अ‍ॅपशहर

'हे तर काहीच नाय' करताना खूप वेगळं वाटतंय; अक्षयाने शेअर केला अनुभव

'हे तर काहीच नाय' या शो ची सध्या चर्चा सुरू आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या आयुष्यात घडलेले भन्नाट किस्से सांगताना दिसतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2022, 5:23 pm
मुंबई :'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील पाठक बाई ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर प्रचंड लोकप्रिय आहे. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री 'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतेय. दैनंदिन मालिका केल्यानंतर कथाबाह्य कार्यक्रम करताना खूप वेगळा अनुभव असल्याचं अक्षया म्हणते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अक्षया देवधर


'मी याआधी कॉलेजमध्ये कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन केलं आहे. त्यामुळे अगदीच पहिला अनुभव आहे असं म्हणता येणार नाही. 'हे तर काहीच नाय' हा कार्यक्रम योग्य वेळी माझ्यासाठी एक वेगळी संधी घेऊन आला. खूप वर्षं मालिका केल्यानंतर कथाबाह्य कार्यक्रम करताना खूप वेगळं वाटतंय. मालिकेच्या वेळी रोज चित्रीकरण करावं लागे पण आता आठवड्यातून दोनच दिवस चित्रीकरण असतं. तसंच सूत्रसंचालन करत असताना उपस्थित प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून तिथल्या तिथे अनेकदा काही गोष्टी बोलाव्या लागतात.

View this post on Instagram A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

सूत्रसंचालनातून प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडून ठेवायचं असतं. हे खूप आव्हानात्मक आहे', असं अक्षया म्हणाली. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सूत्रसंचालनाचंही प्रेक्षक कौतुक करताहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज