मुंबई : आज सगळीकडे कृष्ण जन्म साजरा होतोय. रात्री अनेकांच्या घरी पूजा असते. उद्या दहीहंडी जोरदार होणार आहेत. कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन वर्षांनंतर हा उत्सव साजरा होत आहे. अभिनेता स्वप्निल जोशीनं यानिमित्तानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. स्वप्निलनं लहानपणी रामानंद सागर यांच्या श्री कृष्णा मालिकेत कृष्णाची भूमिका केली होती. रामायण मालिकेत स्वप्निलनं कुश साकारला होता. आपल्या भूमिकेनं त्यानं सागर आर्टवर आपली छाप सोडली होती. त्यामुळे जेव्हा रामानंद सागर यांनी श्रीकृष्णा मालिका करायचं ठरवलं, तेव्हा कृष्णाच्या भूमिकेसाठी स्वप्निललाच निवडलं होतं. सोशल मीडियावर अभिनेत्यानं आपल्या बालपणीचा तो व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे, '३० वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. तरीही ही भूमिका नम्र करते. अनेकांनी यावर प्रेम केलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. हॅपी जन्माष्टमी. राधे राधे.'
बहीण असावी तर अशी! मृण्मयीनं गौतमीला दिलं लाखोंचं गिफ्ट ,Insta story एकदा पाहाच
या व्हिडिओमधला कृष्ण म्हणतो, 'प्रेम हेच जगाचं सार आहे, प्रेमच सृष्टीचा आधार आहे.' महाभारत मालिकेत नितीश भारद्वाजनं श्रीकृष्णाची भूमिका केली होती. पण तिथे जास्त काळ बालकृष्ण नव्हता. त्यामुळे श्रीकृष्णा मालिकेत आपली छाप लोकांवर सोडायला स्वप्निल जोशीला फार काळ लागला नाही. रामायण मालिकेमुळे अरुण गोविल म्हणजे राम अशी लोकांची धारणा झाली होती, तसंच बालकृष्ण म्हणजे स्वप्निल जोशी हेही पक्कं झालं होतं.
सध्या स्वप्निलची तू तेव्हा तशी मालिका सुरू आहे. त्यातला त्याचा पट्या लोकप्रिय झालाय. यावर्षी त्यानं पंढरपूरची वारीही केली. स्वप्निलनं पायी वारीचा अनुभव घेत विठू माऊलीच्या भक्तीमध्ये रममाण झाला. वाखरी ते पंढरपूर असा पायी वारीचा प्रवास केल्यानंतर स्वप्निलनं पोस्ट शेअर करत त्याला आलेला अनुभव मांडला.
केबीसीच्या प्रत्येक भागानंतर बिग बींच्या संपत्तीत पडते कोटींची भर
स्वप्निलनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही. आम्ही सिनेमामधले हिरो ! पण खरे हिरो हे वारकरी! वर्षानुवर्षे तहान भूक विसरून, पायी वारी चालतात. पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते, त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं.'
बहीण असावी तर अशी! मृण्मयीनं गौतमीला दिलं लाखोंचं गिफ्ट ,Insta story एकदा पाहाच
या व्हिडिओमधला कृष्ण म्हणतो, 'प्रेम हेच जगाचं सार आहे, प्रेमच सृष्टीचा आधार आहे.' महाभारत मालिकेत नितीश भारद्वाजनं श्रीकृष्णाची भूमिका केली होती. पण तिथे जास्त काळ बालकृष्ण नव्हता. त्यामुळे श्रीकृष्णा मालिकेत आपली छाप लोकांवर सोडायला स्वप्निल जोशीला फार काळ लागला नाही. रामायण मालिकेमुळे अरुण गोविल म्हणजे राम अशी लोकांची धारणा झाली होती, तसंच बालकृष्ण म्हणजे स्वप्निल जोशी हेही पक्कं झालं होतं.
सध्या स्वप्निलची तू तेव्हा तशी मालिका सुरू आहे. त्यातला त्याचा पट्या लोकप्रिय झालाय. यावर्षी त्यानं पंढरपूरची वारीही केली. स्वप्निलनं पायी वारीचा अनुभव घेत विठू माऊलीच्या भक्तीमध्ये रममाण झाला. वाखरी ते पंढरपूर असा पायी वारीचा प्रवास केल्यानंतर स्वप्निलनं पोस्ट शेअर करत त्याला आलेला अनुभव मांडला.
केबीसीच्या प्रत्येक भागानंतर बिग बींच्या संपत्तीत पडते कोटींची भर
स्वप्निलनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही. आम्ही सिनेमामधले हिरो ! पण खरे हिरो हे वारकरी! वर्षानुवर्षे तहान भूक विसरून, पायी वारी चालतात. पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते, त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं.'