अ‍ॅपशहर

तब्बल पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर परतला 'काहे दिया परदेस' फेम अभिनेता; मिळालेली तुफान लोकप्रियता

२०१६ साली सुरू झालेल्या 'काहे दिया परदेस' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारा लोकप्रिय अभिनेता आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2023, 1:48 pm
मुंबई- छोटा पडदा म्हणजे फार कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवण्याचं साधन आहे. छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकार इतर कलाकारांच्या तुलनेत लवकर लोकप्रिय होतात आणि घराघरात पोहोचतात. त्यामुळेच त्यांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतं. काही कलाकार कायम छोट्या पडद्यावर प्रेक्षकांशी जोडलेले राहतात तर काही अनेक वर्षांनी दुसऱ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. असाच एक कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका 'काहे दिया परदेस' मधील अभिनेता रिषी सक्सेना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिषी आता हिंदी मालिका 'सावी की सवारी' मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rishi saxena


View this post on Instagram A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)

रिषीने 'काहे दिया परदेस' मालिकेत शिवची भूमिका साकारली होती. शिव हा गंगा घाटाशेजारी राहणारा होता. तर गौरी ही मराठी मुलगी होती. मोहन जोशी, शुभांगी गोखले यांनी या मालिकेला चार चांद लावले होते. आता 'सावी की सवारी' मालिकेत तो मानव या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याने सोशल मीडियावर आपल्या आगामी मालिकेबद्दल पोस्टही केली आहे. त्याने मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिलं, 'मानव जैन तुमच्या भेटीला उज्जैनमध्ये येतोय पण ३ नाही तर ४ एप्रिलपासून. एका दिवस आणखी वाट पाहा.' त्याच्या या पोस्टवर चाहतेही आनंदी झाले आहेत. अनेक वर्षांनी पुन्हा एकदा रिषीला छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार म्हणून नेटकरी खुश आहेत. रिषीच्या अनेक मित्रांनी आणि कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)

अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच 'बिग बॉस मराठी ४' मधील स्पर्धक तेजस्विनी लोणारी हिनेदेखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रिषी यापूर्वी अनेक चित्रपट आणि ओटीटी माध्यमांवर दिसला आहे. मात्र आता पुन्हा छोट्या पडद्यावर येताना त्याने आनंद व्यक्त केला आहे. 'काहे दिया परदेस' मालिकेतील त्याची आणि सायली संजीव यांची जोडी प्रचंड गाजली होती.
'करण- अर्जुन'मध्ये सलमानऐवजी अजय देवगण दिसला असता; शाहरुखची फसवणूक जिव्हारी लागली आणि...

महत्वाचे लेख