विनय राऊळ
'कुठल्याही चित्रपटाचे हिरो-हिरॉइन्स सगळीकडे झळकत असतात. पण, सिनेमासाठी त्याची कथाच सबकुछ असते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये मी लेखकांना सगळ्यात जास्त महत्त्व देते. सिनेमाचा असली हिरो तोच आहे', हे म्हणणं आहे अनुष्का शर्माचं. 'सुई धागा'च्या निमित्तानं तिच्याशी झालेल्या गप्पा...
'सुई धागा' चित्रपटामध्ये एक नॉन ग्लॅमरस भूमिका साकारताना काय वाटलं?
कलाकार असल्यानं आमच्या वाट्याला बऱ्याच भूमिका येतात. तसं पाहायला गेलं, तर मी आजवर ग्लॅमरस भूमिका फार कमी साकारल्या आहेत. आतापर्यंतच्या सगळ्या भूमिकांशी मी जोडले गेले होते. कलाकार असल्यानं आम्हाला ती सवयच असते, की एखादी भूमिका साकारायची असेल तर आम्ही त्यात स्वतःला संपूर्णपणे झोकून देतो.
हातमागासारखा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येण्याचा विचार कसा काय केलात?
'सुई धागा' हा चित्रपट बनवण्याचं खरं कारण म्हणजे या चित्रपटात दाखवला गेलेला रोजगार. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द यावर तो आधारित आहे. एखाद्याच्या आयुष्यात किती संघर्ष असतो. संघर्षावर मात करत आणि न घाबरता तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायचं असतं. तुमच्यातली कला दाखवणं तुमच्या हातात आहे. त्यासाठी कुणालाही घाबरण्याची गरज नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे हातमागाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्याचा सामना कसा करावा लागला हे यात दाखवलं आहे. आणखीही काही गोष्टी अशा आहेत ज्या लोकांशी जोडल्या जातील.
तुझ्या निर्मिती संस्थेमध्ये नव्या लोकांना संधी दिली जाते. आताच्या लेखकांबद्दल तुझं काय म्हणणं आहे?
माझ्या निर्मितीसंस्थेत आम्ही नेहमीच लेखकांना प्राधान्य देत आलो आहोत. एखाद्या चित्रपटामध्ये लेखकांचं योगदान फारच महत्त्वाचं असतं. कुठलाही चित्रपट बनवायचा झाला तरी सारं काही लिखाणापासूनच सुरू होतं. त्यामुळे लेखकांना त्यांचं श्रेय देणं फार महत्त्वाचं असतं. त्यांना डावलून चालणार नाही. माझ्या चित्रपटांमध्ये लेखनावर खास लक्ष दिलं जातं. लेखनाकडे आपण जितकं जास्त लक्ष देऊ तितके चांगले चित्रपट बनतील. पण, सध्या फार कमी लोक यावर लक्ष देताहेत.
तुझ्या आयुष्यात संघर्षाचा काळ कुठला होता?
माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. एका सामान्य कटुंबातून आल्यानं पैशांची चणचण नेहमीच असायची. माझ्या आई-बाबांनी त्यांच्या आयुष्यातला बराच काळ कर्ज फेडण्यात घालवला. नंतर माझ्या भावाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यावर त्यानं हातभार लावला. हळूहळू मीसुद्धा मॉडेलिंग क्षेत्रात यायला लागले. मग काम चांगलं होत गेलं आणि ज्यावेळी मी मुंबईत स्वतःचं घर घेतलं तेव्हा मी एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
येत्या काळात कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतील?
गेल्या काही वर्षांत मी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातली भूमिकाही अत्यंत वेगळी आहे. सहसा मी भविष्यात कोणते चित्रपट करायचे किंवा कोणत्या भूमिका साकारायच्या याचा जास्त विचार करत नाही. पण, येत्या काळात मला एखादा चरित्रपट करायला मिळाला तर नक्कीच आवडेल. कोणाचा चरित्रपट हे अद्याप ठरवलेलं नाही. पण संधी मिळाल्यास नक्की करेन.
एकमेकांवर अपार प्रेम करणारी जोडपी चित्रपटांमध्ये दिसतात. पण, खऱ्या आयुष्यात अशी जोडपी कशी वागत असतील असं तुला वाटतं?
चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी प्रेमकथा ही अगदी वास्तववादी आहे. खऱ्या आयुष्यात जोडपी एकमेकांवरील प्रेम खूप छोट्या-छोट्या गोष्टींतून दाखवतात. कधीकधी त्यांना व्यक्तसुद्धा होता येत नाही. कारण तशी परिस्थिती नसते. अगदी वेगळ्या पद्धतीनं ते एकमेकांवरील प्रेम दाखवतात. त्यांच्या आयुष्यात संघर्षच खूप असतो.
भविष्यात कोणत्या भूमिका साकारायच्या याचा जास्त विचार मी करत नाही. पण, एखादा चरित्रपट करायला मिळाला तर नक्कीच आवडेल.
'कुठल्याही चित्रपटाचे हिरो-हिरॉइन्स सगळीकडे झळकत असतात. पण, सिनेमासाठी त्याची कथाच सबकुछ असते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये मी लेखकांना सगळ्यात जास्त महत्त्व देते. सिनेमाचा असली हिरो तोच आहे', हे म्हणणं आहे अनुष्का शर्माचं. 'सुई धागा'च्या निमित्तानं तिच्याशी झालेल्या गप्पा...
'सुई धागा' चित्रपटामध्ये एक नॉन ग्लॅमरस भूमिका साकारताना काय वाटलं?
कलाकार असल्यानं आमच्या वाट्याला बऱ्याच भूमिका येतात. तसं पाहायला गेलं, तर मी आजवर ग्लॅमरस भूमिका फार कमी साकारल्या आहेत. आतापर्यंतच्या सगळ्या भूमिकांशी मी जोडले गेले होते. कलाकार असल्यानं आम्हाला ती सवयच असते, की एखादी भूमिका साकारायची असेल तर आम्ही त्यात स्वतःला संपूर्णपणे झोकून देतो.
हातमागासारखा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येण्याचा विचार कसा काय केलात?
'सुई धागा' हा चित्रपट बनवण्याचं खरं कारण म्हणजे या चित्रपटात दाखवला गेलेला रोजगार. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द यावर तो आधारित आहे. एखाद्याच्या आयुष्यात किती संघर्ष असतो. संघर्षावर मात करत आणि न घाबरता तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायचं असतं. तुमच्यातली कला दाखवणं तुमच्या हातात आहे. त्यासाठी कुणालाही घाबरण्याची गरज नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे हातमागाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्याचा सामना कसा करावा लागला हे यात दाखवलं आहे. आणखीही काही गोष्टी अशा आहेत ज्या लोकांशी जोडल्या जातील.
तुझ्या निर्मिती संस्थेमध्ये नव्या लोकांना संधी दिली जाते. आताच्या लेखकांबद्दल तुझं काय म्हणणं आहे?
माझ्या निर्मितीसंस्थेत आम्ही नेहमीच लेखकांना प्राधान्य देत आलो आहोत. एखाद्या चित्रपटामध्ये लेखकांचं योगदान फारच महत्त्वाचं असतं. कुठलाही चित्रपट बनवायचा झाला तरी सारं काही लिखाणापासूनच सुरू होतं. त्यामुळे लेखकांना त्यांचं श्रेय देणं फार महत्त्वाचं असतं. त्यांना डावलून चालणार नाही. माझ्या चित्रपटांमध्ये लेखनावर खास लक्ष दिलं जातं. लेखनाकडे आपण जितकं जास्त लक्ष देऊ तितके चांगले चित्रपट बनतील. पण, सध्या फार कमी लोक यावर लक्ष देताहेत.
तुझ्या आयुष्यात संघर्षाचा काळ कुठला होता?
माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. एका सामान्य कटुंबातून आल्यानं पैशांची चणचण नेहमीच असायची. माझ्या आई-बाबांनी त्यांच्या आयुष्यातला बराच काळ कर्ज फेडण्यात घालवला. नंतर माझ्या भावाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यावर त्यानं हातभार लावला. हळूहळू मीसुद्धा मॉडेलिंग क्षेत्रात यायला लागले. मग काम चांगलं होत गेलं आणि ज्यावेळी मी मुंबईत स्वतःचं घर घेतलं तेव्हा मी एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
येत्या काळात कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतील?
गेल्या काही वर्षांत मी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातली भूमिकाही अत्यंत वेगळी आहे. सहसा मी भविष्यात कोणते चित्रपट करायचे किंवा कोणत्या भूमिका साकारायच्या याचा जास्त विचार करत नाही. पण, येत्या काळात मला एखादा चरित्रपट करायला मिळाला तर नक्कीच आवडेल. कोणाचा चरित्रपट हे अद्याप ठरवलेलं नाही. पण संधी मिळाल्यास नक्की करेन.
एकमेकांवर अपार प्रेम करणारी जोडपी चित्रपटांमध्ये दिसतात. पण, खऱ्या आयुष्यात अशी जोडपी कशी वागत असतील असं तुला वाटतं?
चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी प्रेमकथा ही अगदी वास्तववादी आहे. खऱ्या आयुष्यात जोडपी एकमेकांवरील प्रेम खूप छोट्या-छोट्या गोष्टींतून दाखवतात. कधीकधी त्यांना व्यक्तसुद्धा होता येत नाही. कारण तशी परिस्थिती नसते. अगदी वेगळ्या पद्धतीनं ते एकमेकांवरील प्रेम दाखवतात. त्यांच्या आयुष्यात संघर्षच खूप असतो.
भविष्यात कोणत्या भूमिका साकारायच्या याचा जास्त विचार मी करत नाही. पण, एखादा चरित्रपट करायला मिळाला तर नक्कीच आवडेल.