'कौन बनेगा करोडपती'नतंर शाहरुख खान 'टेड टॅाक्स इंडिया' हा टॅाक शो घेऊन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहे. या शोमध्ये शाहरुख सूत्रसचांलन करणार असून पहिल्या भागात त्याचा खास मित्र करण जोहर व भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हे हजेरी लावणार आहेत.
पहिल्या भागाच्या चित्रिकरणासाठी शाहरुख आणि करण हे ठरलेल्या वेळेपेक्षा तीन ते चार तास उशीर आले. त्यामुळं मितालीला खूप वेळ वाट बघावी लागली. शाहरुखला त्याची ही चूक लक्षात येताच त्यानं मितालीची माफी मागितली व त्याच्या उशिरा येण्याचं कारण सांगितलं.
इतकंच नव्हे तर, त्यानं मुलाखतीसाठी तिला मदतही केली. सर्वकाही ठीक असल्याची खात्री करूनच त्यानं चित्रिकरणाला सुरुवात केली. या शोच्या पहिल्या भागात 'बदलते नातेसंबध' या विषयावर मिताली व करण बोलताना दिसणार आहेत.
पहिल्या भागाच्या चित्रिकरणासाठी शाहरुख आणि करण हे ठरलेल्या वेळेपेक्षा तीन ते चार तास उशीर आले. त्यामुळं मितालीला खूप वेळ वाट बघावी लागली. शाहरुखला त्याची ही चूक लक्षात येताच त्यानं मितालीची माफी मागितली व त्याच्या उशिरा येण्याचं कारण सांगितलं.
इतकंच नव्हे तर, त्यानं मुलाखतीसाठी तिला मदतही केली. सर्वकाही ठीक असल्याची खात्री करूनच त्यानं चित्रिकरणाला सुरुवात केली. या शोच्या पहिल्या भागात 'बदलते नातेसंबध' या विषयावर मिताली व करण बोलताना दिसणार आहेत.