सुरज कांबळे
मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण विषय दिसतात. त्या विषयांमधून कधी सामाजिक संदेश दिला जातो, कधी प्रबोधन केलं जातं तर काही गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं जातं. सणवार आले की त्या-त्या सणांबद्दलची माहिती, आपली संस्कृती यावर मालिकेतल्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या संवादातून भाष्य केलं जातं. तर कधी समाजातील काही घटनांवर भूमिका मांडली जाते. सध्या काही मालिकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धत दाखवली जातेय. मालिकेत मुख्य नायक-नायिकांची गोष्ट तर आहेच. पण त्याला जोडणारी एकत्र कुटुंबपद्धतही अधोरेखित केली जातेय.
मालिकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धत दाखवली की त्यात अनेक व्यक्तिरेखांचा समावेश होतो. त्यांच्या उपकथानकांनी मालिकेची कथा अधिक खुलत जाते. त्यामुळे मालिकेत एकत्र कुटुंबपद्धत दाखवण्याचा हा आणखी एक फायदा असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. प्रेक्षकांची एक पिढी एकत्र कुटुंबपद्धतीत वाढली आहे. कालांतरानं ते विविध कारणांसाठी विभक्त कुटुंबपद्धतीत राहायला लागले. पण त्या पिढीला एकत्र कुटुंबाची ओढ असतेच. याचसाठी मालिकांमधून त्याविषयी सकारात्मक चित्र दर्शवलं जातंय. 'सहकुटुंब सहपरिवार'मध्ये भावा-भावांची एकी दाखवली आहे तर 'आई कुठे काय करते' या मालिकेत तीन पिढ्या एकत्र नांदताना दिसतात. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'मध्येही पिढ्यान् पिढ्या जपलेली परंपरा दिसते. 'मुलगी झाली हो', 'राजा राणीची गं जोडी', 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकांमध्येही मूल्य तत्त्व जपत एकमेकांना धरून राहणारं कुटुंब दिसतं. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत हसत आनंदात एकत्र राहणारं मोठं कुटुंब दिसतं.
मालिका पाहताना प्रेक्षक त्यातील कोणत्या ना कोणत्या पात्राशी एकरूप होताना दिसतोय. कधीतरी एकत्र कुटुंबात राहिल्याची आठवणही प्रेक्षकांना होतेय. मालिकेतल्या कुटुंबाशी प्रेक्षक स्वत:च्या कुटुंबाला जोडू पाहतोय. म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत दाखवणाऱ्या सगळ्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकी काही मालिकांमध्येही हेवेदावे, रुसवेफुगवे आहेत. पण त्यावर योग्य तोडगा काढण्याचेही प्रसंग त्यात दाखवले जातात. या मालिकांच्या निमित्तानं आजच्या पिढीला एकत्र कुटुंबाची माहिती तर मिळतेच शिवाय त्याविषयी कुतूहलही निर्माण होतंय.
मी एकत्र कुटुंबाची गोष्ट लिहितो त्यावेळी मी माझे काही अनुभव कथेत उतरवत असतो. आताच्या पिढीला एकत्र कुटुंब म्हणजे नेमकं काय हे दाखवणं गरजेचं आहे. तसंच आता मालिका बघताना प्रेक्षकांना त्यांच्या जवळच्या लोकांची आठवण पुन्हा एकदा जगता येते. एकत्र कुटुंबात नातेसंबंधांची हळवी गोष्ट सहज वावरत असते आणि प्रेक्षक म्हणून तिच्याशी ते जोडले जातात.
- प्रल्हाद कुडतरकर, लेखक, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
नात्यांच्या गर्दीत आपण कधीच हरवत नसतो. ती नाती हवीहवीशी वाटत असतात. मालिकांमधल्या कुटुंबात प्रेक्षक स्वतःच्या कुटुंबाला बघत असतो, नातलग शोधत असतो. आता अनेक जण विभक्त झाले असले तरी नात्यांची ओढ प्रत्येकाला असतेच. एकत्र कुटुंबपद्धत पुन्हा उदयाला येण्यासाठी मालिका समाजाला आरसा दाखवू पाहत आहेत. त्यातून अधिकाधिक काहीतरी चांगलं घडेल.
