अ‍ॅपशहर

मी जाऊ तरी कुठं? आता काहीच उरलं नाहीये...संजनाचे शब्द ऐकून अनघाही रडली

Aai Kuthe Kay Karte Updates: आई कुठे काय करते' ही मालिका सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतेय. मालिकेत सध्या सुरू असलेलं कथानक अनेकांना पसंत पडतंय. अरुंधती आणि आशुतोष याच्या लग्नाने अनेक प्रेक्षक आनंदी झाले. त्यांचा सुखी संसार पाहायला प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Authored byभाग्यश्री रसाळ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2023, 10:24 am
मुंबई: छोट्या पडद्यावरची 'आई कुठे काय करते' ही मालिका नेहमीच चर्चेत असते. मालिकेतलं कथानक गुंतागुंतीचं असलं तरी, प्रेक्षकांना आवडतंय. नात्यांची होणारी घुसमट, त्याचे वेगवेगळे पैलू दाखवण्याचा प्रयत्न मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मालिकेत नुकतंच अरुंधतीनं नवीन संसार थाटलाय.अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नामुळं मालिकेला एक वेगळंच वळण आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anagha and sanjana


आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली तरी, अरुंधतीनं तिची जुन्या नात्यांना दूर केलं नाही. ती तिच्या मुलांसाठी कायम त्यांच्यासोबत आहे. पण आता मालिकेत अनिरुद्ध आणि संजना यांच्या घटस्फोटोची चर्चा सुरू आहे. अनिरुद्धनं अरुंधीताला दूर करत संजनाला जवळ केलं. पण त्यानंतर आता दोघं घटस्फोट घेणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण संजनाला हे नकोय. अनघाशी बोलताना तिनं मन मोकळं केलं.
जिने सात वेळा कानाखाली मारली, तीच माझ्या मनात भरली; रमेश आणि सीमा देव यांची हटके लव्हस्टोरी
आजच्या भागात संजना आणि अनघा यांच्यातला हा संवाद पाहायला मिळणार आहे. अनघा संजनाला विचारते की, तुमचा घटस्फोट झाल्यावर तुम्ही घर सोडून जाणार का? यावर संजना म्हणते की, माहीत नाही. पण टेक्निकली मला जायला हवं. अगं, मग हे घर माझं नसेल ना. पण मला नाही वाटतं की मी आणि अनिरुद्ध वेगळे होऊ. एक वय असतं बघ माणूस सगळं स्वीकारायला लागतो. पण अनिरुद्धला काही स्वीकारायचं नाहीये.

पुढं संजना म्हणते की, अनघा मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा सुडापोटी आले. अरुंधतीवर कुरघोडी करायची होती. कुठेतरी डोक्यात होतं की, तिच्या नवऱ्याला तिच्यापेक्षा मी जास्त आवडते. त्याचा एक दृष्ट आनंद होता. म्हणजे अनिरुद्धचं माझ्यावर खूप प्रेम आहे, अशी समजूत होती. पण इथं आल्यावर कळलं की, अनिरुद्धचं फक्त स्वत:वर प्रेम आहे. त्याचं अरुंधतीवरही प्रेम आहे, असंही नाही. त्याचा फत्त इगो आडवा येतो. ती त्याला सोडून गेली. यशस्वी झालीय. असं संजना म्हणते.
आई कुठे काय करते: गौरी घेणार कायमची एक्झिट? यशला अंगठी करणार परत; मुलाला कशी सावरणार अरुंधती

संजना पुढं म्हणते की, अनघा आता ना जीव गुंतलाय तुमच्यात. जानकीतही जीव अडकलाय माझा. यावर अनघा संजनाला निखिलबद्दल विचारते.

यावर संजना म्हणते की, शेखर आहे ना त्याच्यासोबत. दोघांचं छान जमतं. शेखर माझ्यापेक्षा जास्त स्टेबल आहे. मी जाऊ तरी कुठं? आता काहीच उरलं नाहीये माझ्याकडं. घर देखील मी शेखरला देऊन आले होते. आता मला स्थर्य हवंय. ते मला इथं मिळेल. आता नाही सोडवणार गं हे घर मला. हा पण बघू अनिरुद्धचं डोकं फिरलं आणि त्यानं घटस्फोटाचा हट्ट धरलाच तो पर्यंत हे घर हे एन्जॉय करेन.



यावर अनघाही संजनाला हे घर सोडून जाऊ नका, असं म्हणते. या दोघींमधला हा संवाद अगदी मनला लागणारा आहे.
लेखकाबद्दल
भाग्यश्री रसाळ
" महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड."... आणखी वाचा

महत्वाचे लेख