अ‍ॅपशहर

'मी आमीरपेक्षा जास्त समाजसेवा केलीय'

'सामाजिकदृष्ट्या मी किती जबाबदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी मला आमीर खानप्रमाणे 'सत्यमेव जयते' सारखा शो करण्याची गरज नाही. मी त्याच्यापेक्षा जास्त सामाजिक कामं करतो,' असं परख मत सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी शुक्रवारी व्यक्त केलं.

Maharashtra Times 27 May 2017, 2:47 pm
टाइम्स न्यूज नेटवर्क । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i have been more socially responsible than aamir khan says kamal hassan
'मी आमीरपेक्षा जास्त समाजसेवा केलीय'


'सामाजिकदृष्ट्या मी किती जबाबदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी मला आमीर खानप्रमाणे 'सत्यमेव जयते' सारखा शो करण्याची गरज नाही. मी त्याच्यापेक्षा जास्त सामाजिक कामं करतो,' असं परख मत सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी शुक्रवारी व्यक्त केलं.

टीव्ही विश्वात लोकप्रिय ठरलेला 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो तामीळ भाषेत सुरू होत आहे. कमल हसन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ झाला. त्यावेळी, सूत्रसंचालन करण्यासाठी 'सत्यमेव जयते'सारख्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या शोऐवजी आपण 'बिग बॉस'सारखा शो का निवडला, असा प्रश्न एका पत्रकारानं कमल हसन यांना केला. या प्रश्नाला कमल हसन यांनी बेधडक उत्तर दिलं. 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत माझं सामाजिक काम मोठं आहे. खूप आधीपासून मी ते करत आलोय,' असं कमल हसन म्हणाले.

'बिग बॉस'च्या सूत्रसंचालनाविषयी बोलताना हसन म्हणाले, 'या शोच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांच्या घरापर्यंत जाण्याची संधी मिळणार आहे. या शोचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. शिवाय, या शोसाठी मला चित्रपटांमधील विविध भूमिकांप्रमाणे वेगळा 'अवतार' करून घेण्याची गरज नाही. आहे त्याच रूपात मला माझ्या चाहत्यांपर्यंत पोहोचता येईल.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज