शूर आम्ही सरदार
सयाजी शिंदे, संजय मोने, गणेश लोके, शांतनु मोघे, हर्षदा पाटील
Maharashtra Times | 20 Apr 2017, 11:38 pm
इब्राहीम अफगाण
ibrahim.afghan@timesgroup.com
चित्रपटाच्या शीर्षकावरून मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल हा चित्रपट असेल असे वाटत असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आदींवरील दोन-तीन भाषणांपलीकडे काही नाही. हा चित्रपट प्रत्यक्षात 'माझी बॅट माझे नियम' प्रमाणे चालणारा बोलपट आहे. दहशतवाद असो की पोलिस, मराठा इतिहास असो की विषारी दारू… या सगळ्याबरोबरच चित्रपट माध्यम याबद्दलही खूप वरवरची आणि भाबडी समजूत घेऊन केलेला हा बाळबोध प्रयत्न आहे.
काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला मेजर गणेश उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये भरती होतो. तेथे त्याची एसीपी झालेली मैत्रीण आणि गुंड झालेला केबलवाला मित्र हे त्याला खूप वर्षांनी भेटतात. ते अन्यायाविरुद्ध आणि दहशतवादाविरुद्ध लढतात, अशी ही कथा आहे.
सर्जिकल स्ट्राइक करायला काय लागतं? दहशतवाद्यांच्या म्होरक्यापुढे नाचणारी बाई, दारू, बरा होऊनही ड्युटीवर हजर न झालेला मेजर गणेश, त्याची मैत्रीण असलेली एसीपी आणि पकडीच्या सहाय्याने तारा तोडण्यासाठी केबलवाला मित्र. बस्स. शोले मध्ये गब्बरसिंगच्या अड्ड्यावर हल्ला करतानाही जास्तीची तयारी लागली असेल. असो. त्यांच्यात प्रेम जमण्यात आणि ते व्यक्त करण्याच्या संघर्षातच बराच वेळ निघून गेल्यामुळे शीर्षकाला जागून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी ते शेवटी हल्ला करण्याचे बोलतात.
हा चित्रपट पाहून शूटिंगबिटिंग करून पैशांचा चुराडा करण्याऐवजी ती मूळ स्क्रिप्ट रेकॉर्ड करून रेडिओवर ऐकवली असती तरी चालले असते. कारण कोणतीही माहिती आपल्याला दिसत नाही. ती कोण ना कोण एकमेकांना किंवा इतरांना सांगत असतात. उदा. मेजर गणेश आपल्याच युनिटला आपण मराठा रेजिमेंटचे आहोत हे सांगत असतो. डोक्याला मार लागल्याने घरचे जेवण अर्थात साबुदाण्याची खिचडी चालत नाही असे डॉक्टर सांगत असते. आपण कॉलेजमध्ये असताना किती मजा करायचो ते एकमेकांना सांगतात. त्यातील केबलवाला मित्र गुंड आहे, असे एकजण त्याच्या डॉक्टर प्रेयसीला सांगून जातो. काही वेळाने दुसरी बाई येऊन त्याच डॉक्टरला तोच माणूस आमच्यासाठी कसा सर्वेसर्वा आहे, असे सांगून जाते. त्यामुळे असे सांगत सांगत या बोलपटाची सांगता होते.
कोणताही चित्रपट असो, त्यात मेहनत आणि पैसा लागतोच. ऑस्ट्रेलियात राहून मराठी चित्रपटासाठी धडपडणाऱ्या या टीमला योग्य मार्गदर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ लाभले असते तर अभिमानास्पद कलाकृती त्यांच्या हाती पडू शकली असती. कारण टीमचा जिव्हाळा आणि खर्च यात कोणतीही कमतरता दिसत नाही.
ibrahim.afghan@timesgroup.com
चित्रपटाच्या शीर्षकावरून मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल हा चित्रपट असेल असे वाटत असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आदींवरील दोन-तीन भाषणांपलीकडे काही नाही. हा चित्रपट प्रत्यक्षात 'माझी बॅट माझे नियम' प्रमाणे चालणारा बोलपट आहे. दहशतवाद असो की पोलिस, मराठा इतिहास असो की विषारी दारू… या सगळ्याबरोबरच चित्रपट माध्यम याबद्दलही खूप वरवरची आणि भाबडी समजूत घेऊन केलेला हा बाळबोध प्रयत्न आहे.
काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला मेजर गणेश उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये भरती होतो. तेथे त्याची एसीपी झालेली मैत्रीण आणि गुंड झालेला केबलवाला मित्र हे त्याला खूप वर्षांनी भेटतात. ते अन्यायाविरुद्ध आणि दहशतवादाविरुद्ध लढतात, अशी ही कथा आहे.
सर्जिकल स्ट्राइक करायला काय लागतं? दहशतवाद्यांच्या म्होरक्यापुढे नाचणारी बाई, दारू, बरा होऊनही ड्युटीवर हजर न झालेला मेजर गणेश, त्याची मैत्रीण असलेली एसीपी आणि पकडीच्या सहाय्याने तारा तोडण्यासाठी केबलवाला मित्र. बस्स. शोले मध्ये गब्बरसिंगच्या अड्ड्यावर हल्ला करतानाही जास्तीची तयारी लागली असेल. असो. त्यांच्यात प्रेम जमण्यात आणि ते व्यक्त करण्याच्या संघर्षातच बराच वेळ निघून गेल्यामुळे शीर्षकाला जागून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी ते शेवटी हल्ला करण्याचे बोलतात.
हा चित्रपट पाहून शूटिंगबिटिंग करून पैशांचा चुराडा करण्याऐवजी ती मूळ स्क्रिप्ट रेकॉर्ड करून रेडिओवर ऐकवली असती तरी चालले असते. कारण कोणतीही माहिती आपल्याला दिसत नाही. ती कोण ना कोण एकमेकांना किंवा इतरांना सांगत असतात. उदा. मेजर गणेश आपल्याच युनिटला आपण मराठा रेजिमेंटचे आहोत हे सांगत असतो. डोक्याला मार लागल्याने घरचे जेवण अर्थात साबुदाण्याची खिचडी चालत नाही असे डॉक्टर सांगत असते. आपण कॉलेजमध्ये असताना किती मजा करायचो ते एकमेकांना सांगतात. त्यातील केबलवाला मित्र गुंड आहे, असे एकजण त्याच्या डॉक्टर प्रेयसीला सांगून जातो. काही वेळाने दुसरी बाई येऊन त्याच डॉक्टरला तोच माणूस आमच्यासाठी कसा सर्वेसर्वा आहे, असे सांगून जाते. त्यामुळे असे सांगत सांगत या बोलपटाची सांगता होते.
कोणताही चित्रपट असो, त्यात मेहनत आणि पैसा लागतोच. ऑस्ट्रेलियात राहून मराठी चित्रपटासाठी धडपडणाऱ्या या टीमला योग्य मार्गदर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ लाभले असते तर अभिमानास्पद कलाकृती त्यांच्या हाती पडू शकली असती. कारण टीमचा जिव्हाळा आणि खर्च यात कोणतीही कमतरता दिसत नाही.