अ‍ॅपशहर

'गेम ऑफ थ्रोन्स'पाहताना हिंसा जाणवत नाही का?अली फजलचा सवाल

मिर्झापूर २'च्या निमित्तानं हे अभिनेता अली फजलसोबत मारलेल्या गप्पा

Authored byशब्दुली कुलकर्णी | Edited byभाग्यश्री रसाळ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2020, 4:19 pm
'गेम ऑफ थ्रोन्स'सारख्या सीरिज आपल्याकडे उत्सुकतेनं पाहिल्या जातात, तेव्हा त्यात हिंसा जाणवत नाही. मग, आपल्याकडच्या ओटीटी आशयाबद्दल एवढी नकारात्मक चर्चा कशासाठी?'...हे म्हणणं आहे अभिनेता अली फजल याचं. आगामी 'मिर्झापूर २'च्या निमित्तानं त्याच्याशी झालेल्या गप्पा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अली फजल
अली फजल


शब्दुली कुलकर्णी

० गुड्डू पंडित हे नकारात्मक पात्र साकारताना त्याचा त्रास होत नाही का? त्या पात्रासाठी तयारी कशी केलीस?
- मी खलनायकी भूमिकेकडे 'हिरो' म्हणून पाहतो. त्यामुळे त्या नकारात्मकतेचा त्रास होण्याचा प्रश्नच नाही. तसंच ते पात्र वास्तवाचं दर्शन घडवतं. ते सादर करताना आव्हानं होती. पण, हळूहळू त्याला सरावलो.

० नेटकऱ्यांनी चालवलेल्या '#बायकॉट मिर्झापूर २'बद्दल तुझं मत काय आहे?
- ते मुद्दाम घडवून आणलं जात आहे. जेव्हा सीरिज प्रदर्शित होईल तेव्हा बघू. सीरिज नाही आवडली, तर एक बटण दाबून बंद करण्याचा पर्याय प्रेक्षकांकडे आहे.

० ओटीटीवर हिंसा दाखवली जाते ही प्रेक्षकांची तक्रार तुला मान्य आहे का?
- अजिबात नाही. 'गेम ऑफ थ्रोन्स'सारख्या सीरिज उत्सुकतेनं बघितल्या जातात. तेव्हा त्यात हिंसा जाणवत नाही. मग आपल्याकडच्या आशयाबद्दल एवढी नकारात्मक चर्चा करण्याचं काहीच कारण नाही. बरं, फक्त हिंसाच दाखवली जात आहे अशातला भाग नाही. इतर विषयांवरही सीरिज येत आहेत.

० 'बँड बाजा बारात'पासून 'मिर्झापूर२'पर्यंत ओटीटी विश्वात काय बदल झालेले अनुभवलेस?
- पूर्वी नवीन माध्यम म्हणून आशय आणण्याची स्पर्धा रंगली होती. पण, आता हे माध्यम अधिक जबाबदारीने हाताळलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या माध्यमाचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

० घराणेशाहीवरुन सुरू असलेल्या वादाबद्दल काय वाटतं?
- मेहनत घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो. तसंच एखाद्यामधली गुणवत्ता कुणीच दाबू शकत नाही. बाकी घराणेशाहीबाबत बोलायचं झालं, तर ती सगळ्याच क्षेत्रात आहे. फक्त आम्ही कलाकार प्रेक्षकांच्या जास्त जवळचे असतो, म्हणून आमच्याबद्दल बोललं जातं.

० सध्या अनेक कारणांमुळे बॉलिवूडमधलं वातावरण दूषित झालंय. त्याबद्दल तुझं मत काय आहे?
- हा एक टप्पा आहे. परिस्थिती बदलल्यावर वातावरण बदलेल. त्यापेक्षा करोनानामक मोठ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यापुढे सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत.

० रिचा चड्ढा अनेक मुद्द्यांवर व्यक्त होत असते. तुम्हा दोघांमध्ये त्यावरुन चर्चा होते का?
- हो, आमच्यात अनेक सामाजिक विषयांवर चर्चा होत असते. एकमेकांची मतं जाणून घेणं, आम्हा दोघांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. विचारांची आणि मतांची देवाणघेवाण झाली पाहिजे, या मताचे आम्ही दोघं आहोत.


० सहकलाकार म्हणून श्रिया की विक्रांत मेस्सी?

- दोघांपैकी एकाची निवड करणं कठीण आहे.

० हाऊस अरेस्ट की अरेंज्ड मॅरेज?

- हाऊस अरेस्ट

० रिचासोबत फिरायला जायचं आहे असं ठिकाण?

- नेदरलँड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज