मुंबई :टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेली १३ वर्षं ही मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. मालिकेतील पात्रदेखील प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याची झाली आहेत. या मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत.
ते आता ठीक असून मुंबईत पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करण्याची प्रतिक्षा करत आहे, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. 'मी अगदी ठीक आहे. सध्या उपचार सुरु आहेत आणि मला आशा आहे की मी लवकरच पूर्णपणे ठीक होईन. आता लवकरच मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि मी मुंबईत काम करण्यासाठी उत्सुक आहे. मी प्रत्येक महिन्याला केमोथेरपी घेत आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं की, मी काम करू शकतो. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे', असं ते भावूक होऊन म्हणाले.
त्याचबरोबर घनश्याम नायक यांनी आपल्या प्रकृतीविषयी सांगितले की ते सध्या बरे आहेत. पण केमोथेरपीचे सत्र सुरू केले असून उपचार पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. घनश्याम नायक काही दिवसांपूर्वी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या काही भागाचे चित्रीकरण करण्यासाठी दमण आणि गुजरातला गेले होते. घनश्याम नायक यांनी सांगितले की ते जवळपास चार महिन्यांनंतर चित्रीकरणासाठी गेले होते. सर्वांना भेटून त्यांना खूप आनंद झाला.
ते आता ठीक असून मुंबईत पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करण्याची प्रतिक्षा करत आहे, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. 'मी अगदी ठीक आहे. सध्या उपचार सुरु आहेत आणि मला आशा आहे की मी लवकरच पूर्णपणे ठीक होईन. आता लवकरच मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि मी मुंबईत काम करण्यासाठी उत्सुक आहे. मी प्रत्येक महिन्याला केमोथेरपी घेत आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं की, मी काम करू शकतो. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे', असं ते भावूक होऊन म्हणाले.
त्याचबरोबर घनश्याम नायक यांनी आपल्या प्रकृतीविषयी सांगितले की ते सध्या बरे आहेत. पण केमोथेरपीचे सत्र सुरू केले असून उपचार पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. घनश्याम नायक काही दिवसांपूर्वी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या काही भागाचे चित्रीकरण करण्यासाठी दमण आणि गुजरातला गेले होते. घनश्याम नायक यांनी सांगितले की ते जवळपास चार महिन्यांनंतर चित्रीकरणासाठी गेले होते. सर्वांना भेटून त्यांना खूप आनंद झाला.