अ‍ॅपशहर

Tanushree Dutta: तनुश्री अमिताभ बच्चन यांच्यावर नाराज

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं आता महानायक अमिताभ यांना लक्ष्य केलं आहे. 'अमिताभ यांच्यासारखे लोक सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट करतात. पण प्रत्यक्षात भूमिका घ्यायची वेळ आली की मौन बाळगतात,' अशा शब्दांत तिनं नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2018, 2:09 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amitabh-Tanushree


अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं आता महानायक अमिताभ यांना लक्ष्य केलं आहे. 'अमिताभ यांच्यासारखे लोक सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट करतात. पण प्रत्यक्षात भूमिका घ्यायची वेळ आली की मौन बाळगतात,' अशा शब्दांत तिनं नाराजी व्यक्त केली आहे.

तनुश्री व नाना वादावर आतापर्यंत अनेक कलाकारांनी स्वत:ची मतं मांडली आहेत. अनेक कलाकारांनी तनुश्रीला जाहीर पाठिंबा दिला आहे. तर, गणेश आचार्यसारख्या लोकांनी नानाला क्लिन चिट दिली आहे. मात्र, अमिताभ व आमिर खान यांच्यासारख्या काही बड्या अभिनेत्यांनी त्यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी तनुश्रीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: अमिताभ यांच्या अलिप्ततेबद्दल तिनं आश्चर्य व्यक्त केलंय. 'हे लोक सामाजिक आशय, विषय असलेले चित्रपट करतात. मात्र, प्रत्यक्ष जीवनात अशा मुद्द्यांवर भूमिका घेण्याची वेळ आली की काहीच बोलत नाहीत. किंवा गोलमाल उत्तरं देऊन वेळ मारून नेतात, असं ती म्हणाली.

तनुश्रीच्या या वक्तव्यावर अमिताभ बच्चन काय प्रतिक्रिया देतात, याकडं आता सिनेसृष्टीचं आणि त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज