पूनम सिंग बिष्ट
अक्षय खन्ना त्याच्या निवडक सिनेमांमुळे चर्चेत राहतो. पण मध्येच दोन-तीन वर्ष तो गायब असतो. या काळात तो नक्की काय करतो, ब्रेकनंतर परत येणं कितपत कठीण असतं, अशा अनेक गोष्टींबाबत त्यानं आगामी ‘मॉम’ चित्रपटानिमित्त मटाशी गप्पा मारल्या. वेबसीरिजमुळे टीव्ही, सिनेइंडस्ट्री धास्तावली असली, तरी अक्षय मात्र त्यावर बेहद्द खूश आहे…
गेली दोन-तीन वर्ष अक्षय खन्ना सिनेमांतून दिसला नाही. वडिल विनोद खन्ना यांच्या निधनामुळेही तो अस्वस्थ असला, तरी त्यांच्याविषयी काही बोलायला तो तयार नाही. बाबांबद्दल बोलेन, पण आत्ता नाही. अजून त्यासाठी मी तयार नाही, असं अक्षय म्हणतो. सध्या तरुणाईची पसंती वेबसीरिजना मिळत असल्यानं टीव्ही आणि सिनेमावाल्यांपुढे नवं आव्हान आहे. स्वतः अक्षय मात्र वेबसीरिजचा चाहता आहे. ‘हल्ली मी रोज टीव्ही आणि वेबसीरिज आवडीने बघतो. वेबसीरीज बघण्याचं तर मला वेड लागलंय म्हणा ना. वेबसीरिज बघताना हे प्रकर्षाने जाणवतं, की जी गोष्ट सांगायची आहे ती कुठलीही काटछाट न करता इथे बिनधास्त केली जाते. प्रेक्षक म्हणून यावर समाधानी आहे. उगीच स्वतःच्या स्क्रिप्ट्स घेऊन दारोदार भटकण्याऐवजी तरुण-तरुणी इथे व्यक्त होतात. खूप भन्नाट आहे हे सगळं’, असं तो म्हणतो.
फक्त अभिनयच
अभिनायाव्यतिरिक्त अजून कुठलीच गोष्ट मला माहित नाही. ना मी कुठला वेगळा व्यवसाय करतो, ना मला कुठला छंद आहे. गेली अडीच वर्ष मला व्यक्त होता येत नव्हतं. एका कलाकारासाठी ही खूप वाईट गोष्ट आहे. माझी घुसमट झाली होती. सिनेइंडस्ट्री फक्त वर्तमानात जगते, तुमचा संघर्ष हा वैयक्तिक असतो. लोक त्याकाळात काय विचार करतात, कसे वागतात या फंदात मी पडलोच नाही. ऑडीशन्स दिल्या आणि काम मिळवली. त्यानंतर आत्ता परत जोमानं कामाला लागलो आहे.
मुस्कटदाबीमुळेच…
सिनेमा सोडून मी वेगळं काही केलं नाही. म्हणून त्याचा अनुभव जोडून मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलतो. अभिनेत्रींना कपड्यांमुळे सोशल मीडियावर जे टार्गेट केलं जातंय ते चुकीचं आहे. त्याला कारण आपला समाज आणि चुकीचे विचार हेच आहेत. आपल्या संविधानात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असून देखील आली नेहमीच मुस्कटदाबी होते. उदाहरणार्थ सिनेमात कुठली दृश्यं ठेवायची, भाषा कशी असावी याचा निर्णय सेन्सार बोर्ड घेतं. दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काय दाखवायचं यावर गदा आणली जाते. यामुळे सिनेमाचा मूळ उद्देश हरवताना दिसतो. घरात किती बोलावं, कसं बोलावं यावरही निर्बंध असतात. मग सोशल मीडियावर हवं तसं व्यक्त होण्याची संधी मिळते. अचानक एखादी गोष्ट मिळाल्यावर त्याचा कसा उपयोग करावा ते कळत नाही. तीच परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे अचकट विचकट बोलून सोशल मीडियावर लोक व्यक्त होताना दिसतात.
प्रेक्षकांकडे भरपूर पर्याय
गेली तेवीस वर्ष मी मनोरंजन क्षेत्रात काम करतोय. त्यामुळे लोक जेव्हा म्हणतात की आजचा प्रेक्षक बदलला आहे. त्यांच्यासाठी नवीन काहीतरी करावं लागेल. मला वाटतं आता प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आलेत. हवं ते बघण्याची मुभा प्रत्येकाला आहे. त्यामुळे घरांमध्ये टीव्हीच्या रिमोटवरून भांडण कमी झाली असतील. प्रेक्षकांची रुची आहे तशीच आहे. आता सगळं जग त्यांच्या एका बोटाच्या क्लिकवर आलं आहे. यातून, कलाकार म्हणून तू अजून मेहनत कर असा इशारा मला मिळतो.
