मुंबई: मालिकांमधून अनेकदा सामाजिक विषयांवर भाष्य करत समाजप्रबोधनाचा प्रयत्न केला जातो. 'आई कुठे काय करते' या मालिकेतही अनेकदा संवेदनशील विषय मांडण्यात आले. मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमही केलं, परंतु आता मालिका भरकटतेय, असा सूर प्रेक्षकांमधून उमटू लागला आहे. मालिका बंद करण्याची मागणीही केली जात आहे. तसंच मालिकेचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.
कथानकावर प्रेक्षक नाराज
मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट दाखवण्यात आला असला तरी, अरुंधतीचा स्वभाव, तिचा त्याग काही प्रमाणात पटत नसल्याचं प्रेक्षक म्हणतायत. संजना आणि अनिरुद्ध यांचं लग्न होऊनही अरुंधती त्याच घरात राहत आहे. आजी आणि आप्पा यांच्यासाठी अरुंधती तिथे राहत असली तरी प्रेक्षकांना ते पसंत पडलेलं नाही. आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणं कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला पसंत पडणार नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे
स्त्रीयांचा होतोय अपमान
अरुंधती वारंवार संजनाला मदत करताना दिसते. तर दुसरीकडे संजना मात्र अनेकदा टोमणे मारत अरुंधतीचा अपमान करताना दिसते. तर दुसरीक़डे अरुंधती संजनाचा अपमान करत असते. त्यामुळं स्त्रींयांची प्रतिमा चुकीची दाखवली जात असल्याचं म्हटलं आहे.
कथानकावर प्रेक्षक नाराज
मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट दाखवण्यात आला असला तरी, अरुंधतीचा स्वभाव, तिचा त्याग काही प्रमाणात पटत नसल्याचं प्रेक्षक म्हणतायत. संजना आणि अनिरुद्ध यांचं लग्न होऊनही अरुंधती त्याच घरात राहत आहे. आजी आणि आप्पा यांच्यासाठी अरुंधती तिथे राहत असली तरी प्रेक्षकांना ते पसंत पडलेलं नाही. आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणं कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला पसंत पडणार नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे
अरुंधती वारंवार संजनाला मदत करताना दिसते. तर दुसरीकडे संजना मात्र अनेकदा टोमणे मारत अरुंधतीचा अपमान करताना दिसते. तर दुसरीक़डे अरुंधती संजनाचा अपमान करत असते. त्यामुळं स्त्रींयांची प्रतिमा चुकीची दाखवली जात असल्याचं म्हटलं आहे.