विनय राऊळ
'लागीरं झालं जी' मालिकेतला जयडी (किरण ढाणे) आणि मामी (विद्या सावळे) यांच्या मालिकेतून अचानक झालेल्या एक्झिटची प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली. त्यांनी मालिका सोडण्यामागे मानधन हेच प्रमुख कारण असल्याचं बोललं जातंय. या निमित्तानं, मालिकांतल्या कलाकारांमध्ये मानधनावरुन असलेली नाराजी, यावरुन होणारे वाद पुन्हा एकदा समोर येत आहेत...
टीव्ही मालिकांमधून एखाद्या कलाकारानं बाहेर पडणं, त्या जागी दुसरा कलाकार दिसणं नवं नाही. ‘लागीरं...’मधल्या दोन कलाकारांच्या अचानक जाण्यामागे मात्र मानधन हे कारण असल्याचं बोललं जातंय. एकूणच, प्रॉडक्शन हाऊसकडून टीव्ही कलाकारांना मिळणारं मानधन हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, एक वादग्रस्त एपिसोड सुरू झाल्याचं दिसून येतंय. या निमित्तानं कलाकारांना मिळणाऱ्या ‘पर डे’वर एक नजर टाकू या.
कलाकारांना मिळणारं मानधन
- लोकप्रिय आणि अनुभवी कलाकारांना पर डे अंदाजे सात ते दहा हजार रुपये इतकं मानधन मिळतं. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चित्रीकरण झाल्यास जादा कामाचे वेगळे पैसे दिले जातात.
- मुख्य भूमिकेतल्या अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांना इतर कलाकारांच्या तुलनेत अधिक मानधन मिळतं.
- मालिकेतल्या सहकलाकारांना पर डे सुमारे दीड ते दोन हजार रुपये देण्यात येतात.
- काही मालिकांमध्ये एखाद्या भूमिकेची गरज पाहून मानधन ठरवलं जातं.
महिन्याचं पॅकेज
- काही वेळा नव्या कलाकारांशी महिन्याचं एक पॅकेजच करण्यात येतं. त्यात पंचवीस दिवस काम आणि पाच दिवस सुट्टी असा करार केला जातो. दोन-चार दिवस अधिक कामाचे वेगळे पैसे मिळत नाहीत.
- महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या नवीन कलाकारांना सुमारे दोन ते तीन हजार इतकं मानधन दिलं जातं.
- मुख्य किंवा सहकलाकार यापैकी कोणतीही भूमिका मिळाली, तरी नव्यांना पैसे मात्र तेवढेच मिळतात.
- कधी-कधी मालिकेमधल्या मुख्य भूमिकेपेक्षा दुसरी एखादी छोटी भूमिका भाव खाऊन जाते. ती साकारणाऱ्या कलाकारांना जास्त प्रसिद्धी मिळते. अशा वेळी आपलं मानधन वाढावं अशी त्यांची अपेक्षा असते.
कर्तृत्वावर अवलंबून
मानधन हे कलाकाराच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. मालिकेसाठी एखाद्या कलाकाराचं योगदान किती आणि त्यांचं काम कितपत चांगलं होतंय या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांचं मानधन वाढवलं जातं. कलाकार म्हणून तुम्ही स्वतःला जसजसं सिद्ध करत जाता तसं तुमचं मानधन आणि दर्जा आपोआप वाढत जातो. मानधन वाढवणं हे प्रॉडक्शन हाऊसच्या हातात असतं. कलाकाराचं मालिकेसाठीचं योगदान लक्षात घेऊनच मानधन वाढवायचं की नाही याबाबतचा निर्णय ते घेतात. नवीन कलाकारांनी थोडा सयंम ठेवायला हवा.
वीरेंद्र प्रधान, लेखक- दिग्दर्शक
करार पाळावाच लागतो
टीव्ही मालिकांसाठी कलाकारांशी एक वर्षाचा करार केला जातो. त्यात मोठ्यांपासून ते अगदी छोट्या कलाकारांपर्यंत सगळेच आले. करार संपल्यानंतर त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येते. एखाद्या कलाकाराला अचानक वाटलं की तो लोकप्रिय होतोय आणि माझं मानधन वाढायला हवं तर ते खूप चुकीचं आहे. एखाद्या कलाकारानं कराराच्या विरोधात जाऊन काही कृत्य केल्यास निर्माते सिंटाकडे तशी तक्रार नोंदवू शकतात. मालिका संपल्यावर पुढच्या मालिकेसाठी किंवा दुसऱ्या वर्षात तो कलाकार मानधन वाढवण्यास सांगू शकतो.
