ्ट टार्गेट ठरतात,' अशा म्हणत अभिनेता सुनील शेट्टी यानं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नासिरुद्दीन शहा यांचं समर्थन केलं आहे. देशातील परिस्थिती बघून मला माझ्या मुलांची काळजी वाटते, असं वक्तव्य नासिरुद्दीन शहा यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला. अनेकांनी त्यांच्या धर्मावरूनही टीका केली. या पार्श्वभूमीवर सुनील शेट्टीनं त्याचं मत मांडलं. 'एखादा माणूस केवळ हिंदू किंवा मुसलमान आहे म्हणून त्याच्यासोबत काही होतं, असं मला वाटत नाही. मात्र, कलाकारांचं मत कधी विचारातच घेतलं जात नाही. आम्ही काहीही केलं तरी ते चुकीचं ठरवलं जातं. खरंतर आमची गरज सगळ्यांना असते, मग ते राजकारण असो, क्रीडा क्षेत्र असो की मदतनिधीचा कार्यक्रम. कलाकार कसलाही विचार न करता या सगळ्यामध्ये सहभागी होतात. पण याच कलाकारांना अडकवायचं काम सहज केलं जातं. कलाकार असण्याचं हे दु:ख आहे, असं सुनील शेट्टी म्हणाला.
'नसीरभाई सुद्धा असंच काही तरी बोलत होते. मात्र, ते सॉफ्ट टार्गेट ठरले. कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट होतात. सोशल मीडिया भलताच शक्तिशाली असल्यानं हे होत असावं. त्यामुळंच व्यक्तिगत आयुष्यात मी सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक लांब राहतो,' असंही तो म्हणाला.
'कलाकारांची गरज प्रत्येक क्षेत्रात असते. मात्र, कलाकारांनी काही मत मांडू नये अशी अनेकांची अपेक्षा असते. ते काही बोलले की त्यांना लक्ष्य केलं जातं. ते सगळ्यांचेच सॉफ्ट टार्गेट ठरतात,' अशा म्हणत अभिनेता सुनील शेट्टी यानं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नासिरुद्दीन शहा यांचं समर्थन केलं आहे.
'नसीरभाई सुद्धा असंच काही तरी बोलत होते. मात्र, ते सॉफ्ट टार्गेट ठरले. कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट होतात. सोशल मीडिया भलताच शक्तिशाली असल्यानं हे होत असावं. त्यामुळंच व्यक्तिगत आयुष्यात मी सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक लांब राहतो,' असंही तो म्हणाला.