अ‍ॅपशहर

आशुतोष- अरुंधतीच्या नात्याला नवं वळण; 'आई कुठे काय करते' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येणार आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्याला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2022, 5:25 pm
मुंबई- 'आई कुठे काय करते' मालिका आता रंजक वळणावर आली आहे. लवकरच मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गेले काही आठवडे मालिकेचा टीआरपी घसरला होता. प्रेक्षकही रटाळ कथानक पाहून कंटाळले होते. त्यामुळे आता निर्मात्यांनी कथेत थोडा ट्विस्ट आणायचं ठरवलं आहे. मालिकेचं कथानक आणखी रंजक बनविण्यासाठी लवकरच कार्यक्रमात एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. त्यामुळे आता मालिका नवं वळण घेताना दिसणार आहे. आशुतोष आणि अरुंधतीच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री स्वरांगी मराठे मालिकेत एण्ट्री झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aai kuthe kay karte


सध्या मालिकेत नवनवे ट्विस्ट येत आहेत. एकीकडे आप्पांचा आजार पाहून आपल्याला पुढे एका जोडीदाराची गरज आहे असा विचार करून अरुंधतीने आशुतोशसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. यशने देखील अरुंधतीची समजूत काढत तिला पुढील परिस्थिती समजावून सांगितली. आता अखेर अरुंधतीने आशुतोशसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती लवकरच देशमुखांना तिचा हा निर्णय सांगणार आहे. सोबतच आशुतोषच्या वाढदिवसाला तिच्या मनातल्या भावनाही त्याच्यासमोर बोलून दाखवणार आहे. मात्र त्यापूर्वीच मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अभिनेत्री स्वरांगीची एण्ट्री झाली आहे. स्वरांगी कदाचित आशुतोषची जवळची व्यक्ती म्हणून दाखवण्यात येणार आहे. अरुंधती आशुतोषसाठी भेटवस्तू घेण्यासाठी गेली असताना ती दुकानात उपस्थित असलेली दाखवण्यात आली आहे.

View this post on Instagram A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

स्वरांगी अरुंधतीची आशुतोषसाठी शर्ट निवडण्यास मदतही करते. त्यामुळे त्या दुकानातून स्वरांगीने घेतलेला शर्ट तिने आशुतोषच्या वाढदिवसासाठी घेतलेला असू शकतो. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला स्वरांगीची कार्यक्रमात एण्ट्री होणार आहे. पण तिच्या येण्याने आशुतोष आणि अरुंधती यांच्या नात्यात काय बदल होणार? त्यांचं नातं कोणतं वळण घेणार? त्यांचं लग्न होणार का? अरुंधती आशुतोषसमोर तिच्या प्रेमाची कबुली देणार का, असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडले आहेत. त्यामुळे मालिकेत नक्की काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही चांगलेच आतुर झाले आहेत.

महत्वाचे लेख