मुंबई- 'चला हवा येऊ द्या'मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. समाजमाध्यमांवर ती पती निखिल शेठबरोबर नेहमी त्यांचे फोटो आणि आठवणी शेअर करत असते. त्यांच्या नात्याविषयी श्रेया म्हणते, 'आम्हा दोघांचा स्वभाव पूर्णतः वेगळा आहे म्हणून कदाचित आमचं छान जुळलं. आमच्या वयामध्ये अंतर असल्यामुळेच आमचं नातं परिपक्व आणि सुपरकूल आहे. निखिल पुण्याचा असल्यानं त्याला निवांत आयुष्य जगायला आवडतं प्रत्येक गोष्ट निवांतपणे करण्यावर निखिलचा भर असून मी लगेच टेन्शनमध्ये येते.
माझ्या शांत आणि स्थिर स्वभावाचं श्रेय निखिलला जातं. आम्ही एकमेकांचे उत्तम समीक्षक आहोत. घरामध्येच आपल्या कामाचा समीक्षक असल्यामुळे आपलं काम उत्तमोत्तम होत जातं. मनोरंजनसृष्टीत काम करताना एक स्त्री म्हणून मला येणाऱ्या अडचणी तो याच क्षेत्रातला असल्यानं त्यानं कायम समजून घेतल्या आहेत. मला बाहेर चांगलं काम करता येण्यासाठी त्यानं घरात फार पोषक वातावरण निर्माण केलं. माझ्यामागे निखिल भक्कमपणे उभा राहिल्यामुळेच आज मी हे यश पाहू शकतेय.'
श्रेया आणि निखिल यांची लव्हस्टोरीही फार रंजक आहे. सुरुवातीला दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता. त्यांच्यात मैत्री तर सोडाच पण कडाक्याची भांडणं व्हायची. पण निखिलची निर्मिती असलेल्या मालिकेला पुरस्कार मिळाल्यावर श्रेयाने अभिनंदनाचा फोन केला होता. यानंतरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१५ मध्ये श्रेया आणि निखिल यांनी लग्न केलं.
दरम्यान, श्रेयाचा वाढदिवसही फेब्रुवारी महिन्यातच येतो, त्यामुळे अभिनेत्रीसाठी फेब्रुवारी महिना फार खास असतो. श्रेयाने फक्त मराठीतच नाही तर हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतही काम केलं आहे. पण या सगळ्यात चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. आजही ती या शोच्या मूळ टीमचा एक भाग आहे.
माझ्या शांत आणि स्थिर स्वभावाचं श्रेय निखिलला जातं. आम्ही एकमेकांचे उत्तम समीक्षक आहोत. घरामध्येच आपल्या कामाचा समीक्षक असल्यामुळे आपलं काम उत्तमोत्तम होत जातं. मनोरंजनसृष्टीत काम करताना एक स्त्री म्हणून मला येणाऱ्या अडचणी तो याच क्षेत्रातला असल्यानं त्यानं कायम समजून घेतल्या आहेत. मला बाहेर चांगलं काम करता येण्यासाठी त्यानं घरात फार पोषक वातावरण निर्माण केलं. माझ्यामागे निखिल भक्कमपणे उभा राहिल्यामुळेच आज मी हे यश पाहू शकतेय.'
श्रेया आणि निखिल यांची लव्हस्टोरीही फार रंजक आहे. सुरुवातीला दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता. त्यांच्यात मैत्री तर सोडाच पण कडाक्याची भांडणं व्हायची. पण निखिलची निर्मिती असलेल्या मालिकेला पुरस्कार मिळाल्यावर श्रेयाने अभिनंदनाचा फोन केला होता. यानंतरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१५ मध्ये श्रेया आणि निखिल यांनी लग्न केलं.
दरम्यान, श्रेयाचा वाढदिवसही फेब्रुवारी महिन्यातच येतो, त्यामुळे अभिनेत्रीसाठी फेब्रुवारी महिना फार खास असतो. श्रेयाने फक्त मराठीतच नाही तर हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतही काम केलं आहे. पण या सगळ्यात चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. आजही ती या शोच्या मूळ टीमचा एक भाग आहे.