अ‍ॅपशहर

रात्रीस खेळ चाले... शेवटाक वाट्टोळा!!

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेचा शेवटचा एपिसोड अनपेक्षित, धक्कादायक वगैरे असेल असा (फाजील) विश्वास बाळगणाऱ्या प्रेक्षकांची शुक्रवारी घोर निराशा झाली. यानंतर या मालिकेला विशेषतः शेवटच्या एपिसोडला प्रेक्षक सोशल मिडियावर लाखोली वाहत आहेत.

Maharashtra Times 24 Oct 2016, 1:31 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम end episode of ratris khel chaale pathetic
रात्रीस खेळ चाले... शेवटाक वाट्टोळा!!


झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेचा शेवटचा एपिसोड अनपेक्षित, धक्कादायक वगैरे असेल असा (फाजील) विश्वास बाळगणाऱ्या प्रेक्षकांची शनिवारी घोर निराशा झाली. यानंतर या मालिकेला विशेषतः शेवटच्या एपिसोडला प्रेक्षक सोशल मीडियावर लाखोली वाहत आहेत.

मालिकेने २२ ऑक्टोबरला निरोप घेतला. खरा खुनी कोण याचा गौप्यस्फोट त्यापूर्वीच काही दिवस अगोदर सोशल मिडियावर फिरणाऱ्या 'निलीमा' च्या फोटोमुळे झाला होता. त्यामुळे किमान खून कसे केले, त्यापूर्वी घडणाऱ्या 'चमत्कारिक' घटना कशा घडवून आणल्या याबाबत शेवटच्या एपिसोडची किमान काही मिनिटे खर्ची घातली असतील, या 'भाबड्या' आशेने हा एपिसोड लोकांनी पाहिला. पण त्यात यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाहीच; याउलट अत्यंत ढिसाळपणे आधीच्या चार एपिसोडमध्ये जे संवाद 'विश्वासराव'च्या तोंडी होते त्यांचीच पुनरावृत्ती या भागात झाली. शिवाय आधीच्या अनेक एपिसोडमधल्या दिग्दर्शकाने दाखवलेल्या अनेक अतर्क्य घटनांमागचा उलगडा झालाच नाही. त्यामुळे मालिका उत्कंठा वाढवणारी असली तरी शेवटाने प्रेक्षकांची निराशा झाली. 'पथेटिक एंड', घोर निराशा, 'फालतू सिरिअलचा फालतू शेवट', 'शेवटाचो वाटुळो', शेवटचा एपिसोड तासभर ठेवायला हरकत नव्हती अशा प्रतिक्रियांचा पाउस पडला.

- हे प्रश्न अनुत्तरीत

१) खून नेमके केले तरी कसे?
२) सुषमा कधी एकीकडे दिसे, तर क्षणात दुसरीकडे. हे चमत्कार कसे केले?
३) तळघरातल्या सांगाड्यांचं काय झालं?
४) पांडू या पात्राचे गूढ कायम राहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज