अ‍ॅपशहर

मी ब्राह्मण आहे की नाही याबद्दल फुशारक्या मारत नाही पण...; पराग कान्हेरेची डोळ्यात अंजन टाकणारी पोस्ट

Parag Kanhere Post: 'बिग बॉस मराठी २' मध्ये झळकणारा लोकप्रिय शेफ पराग कान्हेरे याने महाराष्ट्राच्या सध्याच्या स्थितीवर अत्यंत मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट नेटकऱ्यांमध्येही व्हायरल झाली आहे.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2022, 5:13 pm
मुंबई- 'बिग बॉस मराठी २' मध्ये आपला खेळ दाखवणारा लोकप्रिय शेफ पराग कान्हेरे सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र यावेळेस परागने एक वेगळीच पोस्ट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रात सध्या जातीपातींमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोबतच मी ब्राह्मण आहे की नाही याबद्दल फुशारक्या मारत नाही. पण मी सगळ्यात आधी भारतीय आहे. मग मी महाराष्ट्रीयन आहे आणि मग मी माझ्या कुटुंबाचा आहे असं म्हणत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parag kanhere


एक फोटो शेअर करत परागने लिहिलं, 'हे खरोखर विचित्र आहे. महाराष्ट्र सर्वात मोठ्या चक्रीवादळातून जात आहे. ब्राह्मण विरुद्ध जे ब्राह्मण नाहीत. मला माझे शाळेचे दिवस आठवतात, मी सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये होतो. माझे जिगरी मित्र होते केतन माने, सतीश पवार, स्वानंद जोशी, संदीप टकले, विनोद परदेशी, किरण पाटील, उपेश सोनवणे, इशान साठे, शिरीष आपटे, सातव, गोखले, तिखे, शिंदे, गायकवाड,कार्तिक उपासनी, कार्तिक केंधे आणखी काही. आम्ही एकमेकांना जाती, धर्म, आर्थिक स्थिती वगैरे बद्दल कधीच विचारले नव्हते. आम्ही एकमेकांसोबत टिफिन शेअर करायचो. उष्ट खायचो. आम्ही एकमेकांच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी प्यायचो.. बहुतेक आम्ही सर्व शाळेत त्याच 2/3 मुलींच्या मागे जायचो (खरं तर संपूर्ण शाळेत फक्त 2-3 सुंदर मुली होत्या).

View this post on Instagram A post shared by Parag Kanhere (@paragkanhere)

'आता सगळे मोठे झालो आहोत. आम्ही अजूनही भेटतो, जुन्या आठवणी जपतो, कधी कधी त्या आठवणींना उजाळा देत पार्टी करतो. पण आजही कोणीही एकमेकांना विचारत नाही की तुम्ही ब्राह्मण आहात की नाही. आजही एकाच थाळीतून खातो. टिफिनची जागा चांगल्या जेवणाने घेतली. आजही एकाच बाटलीतून पितो. (पाण्याची जागा बिअरने घेतली आहे). मरण्यापूर्वी मला एक दिवस पहायचा आहे, जेव्हा महाराष्ट्रात कोणीही जातीवादावर बोलणार नाही आणि त्यासाठी मला स्वतःपासून सुरुवात करू दे. मी शपथ घेतो, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कोणालाही विचारणार नाही की तो/ती ब्राह्मण आहे की नाही. मी कधीही ब्राह्मण आणि इतरांमध्ये भेद करणार नाही. बघा तुम्ही याच्याशी सहमत आहात का. पटलं तर शेअर करा पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं शिकवूया.' परागची ही पोस्ट सगळ्यांच्या डोळ्यात अंजन टाकणारी ठरली आहे.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज