मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
गेल्या ६८ वर्षांत भारत आणि पाकिस्तानमध्ये किती युद्ध झाली?, या प्रश्नाचं उत्तर बरेच जण 'तीन' असं देतील. १९६५, १९७१ आणि कारगील ही युद्ध आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. काही जण फाळणी हेही युद्धच मानून चार युद्ध झाल्याचं सांगतील. पण, भारत-पाकमधील पाचवं 'युद्ध' फारसं कुणालाच ठाऊक नाही. पाण्याखालचा हा थरार आता 'द गाझी अटॅक' या चित्रपटाच्या रूपाने बॉलिवूडच्या पडद्यावर येतोय. निर्माता करण जोहरनं त्याचा एक जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावरून शेअर केला आहे. अर्थात, 'सिनॅमॅटिक लिबर्टी' घेऊन ही युद्धाची गोष्ट रंजक करण्याचा प्रयत्न निर्माता-दिग्दर्शकांनी केल्याचं त्यात स्पष्टपणे जाणवतं.
राणा दग्गुबाती आणि तापसी पन्नू हे या सिनेमात नायक-नायिका असून के के मेनन, अतुल कुलकर्णी यांचीही चित्रपटात तगडी भूमिका दिसतेय. गेल्याच आठवड्यात काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी हेही या ट्रेलरमध्ये नौदल अधिकारी म्हणून झळकलेत. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ही गोष्ट ऐकणं हा अनुभवही प्रेक्षकांसाठी खास असेल. तसंच, समुद्राखाली झालेल्या युद्धावर आधारित हा भारतातील पहिलाच सिनेमा असल्याचा दावाही केला जातोय. १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
https://t.co/aFqkfuEZEg pic.twitter.com/E1iCaHOeQV — Karan Johar (@karanjohar) January 11, 2017 काही महिन्यांपूर्वी 'ऐ दिल है मुश्किल'मुळे करण जोहर चांगलाच अडचणीत सापडला होता. पाकिस्तानी कलाकारांच्या बाजूने बोलणं त्याला महागात पडलं होतं. परंतु, आता भारत-पाकमधील 'युद्धा'वर आधारित सिनेमा करून त्यानं सिनेप्रेमींची मनं जिंकण्याचाच प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
गेल्या ६८ वर्षांत भारत आणि पाकिस्तानमध्ये किती युद्ध झाली?, या प्रश्नाचं उत्तर बरेच जण 'तीन' असं देतील. १९६५, १९७१ आणि कारगील ही युद्ध आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. काही जण फाळणी हेही युद्धच मानून चार युद्ध झाल्याचं सांगतील. पण, भारत-पाकमधील पाचवं 'युद्ध' फारसं कुणालाच ठाऊक नाही. पाण्याखालचा हा थरार आता 'द गाझी अटॅक' या चित्रपटाच्या रूपाने बॉलिवूडच्या पडद्यावर येतोय. निर्माता करण जोहरनं त्याचा एक जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावरून शेअर केला आहे. अर्थात, 'सिनॅमॅटिक लिबर्टी' घेऊन ही युद्धाची गोष्ट रंजक करण्याचा प्रयत्न निर्माता-दिग्दर्शकांनी केल्याचं त्यात स्पष्टपणे जाणवतं.
राणा दग्गुबाती आणि तापसी पन्नू हे या सिनेमात नायक-नायिका असून के के मेनन, अतुल कुलकर्णी यांचीही चित्रपटात तगडी भूमिका दिसतेय. गेल्याच आठवड्यात काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी हेही या ट्रेलरमध्ये नौदल अधिकारी म्हणून झळकलेत. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ही गोष्ट ऐकणं हा अनुभवही प्रेक्षकांसाठी खास असेल. तसंच, समुद्राखाली झालेल्या युद्धावर आधारित हा भारतातील पहिलाच सिनेमा असल्याचा दावाही केला जातोय. १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
https://t.co/aFqkfuEZEg pic.twitter.com/E1iCaHOeQV — Karan Johar (@karanjohar) January 11, 2017 काही महिन्यांपूर्वी 'ऐ दिल है मुश्किल'मुळे करण जोहर चांगलाच अडचणीत सापडला होता. पाकिस्तानी कलाकारांच्या बाजूने बोलणं त्याला महागात पडलं होतं. परंतु, आता भारत-पाकमधील 'युद्धा'वर आधारित सिनेमा करून त्यानं सिनेप्रेमींची मनं जिंकण्याचाच प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.