अमित बहल, सिंटा
'लागीरं झालं जी' मालिकेतला जयडी (किरण ढाणे) आणि मामी (विद्या सावळे) यांच्या मालिकेतून अचानक झालेल्या एक्झिटची प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली. त्यांनी मालिका सोडण्यामागे मानधन हेच प्रमुख कारण असल्याचं बोललं जातंय. या निमित्तानं, मालिकांतल्या कलाकारांमध्ये मानधनावरुन असलेली नाराजी, यावरुन होणारे वाद पुन्हा एकदा समोर येत आहेत...
टीव्ही मालिकांमधून एखाद्या कलाकारानं बाहेर पडणं, त्या जागी दुसरा कलाकार दिसणं नवं नाही. ‘लागीरं...’मधल्या दोन कलाकारांच्या अचानक जाण्यामागे मात्र मानधन हे कारण असल्याचं बोललं जातंय. एकूणच, प्रॉडक्शन हाऊसकडून टीव्ही कलाकारांना मिळणारं मानधन हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, एक वादग्रस्त एपिसोड सुरू झाल्याचं दिसून येतंय. या निमित्तानं कलाकारांना मिळणाऱ्या ‘पर डे’वर एक नजर टाकू या.
कलाकारांना मिळणारं मानधन
- लोकप्रिय आणि अनुभवी कलाकारांना पर डे अंदाजे सात ते दहा हजार रुपये इतकं मानधन मिळतं. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चित्रीकरण झाल्यास जादा कामाचे वेगळे पैसे दिले जातात.
- मुख्य भूमिकेतल्या अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांना इतर कलाकारांच्या तुलनेत अधिक मानधन मिळतं.
- मालिकेतल्या सहकलाकारांना पर डे सुमारे दीड ते दोन हजार रुपये देण्यात येतात.
- काही मालिकांमध्ये एखाद्या भूमिकेची गरज पाहून मानधन ठरवलं जातं.
महिन्याचं पॅकेज
- काही वेळा नव्या कलाकारांशी महिन्याचं एक पॅकेजच करण्यात येतं. त्यात पंचवीस दिवस काम आणि पाच दिवस सुट्टी असा करार केला जातो. दोन-चार दिवस अधिक कामाचे वेगळे पैसे मिळत नाहीत.
- महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या नवीन कलाकारांना सुमारे दोन ते तीन हजार इतकं मानधन दिलं जातं.
- मुख्य किंवा सहकलाकार यापैकी कोणतीही भूमिका मिळाली, तरी नव्यांना पैसे मात्र तेवढेच मिळतात.
- कधी-कधी मालिकेमधल्या मुख्य भूमिकेपेक्षा दुसरी एखादी छोटी भूमिका भाव खाऊन जाते. ती साकारणाऱ्या कलाकारांना जास्त प्रसिद्धी मिळते. अशा वेळी आपलं मानधन वाढावं अशी त्यांची अपेक्षा असते.
कर्तृत्वावर अवलंबून
मानधन हे कलाकाराच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. मालिकेसाठी एखाद्या कलाकाराचं योगदान किती आणि त्यांचं काम कितपत चांगलं होतंय या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांचं मानधन वाढवलं जातं. कलाकार म्हणून तुम्ही स्वतःला जसजसं सिद्ध करत जाता तसं तुमचं मानधन आणि दर्जा आपोआप वाढत जातो. मानधन वाढवणं हे प्रॉडक्शन हाऊसच्या हातात असतं. कलाकाराचं मालिकेसाठीचं योगदान लक्षात घेऊनच मानधन वाढवायचं की नाही याबाबतचा निर्णय ते घेतात. नवीन कलाकारांनी थोडा सयंम ठेवायला हवा.
वीरेंद्र प्रधान, लेखक- दिग्दर्शक
करार पाळावाच लागतो
टीव्ही मालिकांसाठी कलाकारांशी एक वर्षाचा करार केला जातो. त्यात मोठ्यांपासून ते अगदी छोट्या कलाकारांपर्यंत सगळेच आले. करार संपल्यानंतर त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येते. एखाद्या कलाकाराला अचानक वाटलं की तो लोकप्रिय होतोय आणि माझं मानधन वाढायला हवं तर ते खूप चुकीचं आहे. एखाद्या कलाकारानं कराराच्या विरोधात जाऊन काही कृत्य केल्यास निर्माते सिंटाकडे तशी तक्रार नोंदवू शकतात. मालिका संपल्यावर पुढच्या मालिकेसाठी किंवा दुसऱ्या वर्षात तो कलाकार मानधन वाढवण्यास सांगू शकतो.
अमित बहल, सिंटा