मुंबई- 'देवमाणूस' या मालिकेने टीआरपीच्या अनेक रेकॉर्ड तोडले. 'देवमाणूस' लागल्यावर कित्येक प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलं होतं. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. किरण याने 'देवमाणूस' बनून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. सगळ्यांचा लाडका हा 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा दुसरा सीजन लवकरचं सुरू होणार आहे. 'बिग बॉस मराठी ३' पडतोय सलमानच्या 'बिग बॉस १५' वर भारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो 'देवमाणूस' या मालिकेचा दुसरा सीजन डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मालिकेच्या निर्मितीचं काम सुरू झालं असून दुसऱ्या सीजनची जोरदार तयारी सुरू आहे. सातारा येथे मालिकेचं चित्रीकरण होणार असून याचं निर्मिती संस्थेच्या आणखी एका मालिकेचं चित्रीकरणदेखील सातारा येथे सुरू आहे. लवकरच झी मराठीवरील 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 'देवमाणूस' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.
पहिल्या सीजनमध्ये डॉक्टर अजितकुमार देव गावातील साध्याभोळ्या लोकांना फसवून अनेक स्त्रियांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे खून करतो. शेवटी डिम्पल डॉक्टरचे पैसे घेऊन पळून जाते. तर डॉक्टर एका इस्पितळात बेशुद्ध अवस्थेत असतो. डॉक्टराचा मृत्यू न दाखवल्यामुळे या मालिकेचा पुढील भाग येणार याची कल्पना प्रेक्षकांना होती. त्यामुळेच आता दुसऱ्या सीजनमध्ये नक्की काय दाखवण्यात याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो 'देवमाणूस' या मालिकेचा दुसरा सीजन डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मालिकेच्या निर्मितीचं काम सुरू झालं असून दुसऱ्या सीजनची जोरदार तयारी सुरू आहे. सातारा येथे मालिकेचं चित्रीकरण होणार असून याचं निर्मिती संस्थेच्या आणखी एका मालिकेचं चित्रीकरणदेखील सातारा येथे सुरू आहे. लवकरच झी मराठीवरील 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 'देवमाणूस' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.
पहिल्या सीजनमध्ये डॉक्टर अजितकुमार देव गावातील साध्याभोळ्या लोकांना फसवून अनेक स्त्रियांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे खून करतो. शेवटी डिम्पल डॉक्टरचे पैसे घेऊन पळून जाते. तर डॉक्टर एका इस्पितळात बेशुद्ध अवस्थेत असतो. डॉक्टराचा मृत्यू न दाखवल्यामुळे या मालिकेचा पुढील भाग येणार याची कल्पना प्रेक्षकांना होती. त्यामुळेच आता दुसऱ्या सीजनमध्ये नक्की काय दाखवण्यात याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप