मुंबई:शिल्पा शिंदे हे नाव गेल्या वर्षी बरंच चर्चेत राहिलं होतं. 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळालेल्या शिल्पानं 'बिग बॉस'च्या घरात केवळ एंट्रीच घेतली नाही. तर, ती 'बिग बॉस'ची विजेतीदेखील ठरली. परंतु, त्यानंतर मधल्या काळात शिल्पा गायब होती.
गेल्या काही दिवसांपासून ती टीव्हीवर कमबॅकची तयारी करत होती. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर शिल्पा पुन्हा एकदा टीव्हीवर येत होती ती, 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' या कॉमेडी शोच्या निमित्तानं. मात्र, आता वेगळीच बातमी हाती येतेय. ती म्हणजे, शिल्पा हा कार्यक्रम सोडणार असल्याचं कळतंय. शो सोडण्यामागचं कारण म्हणजे, 'निर्मात्यांच्या कामावर खुश नाही', असं तिनं म्हटलं आहे. एका मुलाखतीत शिल्पा सांगते, की 'निर्माते सातत्यानं कलाकारांशी खोटं बोलत आहेत. सुरुवातीला, आम्हाला आठवड्यातून फक्त दोन दिवस काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. पण, आता आमच्याकडून १२-१२ तास काम करुन घेतलं जात आहे. या शोच्या केंद्रस्थानी सुनील ग्रोवर आहे. आम्ही फक्त मागे उभं राहून टाळ्या वाजवण्याचं काम करत आहोत. इतक्या दिवसांत मला स्क्रिप्टदेखील मिळाली नाही. अशा शोमध्ये मी दीर्घ काळ काम करु शकत नाही. निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे.'
शिल्पानं सुनील ग्रोवरसह काम करण्यासही नकार दिला असल्याचं बोललं जात आहे. ती पुढे सांगते,'मला निर्मात्यांनी सांगितलं की, सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिकेचा तुमच्या व्यक्तिरेखेशी काहीही संबंध नसेल. तो नंतरच्या शेड्यूलमध्ये आपल्याबरोबर काम करेल. मात्र, त्यांनी आम्हाला लगेचच जॉईन केलं आहे. जेव्हा सुनील ग्रोव्हर अॅक्टमध्ये तुमच्या आसपास असतात, तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. ते पूर्ण अॅक्ट टेकओव्हर करून घेतात. त्यामुळे मग मी माझ्या फॅन्सना नाराज करेन. कारण, मुख्य फ्रेममध्ये मी माझ्या चाहत्यांना दिसणारच नाही. त्यामुळे मी हा शो करायचा नाही, असं ठरवलं आहे.' या सगळ्या वादाच्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ती टीव्हीवर कमबॅकची तयारी करत होती. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर शिल्पा पुन्हा एकदा टीव्हीवर येत होती ती, 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' या कॉमेडी शोच्या निमित्तानं. मात्र, आता वेगळीच बातमी हाती येतेय. ती म्हणजे, शिल्पा हा कार्यक्रम सोडणार असल्याचं कळतंय. शो सोडण्यामागचं कारण म्हणजे, 'निर्मात्यांच्या कामावर खुश नाही', असं तिनं म्हटलं आहे. एका मुलाखतीत शिल्पा सांगते, की 'निर्माते सातत्यानं कलाकारांशी खोटं बोलत आहेत. सुरुवातीला, आम्हाला आठवड्यातून फक्त दोन दिवस काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. पण, आता आमच्याकडून १२-१२ तास काम करुन घेतलं जात आहे. या शोच्या केंद्रस्थानी सुनील ग्रोवर आहे. आम्ही फक्त मागे उभं राहून टाळ्या वाजवण्याचं काम करत आहोत. इतक्या दिवसांत मला स्क्रिप्टदेखील मिळाली नाही. अशा शोमध्ये मी दीर्घ काळ काम करु शकत नाही. निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे.'
शिल्पानं सुनील ग्रोवरसह काम करण्यासही नकार दिला असल्याचं बोललं जात आहे. ती पुढे सांगते,'मला निर्मात्यांनी सांगितलं की, सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिकेचा तुमच्या व्यक्तिरेखेशी काहीही संबंध नसेल. तो नंतरच्या शेड्यूलमध्ये आपल्याबरोबर काम करेल. मात्र, त्यांनी आम्हाला लगेचच जॉईन केलं आहे. जेव्हा सुनील ग्रोव्हर अॅक्टमध्ये तुमच्या आसपास असतात, तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. ते पूर्ण अॅक्ट टेकओव्हर करून घेतात. त्यामुळे मग मी माझ्या फॅन्सना नाराज करेन. कारण, मुख्य फ्रेममध्ये मी माझ्या चाहत्यांना दिसणारच नाही. त्यामुळे मी हा शो करायचा नाही, असं ठरवलं आहे.' या सगळ्या वादाच्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.