मुंबई: महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशात अभिनेता रणबीर कपूर नुकताच करोनाच्या संक्रमणातून ठीक झाला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा रणबीरच्या करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त समोर आलं तेव्हा त्याचे चाहते काळजीत होते. मात्र आता रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पहिल्यांदा क्लिनिकला गेल्यावर रणबीर मीडियासमोर आला. त्यावेळचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच करोना झालेला रणबीर कपूर ठीक झाल्यानंतर क्लिनिकला पोहोचला होता. त्यावेळचे त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर एकदम फिट दिसत आहे. पण यावेळचा रणबीरचा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र नेटकरी सोशल मीडियावरून भडकलेले पाहायला मिळाले.
क्लिनिकच्या बाहेर पडल्यानंतर रणबीरनं दूरुनच तिथे असलेल्या फोटोग्राफर्सना पोझ दिली. रणबीरच्या याच व्हिडीओवर युझर्स राग व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स रणबीरला थोडं पुढे येऊन पोझ देण्यासाठी सांगताना दिसत आहे. त्यावर नेटकऱ्या फोटोग्राफर्सच्या बोलण्यावर राग व्यक्त केला आहे. 'थोडं पुढे... थोडं पुढे काय आहे. ११००० पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यानंतरही हे असं...' अशा कमेंट करत युझर्सनी आपला राग व्यक्त केला आहे.
रणबीर कपूर ठीक होतो न होतो तोच त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टला करोनाची लागण झाली आहे. सध्या ती घरीच क्वारंटाइन असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
क्लिनिकच्या बाहेर पडल्यानंतर रणबीरनं दूरुनच तिथे असलेल्या फोटोग्राफर्सना पोझ दिली. रणबीरच्या याच व्हिडीओवर युझर्स राग व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स रणबीरला थोडं पुढे येऊन पोझ देण्यासाठी सांगताना दिसत आहे. त्यावर नेटकऱ्या फोटोग्राफर्सच्या बोलण्यावर राग व्यक्त केला आहे. 'थोडं पुढे... थोडं पुढे काय आहे. ११००० पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यानंतरही हे असं...' अशा कमेंट करत युझर्सनी आपला राग व्यक्त केला आहे.
रणबीर कपूर ठीक होतो न होतो तोच त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टला करोनाची लागण झाली आहे. सध्या ती घरीच क्वारंटाइन असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.