संपदा जोशी
त्याच-त्याच मालिका पाहून कंटाळा आला असेल, तर प्रेक्षकांनो जरा संयम ठेवा. येत्या काळात जवळपास २२ मालिका टीव्हीवर धडकणार आहेत.
मालिका म्हटल्या, की भांडण, रोमान्स, थरार या गोष्टी आल्याच. हिंदी आणि मराठी चँनेलवर सध्या नवीन मालिकांचा महापूर आला आहे. एकूण २२ नवीन मालिका टीव्हीवर धडकणार आहेत. कोणती मालिका उत्तम याबाबत आता खरी स्पर्धा सुरू होईल. पौराणिक कथा ते थेट सास-बहूच्या कुरघोडींपर्यंत सगळ्या प्रकारच्या विषयांची मेजवानी प्रेक्षकांना नव्या मालिकेत मिळणार आहे. टीआरपीच्या स्पर्धेत स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी या नवीन मालिका आणि त्यांचे दिग्दर्शक काय अनोखं दाखवणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
पौराणिक कथांमध्ये वाढ
सध्या प्रत्येक चॅनलवर एक तरी मालिका पौराणिक घटनांशी संबंधित असते. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सुरू झाली असून, स्टार प्रवाहनं ‘विठूमाऊली’चा प्रवास सुरू केला आहे. हिंदीतही पौराणिक मालिकांचा हा ट्रेंड चांगलाच गाजतो आहे. सोनीवर ‘मेरे साई’नावाची मालिका सुरू होत असून, दुसरीकडे ‘पृथ्वी वल्लभ’विषयीही चर्चा आहे.
इतर काही मालिका
बहुतांश तरुणाई सध्या मालिका बघते. त्यामुळे प्रेमकथांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांना सासू- सुनेतला ड्रामाही आवडतो. झी मराठीवर ‘हम तो तेरे आशिक है’ नावाची मालिका सुरू होत आहे, तर कलर्स मराठीवर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ आणि स्टार प्रवाहवर ‘नकळत सारे घडले’ या प्रेमकथा सुरू होताहेत. झी युवावर ‘देवाशप्पथ’ येतेय. सोनीवर ‘सास बिना ससूराल- २’, ‘एक दिवाना था’, ‘पोरूस’, ‘गामा पेहलवान’, ‘मांगा है तुझे रबसे’ या मालिका सुरू होताहेत. स्टार भारतवर ‘मरते दम तक’, ‘जीजीमा’, ‘सिद्धीविनायक’ अशा मालिकांची रेलचेल असेल. झी टीव्हीवर ‘दिल ढुंढता है’ नावाची प्रेमकथा, तर स्टार प्लसवर ‘एक्क्यावन’ नावाची अनोखी कथा बघायला मिळणार आहे.
रिअँलिटी शोंचं नावीन्य
सध्या जमाना आहे रिअँलिटी शोंचा. रसिकांच्या मनावर भुरळ घालणारं मराठी ‘सा रे ग म प’ पुन्हा सुरू होतंय, तर दुसरीकडे कलर्स मराठीवरही ‘सूर नवे ध्यास नवा’ची उत्सुकता आहे. त्यामुळे रसिकांना सुरेल पर्वणी मिळेल. झी टॉकीजवर ‘नसते उद्योग’ नावाचा शो बघायला मिळणार आहे. त्यामुळे टीआरपीच्या स्पर्धेत रिअँलिटी शो टिकून राहतील यात शंका नाही.
त्याच-त्याच मालिका पाहून कंटाळा आला असेल, तर प्रेक्षकांनो जरा संयम ठेवा. येत्या काळात जवळपास २२ मालिका टीव्हीवर धडकणार आहेत.
मालिका म्हटल्या, की भांडण, रोमान्स, थरार या गोष्टी आल्याच. हिंदी आणि मराठी चँनेलवर सध्या नवीन मालिकांचा महापूर आला आहे. एकूण २२ नवीन मालिका टीव्हीवर धडकणार आहेत. कोणती मालिका उत्तम याबाबत आता खरी स्पर्धा सुरू होईल. पौराणिक कथा ते थेट सास-बहूच्या कुरघोडींपर्यंत सगळ्या प्रकारच्या विषयांची मेजवानी प्रेक्षकांना नव्या मालिकेत मिळणार आहे. टीआरपीच्या स्पर्धेत स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी या नवीन मालिका आणि त्यांचे दिग्दर्शक काय अनोखं दाखवणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
पौराणिक कथांमध्ये वाढ
सध्या प्रत्येक चॅनलवर एक तरी मालिका पौराणिक घटनांशी संबंधित असते. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सुरू झाली असून, स्टार प्रवाहनं ‘विठूमाऊली’चा प्रवास सुरू केला आहे. हिंदीतही पौराणिक मालिकांचा हा ट्रेंड चांगलाच गाजतो आहे. सोनीवर ‘मेरे साई’नावाची मालिका सुरू होत असून, दुसरीकडे ‘पृथ्वी वल्लभ’विषयीही चर्चा आहे.
इतर काही मालिका
बहुतांश तरुणाई सध्या मालिका बघते. त्यामुळे प्रेमकथांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांना सासू- सुनेतला ड्रामाही आवडतो. झी मराठीवर ‘हम तो तेरे आशिक है’ नावाची मालिका सुरू होत आहे, तर कलर्स मराठीवर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ आणि स्टार प्रवाहवर ‘नकळत सारे घडले’ या प्रेमकथा सुरू होताहेत. झी युवावर ‘देवाशप्पथ’ येतेय. सोनीवर ‘सास बिना ससूराल- २’, ‘एक दिवाना था’, ‘पोरूस’, ‘गामा पेहलवान’, ‘मांगा है तुझे रबसे’ या मालिका सुरू होताहेत. स्टार भारतवर ‘मरते दम तक’, ‘जीजीमा’, ‘सिद्धीविनायक’ अशा मालिकांची रेलचेल असेल. झी टीव्हीवर ‘दिल ढुंढता है’ नावाची प्रेमकथा, तर स्टार प्लसवर ‘एक्क्यावन’ नावाची अनोखी कथा बघायला मिळणार आहे.
रिअँलिटी शोंचं नावीन्य
सध्या जमाना आहे रिअँलिटी शोंचा. रसिकांच्या मनावर भुरळ घालणारं मराठी ‘सा रे ग म प’ पुन्हा सुरू होतंय, तर दुसरीकडे कलर्स मराठीवरही ‘सूर नवे ध्यास नवा’ची उत्सुकता आहे. त्यामुळे रसिकांना सुरेल पर्वणी मिळेल. झी टॉकीजवर ‘नसते उद्योग’ नावाचा शो बघायला मिळणार आहे. त्यामुळे टीआरपीच्या स्पर्धेत रिअँलिटी शो टिकून राहतील यात शंका नाही.