अ‍ॅपशहर

'हेरा फेरी'ला झाली २१ वर्ष, सुनील शेट्टी- अक्षय कुमारला आठवले जुने दिवस

सुपरहिट चित्रपट 'हेरा फेरी'ला आज २१ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी या चित्रपटाच्या शूटिंगवेळीच्या मजेदार आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत.

मुंबई: अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'हेरा फेरी' त्यावेळी खूपच हिट झाला होता. कॉमेडी ड्रामा, परफेक्ट कॉमिक टाइमिंग आणि गाणी असलेला चित्रपट एक एंटरटेन्मेट पॅकेज होता. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला आज २१ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hera pheri 21st anniversary akshay kumar and suniel shetty shared memories
'हेरा फेरी'ला झाली २१ वर्ष, सुनील शेट्टी- अक्षय कुमारला आठवले जुने दिवस


अभिनेता सुनील शेट्टीनं परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत एक ट्वीट केलं आहे. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, अनेकदा वेळ कसा निघून जातो हे समजत नाही. असं वाटतंय मी एक आत्ताच डोळ्यांची उघडझाप केली आणि २१ वर्ष पूर्ण झाली. आम्ही किती दमदार चित्रपट तयार केला होता ना प्रियदर्शन, अक्षय कुमार, परेश रावल, गुलशन ग्रोवर, तबू. आज ओमपुरीजी यांची खूप आठवण येत आहे.


सुनील शेट्टीच्या या ट्वीटवर अभिनेता अक्षय कुमारनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षयनं लिहिलं, 'मी सहमत आहे. त्यावेळी तर आपल्याला हे सुद्धा माहीत नव्हतं की नेमका काय चित्रपट शूट करत आहोत. प्रत्येक सीन आधीच्या सीन पेक्षा अधिक चांगला होता. खासकरून धोतीचा सीन सर्वात मजेदार होता. जिनियस प्रियदर्शन सर आणि निरज वोरा यांचे एपिक डायलॉग'


एका मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचा तिसरा पार्ट सुद्धा लवकरच तयार होणार आहे. यासाठी चाहते सुद्धा खूप उत्सुक आहेत. याबाबत ई-टाइम्सशी बोलताना परेश रावल यांनी सांगितलं, 'मी तिसऱ्या भागासाठी तयार आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा इतर चित्रपटांमध्ये फारशा पाहायला मिळत नाही. त्यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग नक्की येईल. ही फ्रँचाइझी पुढे चालू राहायला हवी आणि मला वाटतं सध्याचा काळ हा कॉमेडीसाठी नक्कीच योग्य आहे.'

महत्वाचे लेख