- सतीश राजवाडे, प्रोग्रॅमिंग हेड, स्टार प्रवाह
मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण विषय दिसतात. त्या विषयांमधून कधी सामाजिक संदेश दिला जातो, कधी प्रबोधन केलं जातं तर काही गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं जातं. सणवार आले की त्या-त्या सणांबद्दलची माहिती, आपली संस्कृती यावर मालिकेतल्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या संवादातून भाष्य केलं जातं. तर कधी समाजातील काही घटनांवर भूमिका मांडली जाते. सध्या काही मालिकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धत दाखवली जातेय. मालिकेत मुख्य नायक-नायिकांची गोष्ट तर आहेच. पण त्याला जोडणारी एकत्र कुटुंबपद्धतही अधोरेखित केली जातेय.
मालिकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धत दाखवली की त्यात अनेक व्यक्तिरेखांचा समावेश होतो. त्यांच्या उपकथानकांनी मालिकेची कथा अधिक खुलत जाते. त्यामुळे मालिकेत एकत्र कुटुंबपद्धत दाखवण्याचा हा आणखी एक फायदा असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. प्रेक्षकांची एक पिढी एकत्र कुटुंबपद्धतीत वाढली आहे. कालांतरानं ते विविध कारणांसाठी विभक्त कुटुंबपद्धतीत राहायला लागले. पण त्या पिढीला एकत्र कुटुंबाची ओढ असतेच. याचसाठी मालिकांमधून त्याविषयी सकारात्मक चित्र दर्शवलं जातंय. 'सहकुटुंब सहपरिवार'मध्ये भावा-भावांची एकी दाखवली आहे तर 'आई कुठे काय करते' या मालिकेत तीन पिढ्या एकत्र नांदताना दिसतात. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'मध्येही पिढ्यान् पिढ्या जपलेली परंपरा दिसते. 'मुलगी झाली हो', 'राजा राणीची गं जोडी', 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकांमध्येही मूल्य तत्त्व जपत एकमेकांना धरून राहणारं कुटुंब दिसतं. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत हसत आनंदात एकत्र राहणारं मोठं कुटुंब दिसतं.
मालिका पाहताना प्रेक्षक त्यातील कोणत्या ना कोणत्या पात्राशी एकरूप होताना दिसतोय. कधीतरी एकत्र कुटुंबात राहिल्याची आठवणही प्रेक्षकांना होतेय. मालिकेतल्या कुटुंबाशी प्रेक्षक स्वत:च्या कुटुंबाला जोडू पाहतोय. म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत दाखवणाऱ्या सगळ्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकी काही मालिकांमध्येही हेवेदावे, रुसवेफुगवे आहेत. पण त्यावर योग्य तोडगा काढण्याचेही प्रसंग त्यात दाखवले जातात. या मालिकांच्या निमित्तानं आजच्या पिढीला एकत्र कुटुंबाची माहिती तर मिळतेच शिवाय त्याविषयी कुतूहलही निर्माण होतंय.
मी एकत्र कुटुंबाची गोष्ट लिहितो त्यावेळी मी माझे काही अनुभव कथेत उतरवत असतो. आताच्या पिढीला एकत्र कुटुंब म्हणजे नेमकं काय हे दाखवणं गरजेचं आहे. तसंच आता मालिका बघताना प्रेक्षकांना त्यांच्या जवळच्या लोकांची आठवण पुन्हा एकदा जगता येते. एकत्र कुटुंबात नातेसंबंधांची हळवी गोष्ट सहज वावरत असते आणि प्रेक्षक म्हणून तिच्याशी ते जोडले जातात.
- प्रल्हाद कुडतरकर, लेखक, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
नात्यांच्या गर्दीत आपण कधीच हरवत नसतो. ती नाती हवीहवीशी वाटत असतात. मालिकांमधल्या कुटुंबात प्रेक्षक स्वतःच्या कुटुंबाला बघत असतो, नातलग शोधत असतो. आता अनेक जण विभक्त झाले असले तरी नात्यांची ओढ प्रत्येकाला असतेच. एकत्र कुटुंबपद्धत पुन्हा उदयाला येण्यासाठी मालिका समाजाला आरसा दाखवू पाहत आहेत. त्यातून अधिकाधिक काहीतरी चांगलं घडेल.
- सतीश राजवाडे, प्रोग्रॅमिंग हेड, स्टार प्रवाह