अ‍ॅपशहर

त्यावर ठाम असणारी अनिता दाते महत्त्वाची हाय....किरण मानेंची पोस्ट चर्चेत

kiran mane post for anita date सहा महिन्यांपूर्वी मुलगी झाली ही मालिका चर्चेत आली होती. या मालिकेतील कलाकर किरण माने (Kiran Mane) यांना अचानक मालिकेतून काढल्यामुळं वाहिनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2022, 2:14 pm
मुंबई: 'मुलगी झाली हो' या मालिकून अचानक काढून टाकल्यानंतर अभिनेते किरण माने चर्चेत आले. त्यांना या मालिकेतून कोणतीही पूर्व कल्पना न देता काढण्यात आलं होतं. या मागं त्यांची राजकीय मतं आड आल्याचं म्हटलं गेलं होतं. तसंच नंतर त्याच मालिकेतील अभिनेत्रींनी किरण यांच्यावर गैरवर्तणूकीचेआरोपही लावले होते. यानंतर कलाकारांमध्येही दोन गट पडले. एक गट किरण मानेंच्या विरोधात होता. तर बऱ्याच कलाकारांनी मानेंना पाठिंबा दिला होता. किरण मानेंना पाठिंबा देणाऱ्या कलाकारामंध्ये अभिनेत्री अनिता दाते होती. तिनं मानेंची बाजू घेत निर्मात्यांवर निशाणा साधला होता. आता सहा महिन्यांनंतर अनिता पुन्हा एकदा या विषयावर व्यक्त झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kiran mane and anita date


अनिता आता 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतू प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी ती 'बस बाई बस' या शोमध्ये आली होती.याशोमध्ये तिनं पुन्हा एकदा किरण मानेंच्या त्या मुद्द्यावर भाष्य केलं. यानंतर किरण मानेंनी देखील अनितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आलीय.

काय म्हटलंय किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये?

मला मालिकेतून काढणार्‍यांकडं या प्रश्नांची उत्तरं आजही नाहीत. म्हणूनच आजही हे 'विवेकी' मुद्दे मांडून त्यावर ठाम असनारी अनिता दाते महत्त्वाची आहे. ते एडीट न करता दाखणाऱ्या वाहिनीनं या मुद्याला न्याय दिलाय. अनिता गेली पंधरा वर्ष मला ओळखतेय. 'वाडा चिरेबंदी','गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या' या नाटकांत आम्ही एकत्र होतो. 'माझ्या नवर्‍याची बायको'मध्ये आम्हाला भाऊ-बहीण म्हणून महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यामुळं माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाही.


काय म्हणाली होती अनिता दाते?
याबद्दल अधिक बोलताना अनिता म्हणाली होती की, 'व्यवस्था समजून घेणं, व्यवस्थेला प्रश्न विचारणं, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीनं मांडता येणं ही खरंतर चांगली गोष्ट आहे असंच मी मानते. त्याबाबत किरण माने यांचं कौतुक आहे. एखादया व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणं हे चुकीचं आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो, चर्चा करू शकतो. मात्र त्याचं तोंड बंद करणं, त्याला धमकावणं, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचं लक्षण आहे.'

महत्वाचे लेख