मुंबई: घराघरात पाहिली जाणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचं मनोरंजन करत आहे. छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळं ही मालिका टीआरपीच्या यादीत सुद्धा टॉप आहे. केवळ हिंदी भाषिक नव्हे तर इतर भाषिकही ही मालिका आवडीनं पाहतात. मुंबईतल्या गोरेवात परिसरातील काल्पनीक अशा पावडर गल्लीतल्या गोकूळधाम सोसायटीभोवती फिरणारी ही मालिका असल्यानं मराठी भाषिक प्रेक्षकांना ही मालिका अधिक भावते. मराठी प्रेक्षकांची मालिकेला मिळणारी पसंती लक्षात घेता आता ही मालिका मराठी भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'गोकुळधामची दुनियादारी' या नावानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका एका मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. गोकुळधाम सोसायटी ही गोरेगावच्या पावडर गल्लीमधील एक काल्पनिक सोसायटी आहे. गोकुळधाममधील मजेशिर अशा पात्रांच्या रोजच्या आयुष्यावर या मालिकेचं कथानक फिरतं. जेठालाल, दयाबेन, तारक, भिडे मास्तर, डॉ हाथी, रोशनसिंग सोढी, पत्रकार पोपटलाल, टप्पू आणि त्याची सेना अशा अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
वाचा: जेठालाल म्हणतोय दयाबेनसाठी दिशाच परफेक्ट
१८ जुलै २००८ रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरु झाली होती. आता या मालिकेनं २८०० हून अधिक भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेतून केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात नाही तर मालिकेच्या शेवटी एक सामाजिक संदेशही दिला जातो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींना मालिकेतून हलक्या फुलक्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येतं. त्यामुळं मालिकेचं विविध स्तरातून कौतुक झालं आहे.
दहा वर्षांपूर्वी मालिका सुरू केली, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला एकत्र येऊन बघायला आवडेल हाच विचार डोक्यात होता. विनोदी मालिका असली तरी त्यातून सामाजिक प्रबोधन करताना आम्ही आपुलकीचे बंध जपतो. रोजच्या दैनंदिन जीवनातील तणाव दूर करण्यासाठी निखळ विनोदी मालिका बनवायची म्हणत आम्ही हा प्रवास सुरू केला. लोकांकडून इतके भरभरून प्रेम मिळेल असा विचारही केला नव्हता. मालिकेच्या यशामागे १२६ जणांची टीम आहे.
- असितकुमार मोदी, निर्माते
वाचा: जेठालालसाठी परत येणार दयाबेन! पण असेल मोठा ट्विस्ट
'गोकुळधामची दुनियादारी' या नावानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका एका मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. गोकुळधाम सोसायटी ही गोरेगावच्या पावडर गल्लीमधील एक काल्पनिक सोसायटी आहे. गोकुळधाममधील मजेशिर अशा पात्रांच्या रोजच्या आयुष्यावर या मालिकेचं कथानक फिरतं. जेठालाल, दयाबेन, तारक, भिडे मास्तर, डॉ हाथी, रोशनसिंग सोढी, पत्रकार पोपटलाल, टप्पू आणि त्याची सेना अशा अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
वाचा: जेठालाल म्हणतोय दयाबेनसाठी दिशाच परफेक्ट
१८ जुलै २००८ रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरु झाली होती. आता या मालिकेनं २८०० हून अधिक भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेतून केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात नाही तर मालिकेच्या शेवटी एक सामाजिक संदेशही दिला जातो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींना मालिकेतून हलक्या फुलक्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येतं. त्यामुळं मालिकेचं विविध स्तरातून कौतुक झालं आहे.
दहा वर्षांपूर्वी मालिका सुरू केली, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला एकत्र येऊन बघायला आवडेल हाच विचार डोक्यात होता. विनोदी मालिका असली तरी त्यातून सामाजिक प्रबोधन करताना आम्ही आपुलकीचे बंध जपतो. रोजच्या दैनंदिन जीवनातील तणाव दूर करण्यासाठी निखळ विनोदी मालिका बनवायची म्हणत आम्ही हा प्रवास सुरू केला. लोकांकडून इतके भरभरून प्रेम मिळेल असा विचारही केला नव्हता. मालिकेच्या यशामागे १२६ जणांची टीम आहे.
- असितकुमार मोदी, निर्माते
वाचा: जेठालालसाठी परत येणार दयाबेन! पण असेल मोठा ट्विस्ट