पीएम नरेंद्र मोदी
विवेक ओबेरॉय,झरीना वहाब,यतीन कार्येकर,मनोज जोशी
इब्राहीम अफगाण
Ibrahim.afghan@timesgroup.com
नायकाला महान दाखवण्याचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे दुसऱ्यांना तुच्छ दाखवायचे आणि दुसरे म्हणजे आपल्या नायकाला आहे त्याहून अधिक श्रेष्ठ! या चित्रपटात या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट एक उशिरा आलेला प्रचारपट आहे. मात्र त्याची परिणामकारकता पाहिल्यास मोदींच्या अजून दहा जागा वाढल्या असत्या, असे वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालेय जीवनापासून त्यांनी २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेईपर्यंतचा कालखंड यात आहे. शाळेत जाण्याआधी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा, इतरांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या आपल्या आईला घरी भांडी धुवू न देणारा, चहा विकता विकता मोठ्यांची 'नेहरूऐवजी सरदार पटेल पंतप्रधान असते तर चीनकडून पराभव झाला नसता' आदी 'चाय पे चर्चा' ऐकणारा, पुढे मोठा झाल्यावर सैनिक बनून देशासाठी काम करू इछिणारा, देशसेवेची सतत संधी शोधणारा आणि पुढे संघ परिवारात आल्यानंतर निरंतर यश मिळवत, आपल्या बुद्धीचातुर्याने सर्व संकट व परिस्थितीवर मात करणारा, अशा नरेंद्र मोदींचा आलेख त्यात आहे.
नरेंद्र मोदी यांना देशाने पुन्हा एकदा आधीपेक्षाही अधिक बहुमताने निवडून दिल्याच्या नंतर हा त्यांच्यावरचा चरित्रपट प्रदर्शित झाला आहे. काही काळ राजकीय कारणास्तव रखडला नसता तर त्याचे टाइमिंग बरोबर होते, असे मत हा चित्रपट पाहताना बनते. कारण त्याची मांडणी प्रचारपटाचीच आहे. त्याला त्या दृष्टीने विलंब झाला असला तरी मोदीभक्तांना तो अतीव आनंद देऊ शकणारा आहे, तुम्ही मोदी भक्त नसाल तर हा चित्रपट मार्केटिंगचा अभ्यास म्हणून पाहू शकता. निव्वळ चित्रपट म्हणून तो फारसा प्रभावी नाही. कारण सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली सोयीच्या घटना आणि सोयीची पात्रनिर्मिती केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात, जे विचारी मनाला पटत नाहीत.
नायकाचा आलेख उंचावण्यासाठी इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना खूपच क्षुल्लक बनवले आहे. ते म्हणजे देश विकतच बसले होते आणि मोदी यांनी सत्तेवर येण्याची त्यासाठी गरज होती, असा सगळा सूर आहे. आणि मनमोहन सिंह यांना तर ज्याला थोडे फार जगाचे (खरे) ज्ञान आहे त्यालाही चीड येईल इतके विदूषकी दाखवले आहे. नरेंद्र मोदी हे चरित्रनायक असल्याने त्यांचे गेल्या काही वर्षातील समाजमध्यमातून परिचित रूप विशाल स्वरूपात दाखवले आहे. त्यासाठी बिकावू पत्रकारापासून पाकिस्तानातील लष्कर आणि दहशतवाद्यांपर्यंत बालिश चित्रण करण्यात आले आहे. वाजपेयी, आडवाणी यांचेही चित्रण वरवरचे आणि दुर्लक्षित आहे.
विवेक ओबेरॉय यांच्या अभिनयाबद्दल मुद्दाम सांगण्यासारखे काही नाही. मोदींचा आवाजातील आणि व्यक्तिमत्वातील ठामपणा त्याच्याकडून निसटलेला आहे. केवळ चतुर, टाळ्या मिळवणाऱ्या (अब चौकीदार आ गया है, ना खाऊगा ना खाने दुंगा आदी) संवादांवर त्याची सगळी भिस्त आहे. एकच गोष्ट चांगली म्हणजे त्यांनी त्यांची बोलण्यात नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही. आईच्या भूमिकेत झरीना वहाब ठीक वाटते. रतन टाटा यांच्या थोडक्या भूमिकेत बोमन इराणी उठून दिसलेत. यतीन कार्येकर संघ प्रचारक म्हणून प्रभावी आहेत, मात्र मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत खूपच अवास्तव वाटतात.
