अ‍ॅपशहर

विराट-अनुष्काचं डिसेंबरमध्ये लग्न?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अफेअरची चर्चा झाली नाही, असा एकही दिवस नाही. या दोघांमध्ये 'काय घडतंय...काय बिघडतंय' हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'विरुष्का' फॅन्सचा असतो. विराट-अनुष्काच्या याच डायहार्ट चाहत्यांसाठी सरप्राईझ आहे.

Maharashtra Times 24 Oct 2017, 1:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india skipper virat kohli bollywood actress anushka sharma to get married in december
विराट-अनुष्काचं डिसेंबरमध्ये लग्न?


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अफेअरची चर्चा झाली नाही, असा एकही दिवस नाही. या दोघांमध्ये 'काय घडतंय...काय बिघडतंय' हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'विरुष्का' फॅन्सचा असतो. विराट-अनुष्काच्या याच डायहार्ट चाहत्यांसाठी सरप्राईझ आहे. हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

हो ठरलं एकदाचं! असं आता विराट-अनुष्काबाबत म्हणावं लागेल. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची बॉलिवूड आणि क्रीडाविश्वात चर्चा आहे. डिसेंबरमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत. पण तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असं सांगण्यात येतंय.

बीसीसीआयच्या निवड समितीनं कालच श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ खेळणार आहे. संघाची घोषणा झाली असली तरी विराटला मात्र डिसेंबरमध्ये ब्रेक हवा आहे. तसं त्यानं बीसीसीआयला सांगितल्याचं वृत्त आहे. अनुष्काशी लग्न करण्यासाठी त्याला ब्रेक हवा आहे, असं सूत्रांकडून समजतं. पण सध्या तरी विराटला ब्रेक मिळणार नसल्याचं कळतं. कारण श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीनंतर त्याला ब्रेक देण्याबाबत विचार करू, असं निवड समितीनं स्पष्ट केलंय. त्यामुळं विराट-अनुष्काच्या लग्नाचा बार डिसेंबरमध्ये उडणार का, याबाबत बॉलिवूड-क्रिकेट वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज