महिलांचा रेल्वेप्रवास असुरक्षित असल्याचं न्यायालयानं म्हटल्यानंतर, याबाबत कॉलेज तरुण-तरुणींचं म्हणणं 'युवा कट्टा'वर जाणून घेण्यात आलं. आजही रेल्वेनं प्रवास करणारी अभिनेत्री पल्लवी पाटीलही यावर व्यक्त झाली आहे.
मुंबईची लोकसंख्या वेगानं वाढत चालली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी भर पडत असते. महिला प्रवाशांची संख्याही वाढतेय. तरुणींना-स्त्रियांना अनेक अडचणींचा सामना करत रोजचा लोकलप्रवास करावा लागतो. महिला डब्यांची संख्या अपुरी पडतेय. लोकलवरचा भार कमी व्हावा म्हणून मेट्रो आली. मेट्रोमध्ये रांग लावून चढण्याची शिस्त उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करताना मात्र प्रवासी विसरतात. ही शिस्त पाळली गेली, तर रोजचा प्रवास काही प्रमाणात तरी सुखकर होईल. महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात रेल्वे पोलीस दल अपयशी ठरतंय असं मात्र मला मनापासून वाटतं. कठीण प्रसंगी रेल्वेच्या हेल्पलाइनचा काडीमात्र उपयोग होत नाही हा अनुभव अनेक महिला प्रवाशांना येतो. महिला डब्यामध्ये महिला प्रवाशांवर हल्ले होतात, प्रवासादरम्यान महिलांचे विनयभंग होत असतात. हे सगळं खूपच संतापजनक आहे. शिक्षण-नोकरीनिमित्त महिलांना रोज प्रवास करावा लागतो. तो सुरक्षित का होऊ शकत नाही? महिलांना सुरक्षित वाटेल यासाठी रेल्वे प्रशासनानं कठोर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे.
कॉलेजिअन्सचं म्हणणं वाचा 'युवा कट्टा'वर...६