अ‍ॅपशहर

बाबो! 'देवमाणूस'मधील अभिनेत्रीच्या फोटोंनी सोशल मीडियावर वातावरण तापलं

marathi actress bold photo मराठी अभिनेत्री जेव्हा जेव्हा मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर दिसल्या तेव्हा त्या साड्यांमध्ये किंवा पारंपरिक पोशाखातच दिसल्या आहेत. परंतु बदलत्या काळानुसार अभिनेत्रींनी त्यांच्या दिसण्यात आणि पारंपरिक भूमिकांची चौकटीबाहेर पडत काही बदल घडवून आणले आहेत. आताच्या अभिनेत्रींनी या भूमिकांबाबत अत्यंत चोखंदळ आणि कामाबाबत फोकस्ड आहेत. त्यामुळे भूमिकेची आणि कथनकाची गरज असेल तर त्या बोल्ड अंदाजातही दिसतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2022, 7:51 pm
मुंबई: बॉलिवूडमध्ये बिकिनी शूट किंवा बोल्ड फोटोशूट करणं नवं नाही. पण मराठी सिनेसृष्टीतील एखाद्या अभिनेत्रीनं बोल्ड फोटोशूट केलं तर, त्याची लगेचच चर्चा होते. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी अभिनेत्रींनी बिकिनी शूट केल्याचं समोर आलं. आता आणखी एकाअभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neha khan bold pics


'देवमाणूस २' मालिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मालिकेच्या मीम्सचाही धुमाकूळ पाहायला मिळतोय. या मालिकेच्या पहिल्या पर्वालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मालिकेतील एसीपी दिव्या सिंग हे पात्र देखील सोशल मीडियावर चर्चेत होतं. ही भूमिका साकराली होती अभिनेत्री नेहा खान हिनं.
आजही माझ्याबरोबर काम करायला लोक टाळतात, सनी लिओनीला का मिळत नाहीय सिनेमा?
नेहानं नुकताच तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलाय. असं असलं तरी अनेकांनी तिला ट्रोल केलं. असे फोटो टाकू नकोस..असा सल्लाही दिलाय. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या फोटो लाइकही केला आहे.

View this post on Instagram A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)


कोण आहे नेहा खान? शिकारी,बॅड गर्ल, काळे धंदे, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटांत नेहा खाननं यापूर्वी काम केलं आहे. पण 'देवमाणूस' मालिकेमुळं ती घराघरांत पोहचली आणि खऱ्या अर्थानं तिला ओळख मिळाली आहे.
डेटींगच्या चर्चेवर स्पष्टच बोलली शहनाज गिल, म्हणाली तुम्ही एखाद्यासोबत...

एका मुलाखतीत नेहानं तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं. घरात कोणतीही अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना तिनं या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. घरची परिस्थिती अगदी बेताची होती. आई मराठी, तर वडील मुस्लीम.दोघांनी प्रेमविवाह केल्यानं दोघांच्या घरच्यांनी स्वीकारलं नव्हतं. वडिलांची संपत्ती आईला मिळू नये यासाठी आईवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात तिच्या शरीरावर तब्बल ३७० टाके पडले. या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवतील आणि आळ घेतील या भीतीनं वडिल देखील फरार झाले होते. यानंतर आईनेच तिचा आणि भावंडांचा सांभाळ केला', असं नेहानं सांगितलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज