मुंबई : आई कुठे काय करते मालिका गेले अडीच वर्ष सुरू आहे. अरुंधतीला अनिरुद्ध अनेकदा अपमानास्पद वागणूक देत असतो. अरुंधती असताना त्याचे संजनाबरोबरही प्रेमसंबंध होते. दोघांचा घटस्फोट होतो आणि अरुंधती तिचं आयुष्य छान जगायला लागतेही. आशुतोषची तिला साथही आहे. पण मालिकेत इतकं सगळं सरळ नाही. आता अनिरुद्धच्या वागण्यानं मालिकेत खूपच वळणं येत आहेत. 'देवमाणूस' मालिकेत मध्ये मोठा ट्विस्ट, डिंपल खरंच गरोदर असणार की...
सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अनिरुद्धच्या घरी मीडिया आलेली आहे. मीडियासमोर अनिरुद्ध बोलतो. तो म्हणतो, 'माझं अरुंधतीवर प्रेम होतं. पण माझ्या एका चुकीमुळे आमचा २५ वर्षांचा संसार मोडला. मी अरुंधतीची माफी मागतो.' त्याच्या या वक्तव्यानं घरातले सगळे आश्चर्यचकित होतात. तिथे संजनाही असते. आप्पा, अविनाश सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.
अरुंधतीनं एका सिनेमासाठी पार्श्वगायन केलंय. त्यामुळे ती आणखी प्रकाशझोतात आली आहे. आतापर्यंत अनिरुद्ध तिच्या गाण्यावरही टीका करायचा. आता तो तिचं कौतुक करतोय. अर्थात, अनिरुद्धचा हा डाव अरुंधती आणि घरच्या सगळ्यांच्या लक्षात आला आहे. पण अभी आणि ईशा मात्र आईनं मागचं सगळं विसरून घरी परत यावं, असं म्हणतायत. तिकडे अनिरुद्ध संजनाजवळ घटस्फोट मागतोय. पण ती तो द्यायला तयार नाहीय. अनिरुद्ध वेगवेगळ्या खेळी खेळत आहे.
इकडे अरुंधतीनं मागच्या वेळीच अनिरुद्धला खडसावलं असतं. काहीही झालं तरी मी परत येणार नाही, हे तिनं त्याला स्पष्ट सांगितलं आहे. पण तरीही तो हे मुद्दाम करतोय. आपण कसे महान आहोत, हे त्याला ठसवायचं आहे. त्यासाठी तो आता मीडियाचीही मदत घेत आहे.
यश-नेहाच्या लग्नात झाला मोठा खोळंबा, झी मराठीला मागावी लागली प्रेक्षकांची माफी
आई कुठे काय करते मालिका दिवसागणिक रंजक होत आहे. आता अरुंधती काय उत्तर देतेय, हे बघण्यासारखं आहे.
सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अनिरुद्धच्या घरी मीडिया आलेली आहे. मीडियासमोर अनिरुद्ध बोलतो. तो म्हणतो, 'माझं अरुंधतीवर प्रेम होतं. पण माझ्या एका चुकीमुळे आमचा २५ वर्षांचा संसार मोडला. मी अरुंधतीची माफी मागतो.' त्याच्या या वक्तव्यानं घरातले सगळे आश्चर्यचकित होतात. तिथे संजनाही असते. आप्पा, अविनाश सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.
अरुंधतीनं एका सिनेमासाठी पार्श्वगायन केलंय. त्यामुळे ती आणखी प्रकाशझोतात आली आहे. आतापर्यंत अनिरुद्ध तिच्या गाण्यावरही टीका करायचा. आता तो तिचं कौतुक करतोय. अर्थात, अनिरुद्धचा हा डाव अरुंधती आणि घरच्या सगळ्यांच्या लक्षात आला आहे. पण अभी आणि ईशा मात्र आईनं मागचं सगळं विसरून घरी परत यावं, असं म्हणतायत. तिकडे अनिरुद्ध संजनाजवळ घटस्फोट मागतोय. पण ती तो द्यायला तयार नाहीय. अनिरुद्ध वेगवेगळ्या खेळी खेळत आहे.
इकडे अरुंधतीनं मागच्या वेळीच अनिरुद्धला खडसावलं असतं. काहीही झालं तरी मी परत येणार नाही, हे तिनं त्याला स्पष्ट सांगितलं आहे. पण तरीही तो हे मुद्दाम करतोय. आपण कसे महान आहोत, हे त्याला ठसवायचं आहे. त्यासाठी तो आता मीडियाचीही मदत घेत आहे.
यश-नेहाच्या लग्नात झाला मोठा खोळंबा, झी मराठीला मागावी लागली प्रेक्षकांची माफी
आई कुठे काय करते मालिका दिवसागणिक रंजक होत आहे. आता अरुंधती काय उत्तर देतेय, हे बघण्यासारखं आहे.