मी बनणार राजा!
डोक्यावर झगमगता मुकूट आहे…अंगावर उंची वस्त्रं आहेत…सिंहासनावर बसून एखाद्या राज्याचा कारभार करतो आहे…हे सगळं करण्याची इच्छा आहे अभिनेता धनुषला. म्हणजे मोठ्या पडद्यावर एखाद्या राजाची किंवा राजपुत्राची भूमिका त्याला साकारायची आहे. आगामी ‘व्हीआयपी २’ निमित्त मटाशी गप्पा मारताना त्यानं ही इच्छा बोलून दाखवली…
विनय राऊळ, कॉलेज क्लब रिपोर्टर
‘कोलावरी डी’ या गाण्यामुळे चर्चेत आलेला आणि अनेक तामिळ, तेलुगू चित्रपट गाजवणारा धनुष आता ‘व्हीआयपी २’मधून येतोय. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याला पडद्यावर एखाद्या राजाची किंवा राजपुत्राची भूमिका साकारायची आहे. गेल्या काही वर्षांत सिनेमे करत-करत धनुषला आता पुरेसा आत्मविश्वास आला आहे. तो म्हणतो, की ‘सुरुवातीच्या काळात मला तितकासा आत्मविश्वास नव्हता. आता मात्र जे काही मी शिकलोय त्यातून मला खूप आत्मविश्वास आला आहे. माझ्या चित्रपट कारकिर्दीतली हीच ती वेळ असून लवकरच मी पडद्यावर राजा किंवा 'राजपुत्रा'ची भूमिका साकारेन.’
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबद्दल धनुष म्हणाला की, ‘हा चित्रपट आम्ही हिंदी, तामिळ, तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित करत आहोत. एकाच वेळी तिन्ही भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करायचा असून योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू. सेन्सॉरकडून चित्रपटांवर चालवल्या जात असलेल्या कात्रीबद्दल तो नाखूश आहे. ‘सेन्सॉर बोर्डाने सिनेमांतल्या अनेक दृश्यांवर कात्री चालवली आहे. इंडस्ट्रीने अशा महत्त्वपूर्ण वेळी एकमेकांना आधार द्यायला हवा. कारण चित्रपट करताना तो खूप मेहनतीने तयार केला जातो. सध्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता चित्रपट पाहणं खूप सोपं होऊन बसलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला लागते. अशा वेळी सेन्सॉरच्या भूमिका पटत नसेल तर सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहावं.’ पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी त्याला मान्य नाही. भाषा, शहर, देश यांपैकी कोणतीही गोष्ट कलेपेक्षा मोठी नसते. ती सर्वांसाठी समान असते, असं त्याला वाटतं.
मुक्त मुंबईकर
मुंबईकर नसूनही मुंबई शहराविषयी त्याला विशेष जिव्हाळा आहे. तो म्हणतो की, ‘जेव्हा-जेव्हा मी मुंबईत पाऊल ठेवतो, तेव्हा एक प्रकारची सकारात्मकता मला जाणवते. मुंबईकरांच्या आयुष्याविषयी मला नेहमीच खूप कुतूहल वाटत आलं आहे. मुंबईकर ज्या प्रकारे रोज सकाळी घराबाहेर पडतात ते पाहता असं वाटतं की मुंबईमध्ये लोकांचं जीवन किती छान, मुक्त आहे. मुंबईतला मान्सून मात्र मला अनुभवता आला नाही.’
००००
डोक्यावर झगमगता मुकूट आहे…अंगावर उंची वस्त्रं आहेत…सिंहासनावर बसून एखाद्या राज्याचा कारभार करतो आहे…हे सगळं करण्याची इच्छा आहे अभिनेता धनुषला. म्हणजे मोठ्या पडद्यावर एखाद्या राजाची किंवा राजपुत्राची भूमिका त्याला साकारायची आहे. आगामी ‘व्हीआयपी २’ निमित्त मटाशी गप्पा मारताना त्यानं ही इच्छा बोलून दाखवली…
विनय राऊळ, कॉलेज क्लब रिपोर्टर
‘कोलावरी डी’ या गाण्यामुळे चर्चेत आलेला आणि अनेक तामिळ, तेलुगू चित्रपट गाजवणारा धनुष आता ‘व्हीआयपी २’मधून येतोय. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याला पडद्यावर एखाद्या राजाची किंवा राजपुत्राची भूमिका साकारायची आहे. गेल्या काही वर्षांत सिनेमे करत-करत धनुषला आता पुरेसा आत्मविश्वास आला आहे. तो म्हणतो, की ‘सुरुवातीच्या काळात मला तितकासा आत्मविश्वास नव्हता. आता मात्र जे काही मी शिकलोय त्यातून मला खूप आत्मविश्वास आला आहे. माझ्या चित्रपट कारकिर्दीतली हीच ती वेळ असून लवकरच मी पडद्यावर राजा किंवा 'राजपुत्रा'ची भूमिका साकारेन.’
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबद्दल धनुष म्हणाला की, ‘हा चित्रपट आम्ही हिंदी, तामिळ, तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित करत आहोत. एकाच वेळी तिन्ही भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करायचा असून योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू. सेन्सॉरकडून चित्रपटांवर चालवल्या जात असलेल्या कात्रीबद्दल तो नाखूश आहे. ‘सेन्सॉर बोर्डाने सिनेमांतल्या अनेक दृश्यांवर कात्री चालवली आहे. इंडस्ट्रीने अशा महत्त्वपूर्ण वेळी एकमेकांना आधार द्यायला हवा. कारण चित्रपट करताना तो खूप मेहनतीने तयार केला जातो. सध्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता चित्रपट पाहणं खूप सोपं होऊन बसलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला लागते. अशा वेळी सेन्सॉरच्या भूमिका पटत नसेल तर सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहावं.’ पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी त्याला मान्य नाही. भाषा, शहर, देश यांपैकी कोणतीही गोष्ट कलेपेक्षा मोठी नसते. ती सर्वांसाठी समान असते, असं त्याला वाटतं.
मुक्त मुंबईकर
मुंबईकर नसूनही मुंबई शहराविषयी त्याला विशेष जिव्हाळा आहे. तो म्हणतो की, ‘जेव्हा-जेव्हा मी मुंबईत पाऊल ठेवतो, तेव्हा एक प्रकारची सकारात्मकता मला जाणवते. मुंबईकरांच्या आयुष्याविषयी मला नेहमीच खूप कुतूहल वाटत आलं आहे. मुंबईकर ज्या प्रकारे रोज सकाळी घराबाहेर पडतात ते पाहता असं वाटतं की मुंबईमध्ये लोकांचं जीवन किती छान, मुक्त आहे. मुंबईतला मान्सून मात्र मला अनुभवता आला नाही.’
००००