अक्षय खन्ना त्याच्या निवडक सिनेमांमुळे चर्चेत राहतो. पण मध्येच दोन-तीन वर्ष तो गायब असतो. या काळात तो नक्की काय करतो, ब्रेकनंतर परत येणं कितपत कठीण असतं, अशा अनेक गोष्टींबाबत त्यानं आगामी ‘मॉम’ चित्रपटानिमित्त मटाशी गप्पा मारल्या. वेबसीरिजमुळे टीव्ही, सिनेइंडस्ट्री धास्तावली असली, तरी अक्षय मात्र त्यावर बेहद्द खूश आहे…
गेली दोन-तीन वर्ष अक्षय खन्ना सिनेमांतून दिसला नाही. वडिल विनोद खन्ना यांच्या निधनामुळेही तो अस्वस्थ असला, तरी त्यांच्याविषयी काही बोलायला तो तयार नाही. बाबांबद्दल बोलेन, पण आत्ता नाही. अजून त्यासाठी मी तयार नाही, असं अक्षय म्हणतो. सध्या तरुणाईची पसंती वेबसीरिजना मिळत असल्यानं टीव्ही आणि सिनेमावाल्यांपुढे नवं आव्हान आहे. स्वतः अक्षय मात्र वेबसीरिजचा चाहता आहे. ‘हल्ली मी रोज टीव्ही आणि वेबसीरिज आवडीने बघतो. वेबसीरीज बघण्याचं तर मला वेड लागलंय म्हणा ना. वेबसीरिज बघताना हे प्रकर्षाने जाणवतं, की जी गोष्ट सांगायची आहे ती कुठलीही काटछाट न करता इथे बिनधास्त केली जाते. प्रेक्षक म्हणून यावर समाधानी आहे. उगीच स्वतःच्या स्क्रिप्ट्स घेऊन दारोदार भटकण्याऐवजी तरुण-तरुणी इथे व्यक्त होतात. खूप भन्नाट आहे हे सगळं’, असं तो म्हणतो.
फक्त अभिनयच
अभिनायाव्यतिरिक्त अजून कुठलीच गोष्ट मला माहित नाही. ना मी कुठला वेगळा व्यवसाय करतो, ना मला कुठला छंद आहे. गेली अडीच वर्ष मला व्यक्त होता येत नव्हतं. एका कलाकारासाठी ही खूप वाईट गोष्ट आहे. माझी घुसमट झाली होती. सिनेइंडस्ट्री फक्त वर्तमानात जगते, तुमचा संघर्ष हा वैयक्तिक असतो. लोक त्याकाळात काय विचार करतात, कसे वागतात या फंदात मी पडलोच नाही. ऑडीशन्स दिल्या आणि काम मिळवली. त्यानंतर आत्ता परत जोमानं कामाला लागलो आहे.
मुस्कटदाबीमुळेच…
सिनेमा सोडून मी वेगळं काही केलं नाही. म्हणून त्याचा अनुभव जोडून मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलतो. अभिनेत्रींना कपड्यांमुळे सोशल मीडियावर जे टार्गेट केलं जातंय ते चुकीचं आहे. त्याला कारण आपला समाज आणि चुकीचे विचार हेच आहेत. आपल्या संविधानात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असून देखील आली नेहमीच मुस्कटदाबी होते. उदाहरणार्थ सिनेमात कुठली दृश्यं ठेवायची, भाषा कशी असावी याचा निर्णय सेन्सार बोर्ड घेतं. दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काय दाखवायचं यावर गदा आणली जाते. यामुळे सिनेमाचा मूळ उद्देश हरवताना दिसतो. घरात किती बोलावं, कसं बोलावं यावरही निर्बंध असतात. मग सोशल मीडियावर हवं तसं व्यक्त होण्याची संधी मिळते. अचानक एखादी गोष्ट मिळाल्यावर त्याचा कसा उपयोग करावा ते कळत नाही. तीच परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे अचकट विचकट बोलून सोशल मीडियावर लोक व्यक्त होताना दिसतात.
प्रेक्षकांकडे भरपूर पर्याय
गेली तेवीस वर्ष मी मनोरंजन क्षेत्रात काम करतोय. त्यामुळे लोक जेव्हा म्हणतात की आजचा प्रेक्षक बदलला आहे. त्यांच्यासाठी नवीन काहीतरी करावं लागेल. मला वाटतं आता प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आलेत. हवं ते बघण्याची मुभा प्रत्येकाला आहे. त्यामुळे घरांमध्ये टीव्हीच्या रिमोटवरून भांडण कमी झाली असतील. प्रेक्षकांची रुची आहे तशीच आहे. आता सगळं जग त्यांच्या एका बोटाच्या क्लिकवर आलं आहे. यातून, कलाकार म्हणून तू अजून मेहनत कर असा इशारा मला मिळतो.