निर्माते : सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित, आचार्य मनीष
कथा : संदीप सिंह
पटकथा : अनिरुद्ध चावला, विवेक ओबेरॉय
संवाद : हर्ष लिंबाचिया, अनिरुद्ध चावला, विवेक ओबेरॉय
संगीत : हितेश मोडक
छायाचित्रण : सुनीता राडिया
दिग्दर्शक : ओमंग कुमार
कलाकार : विवेक ओबेरॉय, झरीना वहाब, यतीन कार्येकर, मनोज जोशी
Ibrahim.afghan@timesgroup.com
नायकाला महान दाखवण्याचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे दुसऱ्यांना तुच्छ दाखवायचे आणि दुसरे म्हणजे आपल्या नायकाला आहे त्याहून अधिक श्रेष्ठ! या चित्रपटात या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट एक उशिरा आलेला प्रचारपट आहे. मात्र त्याची परिणामकारकता पाहिल्यास मोदींच्या अजून दहा जागा वाढल्या असत्या, असे वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालेय जीवनापासून त्यांनी २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेईपर्यंतचा कालखंड यात आहे. शाळेत जाण्याआधी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा, इतरांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या आपल्या आईला घरी भांडी धुवू न देणारा, चहा विकता विकता मोठ्यांची 'नेहरूऐवजी सरदार पटेल पंतप्रधान असते तर चीनकडून पराभव झाला नसता' आदी 'चाय पे चर्चा' ऐकणारा, पुढे मोठा झाल्यावर सैनिक बनून देशासाठी काम करू इछिणारा, देशसेवेची सतत संधी शोधणारा आणि पुढे संघ परिवारात आल्यानंतर निरंतर यश मिळवत, आपल्या बुद्धीचातुर्याने सर्व संकट व परिस्थितीवर मात करणारा, अशा नरेंद्र मोदींचा आलेख त्यात आहे.
नरेंद्र मोदी यांना देशाने पुन्हा एकदा आधीपेक्षाही अधिक बहुमताने निवडून दिल्याच्या नंतर हा त्यांच्यावरचा चरित्रपट प्रदर्शित झाला आहे. काही काळ राजकीय कारणास्तव रखडला नसता तर त्याचे टाइमिंग बरोबर होते, असे मत हा चित्रपट पाहताना बनते. कारण त्याची मांडणी प्रचारपटाचीच आहे. त्याला त्या दृष्टीने विलंब झाला असला तरी मोदीभक्तांना तो अतीव आनंद देऊ शकणारा आहे, तुम्ही मोदी भक्त नसाल तर हा चित्रपट मार्केटिंगचा अभ्यास म्हणून पाहू शकता. निव्वळ चित्रपट म्हणून तो फारसा प्रभावी नाही. कारण सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली सोयीच्या घटना आणि सोयीची पात्रनिर्मिती केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात, जे विचारी मनाला पटत नाहीत.
नायकाचा आलेख उंचावण्यासाठी इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना खूपच क्षुल्लक बनवले आहे. ते म्हणजे देश विकतच बसले होते आणि मोदी यांनी सत्तेवर येण्याची त्यासाठी गरज होती, असा सगळा सूर आहे. आणि मनमोहन सिंह यांना तर ज्याला थोडे फार जगाचे (खरे) ज्ञान आहे त्यालाही चीड येईल इतके विदूषकी दाखवले आहे. नरेंद्र मोदी हे चरित्रनायक असल्याने त्यांचे गेल्या काही वर्षातील समाजमध्यमातून परिचित रूप विशाल स्वरूपात दाखवले आहे. त्यासाठी बिकावू पत्रकारापासून पाकिस्तानातील लष्कर आणि दहशतवाद्यांपर्यंत बालिश चित्रण करण्यात आले आहे. वाजपेयी, आडवाणी यांचेही चित्रण वरवरचे आणि दुर्लक्षित आहे.
विवेक ओबेरॉय यांच्या अभिनयाबद्दल मुद्दाम सांगण्यासारखे काही नाही. मोदींचा आवाजातील आणि व्यक्तिमत्वातील ठामपणा त्याच्याकडून निसटलेला आहे. केवळ चतुर, टाळ्या मिळवणाऱ्या (अब चौकीदार आ गया है, ना खाऊगा ना खाने दुंगा आदी) संवादांवर त्याची सगळी भिस्त आहे. एकच गोष्ट चांगली म्हणजे त्यांनी त्यांची बोलण्यात नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही. आईच्या भूमिकेत झरीना वहाब ठीक वाटते. रतन टाटा यांच्या थोडक्या भूमिकेत बोमन इराणी उठून दिसलेत. यतीन कार्येकर संघ प्रचारक म्हणून प्रभावी आहेत, मात्र मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत खूपच अवास्तव वाटतात.
निर्माते : सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित, आचार्य मनीष
कथा : संदीप सिंह
पटकथा : अनिरुद्ध चावला, विवेक ओबेरॉय
संवाद : हर्ष लिंबाचिया, अनिरुद्ध चावला, विवेक ओबेरॉय
संगीत : हितेश मोडक
छायाचित्रण : सुनीता राडिया
दिग्दर्शक : ओमंग कुमार
कलाकार : विवेक ओबेरॉय, झरीना वहाब, यतीन कार्येकर, मनोज जोशी