पूनम सिंग बिष्ट
‘टिंग्या’, ‘टपाल’सारख्या दर्जेदार कलाकृतींनंतरही मंगेश हाडवळेला मराठीतून फारशा ऑफर्स आल्या नाहीत. त्यामुळे तो हिंदीकडे वळला. आता तर तो संजय लीला भन्साळी यांच्यासोबत दोन सिनेमे करतोय…
निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या त्यांची भाची शार्मिन सेहगल हिच्या इंडस्ट्रीतल्या पदार्पणाच्या तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी सोपवलीय ‘टिंग्या’फेम मंगेश हाडवळेवर. त्यानिमितानं मंगेशनं त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल मुंटाशी काही गोष्टी शेअर केल्या. मराठीतून खास ऑफर्स न आल्यानं हिंदीकडे वळलो, असं तो म्हणतो.
‘टिंग्या’ला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर मंगेशनं ‘देख इंडियन सर्कस’ या हिंदी सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं. निर्माता आणि लेखक म्हणून ‘टपाल’ केला. या सगळ्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण, ‘टिंग्या’नंतर मराठीतून खास ऑफर्सच आल्या नाहीत. आता संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाउसमधून दोन सिनेमे मंगेशनं दिग्दर्शक म्हणून साईन केले आहेत. त्यातील पहिल्या सिनेमावर त्याचं काम सुरू झालं आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन मंगेशचंच असेल.
भन्साळी यांची भाची शार्मिन सेहगल तसंच अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी या दोघांचं पदार्पण असलेला हा सिनेमा असणार आहे. सिनेमाचं नावं अजून ठरलं नसलं तरी हा म्युझिकल रोमँटिक सिनेमा असेल. चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल, असं मंगेश सांगतो. हिंदीत काम केल्यामुळे मंगेशचं तिथलं वर्तुळ वाढत गेलं.
…आणि भन्साळी ‘हो’ म्हणाले
संजय सरांशी ओळख झाल्यानंतर ते आवर्जून त्यांच्या सेटवर मला बोलवायचे. बऱ्याच विषयांवर चर्चा व्हायच्या. त्यामुळे क्रिएटिव्ह माणूस म्हणून माझ्या सिनेमांची नाळ त्यांच्याशी जोडली गेली. गेल्या ऑक्टोबरमध्ये मी त्यांना कथा ऐकवली आणि त्यांना आवडली. ते लगेच म्हणाले, ‘काम सुरु करा.’ भन्साळींसोबत काम करताना दडपण येतं का, असं मला बरेच जण विचारतात. पण माणूस म्हणून ते मला खूप आदर देतात. माझ्यासाठी ते एक सिनेमाचं विद्यापीठच आहेत. बिग बजेट, मोठा सिनेमा असे काही ठोकताळे डोक्यात न ठेवता, माझी कथा प्रामाणिकपणे पडद्यावर आणण्याचा माझा प्रयत्न असेल. भन्साळींकडून क्रिएटिव्ह बर्डन मात्र कधी जाणवलं नाही.
शेती विसरलो नाही
हिंदी सिनेमात ओळखी वाढवून काम होतात आणि त्यासाठी लोक पार्ट्यांना जातात असं म्हणतात. पण मी अशा पार्ट्यांपासून लांबच राहणं पसंत करतो. मी जुन्नरचा राजुरी गावचा राहणारा. वर्षातले काही महिने गावी जाऊन शेती करणं पसंत करतो, असं तो म्हणतो.
‘टिंग्या’, ‘टपाल’सारख्या दर्जेदार कलाकृतींनंतरही मंगेश हाडवळेला मराठीतून फारशा ऑफर्स आल्या नाहीत. त्यामुळे तो हिंदीकडे वळला. आता तर तो संजय लीला भन्साळी यांच्यासोबत दोन सिनेमे करतोय…
निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या त्यांची भाची शार्मिन सेहगल हिच्या इंडस्ट्रीतल्या पदार्पणाच्या तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी सोपवलीय ‘टिंग्या’फेम मंगेश हाडवळेवर. त्यानिमितानं मंगेशनं त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल मुंटाशी काही गोष्टी शेअर केल्या. मराठीतून खास ऑफर्स न आल्यानं हिंदीकडे वळलो, असं तो म्हणतो.
‘टिंग्या’ला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर मंगेशनं ‘देख इंडियन सर्कस’ या हिंदी सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं. निर्माता आणि लेखक म्हणून ‘टपाल’ केला. या सगळ्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण, ‘टिंग्या’नंतर मराठीतून खास ऑफर्सच आल्या नाहीत. आता संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाउसमधून दोन सिनेमे मंगेशनं दिग्दर्शक म्हणून साईन केले आहेत. त्यातील पहिल्या सिनेमावर त्याचं काम सुरू झालं आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन मंगेशचंच असेल.
भन्साळी यांची भाची शार्मिन सेहगल तसंच अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी या दोघांचं पदार्पण असलेला हा सिनेमा असणार आहे. सिनेमाचं नावं अजून ठरलं नसलं तरी हा म्युझिकल रोमँटिक सिनेमा असेल. चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल, असं मंगेश सांगतो. हिंदीत काम केल्यामुळे मंगेशचं तिथलं वर्तुळ वाढत गेलं.
…आणि भन्साळी ‘हो’ म्हणाले
संजय सरांशी ओळख झाल्यानंतर ते आवर्जून त्यांच्या सेटवर मला बोलवायचे. बऱ्याच विषयांवर चर्चा व्हायच्या. त्यामुळे क्रिएटिव्ह माणूस म्हणून माझ्या सिनेमांची नाळ त्यांच्याशी जोडली गेली. गेल्या ऑक्टोबरमध्ये मी त्यांना कथा ऐकवली आणि त्यांना आवडली. ते लगेच म्हणाले, ‘काम सुरु करा.’ भन्साळींसोबत काम करताना दडपण येतं का, असं मला बरेच जण विचारतात. पण माणूस म्हणून ते मला खूप आदर देतात. माझ्यासाठी ते एक सिनेमाचं विद्यापीठच आहेत. बिग बजेट, मोठा सिनेमा असे काही ठोकताळे डोक्यात न ठेवता, माझी कथा प्रामाणिकपणे पडद्यावर आणण्याचा माझा प्रयत्न असेल. भन्साळींकडून क्रिएटिव्ह बर्डन मात्र कधी जाणवलं नाही.
शेती विसरलो नाही
हिंदी सिनेमात ओळखी वाढवून काम होतात आणि त्यासाठी लोक पार्ट्यांना जातात असं म्हणतात. पण मी अशा पार्ट्यांपासून लांबच राहणं पसंत करतो. मी जुन्नरचा राजुरी गावचा राहणारा. वर्षातले काही महिने गावी जाऊन शेती करणं पसंत करतो, असं तो म्हणतो.