अ‍ॅपशहर

जेव्हा आलिया भट्ट गाते वरुणचे गाणे...

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनी 'कलंक' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. याच वेळी दोघांनीही अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत चित्रपटाचे प्रमोशन केले होते. यावेळी वरुणने लिहिलेले एक छान गाणे आलियांने स्वत: गायले होते. आलिया भट्ट आणि वरुण धवने 'कलंक' चित्रपटाचे प्रमोशन करताना अनेक शहरांमध्ये न जाता त्यांनी 'सा रे गा मा पा' या संगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमांद्वारे आलियाने आपले गायन कौशल्य दाखवत सर्वांना सुखद धक्का दिला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2019, 1:38 pm
मुबंई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम varun-and-alia-maharashtrat


वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनी 'कलंक' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. याच वेळी दोघांनीही अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत चित्रपटाचे प्रमोशन केले होते. यावेळी वरुणने लिहिलेले एक छान गाणे आलियांने स्वत: गायले होते. आलिया भट्ट आणि वरुण धवने 'कलंक' चित्रपटाचे प्रमोशन करताना अनेक शहरांमध्ये न जाता त्यांनी 'सा रे गा मा पा' या संगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमांद्वारे आलियाने आपले गायन कौशल्य दाखवत सर्वांना सुखद धक्का दिला होता.

'हायवे' या चित्रपटातील 'सुहा साहा' या गाण्याला अलियाने आवाज दिला होता. याशिवाय, 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटात 'समझावां' गाण्यातही तिने आवाज दिला आहे. १५ मार्चला वरुणने त्याच्या वाढदिवसाला आलियाकडून ३ तास गायन करून घेतले होते. ही माहिती आलियानेच या संगीत कार्यक्रमादरम्यान दिली.

'कितने दिनों के बाद, आया तू मुझको याद' हे वरूणने लिहलेले गाणे मी गायले होते असे आलियाने कार्यक्रमात सांगितले. या शोदरम्यान वरुणच्या सांगण्यावरून आलियाने 'लव स्टोरी' या चित्रपटामधील 'याद आ रही है' हे गाणे देखील गायले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज