अ‍ॅपशहर

Video: 'Tarak Mehta...' च्या 'बापूजी' अमित भट्टने गायलं गाणं, व्हिडिओ झाला व्हायरल

तारक मेहता का उल्टा चश्मा हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या शोमधील बापूजी म्हणजेच अभिनेता अमित भट्ट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Lipi 8 May 2021, 5:51 pm
मुंबई: देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. संपूर्ण देश सध्या संकटात आहे आणि या व्हायरसशी लढा देताना दिसत आहे. अशात अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची मदत करताना दिसत आहे. तर काही सेलिब्रेटी या व्हायरसच्या तणावापूर्ण वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमधील बापूजी म्हणजे अभिनेता अमित भट्ट यांचाही असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात ते गाण्यातून लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम taarak mehta ka ooltah chashmah bapu ji amit bhatt singing kishore kumar song
Video: 'Tarak Mehta...' च्या 'बापूजी' अमित भट्टने गायलं गाणं, व्हिडिओ झाला व्हायरल


Video- करोना काळात तुमच्या घरात असायलाच हव्यात 'या' गोष्टी

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमधील बापूजींची भूमिका साकारणारे अभिनेता अमित भट्ट यांचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते किशोर कुमार यांचं लोकप्रिय गाणं 'ये जीवन है इस जीवन का' गाताना दिसत आहेत. अमित भट्ट यांचा हा बिहाइंड द सीन व्हिडीओ सध्या देशात जी परिस्थिती आहे त्याची जाणीव करून देतो आणि हे गाणं या परिस्थितीलाच अनुसरून असल्याचं लक्षात येतं.

View this post on Instagram A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

अमित यांनी आपल्या या गाण्यातून लोकांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी लोकांनी अति उत्साहीत होऊन घराबाहेर जाणं टाळण्यास सांगितलं आहे. ते म्हणतात, 'अजूनही वेळ गेलेली नाही. ही परिस्थिती समजून घ्या. घरातून बाहेर पडू नका. कारण आयुष्यातला एक-एक क्षण महत्त्वाचा आहे. मागच्या १३ वर्षांपासून अमित भट्ट 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोचा भाग आहेत आणि त्यांच्या भूमिकेला बरीच लोकप्रियता मिळाली आहे.'

View this post on Instagram A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमध्ये बापूजी आणि जेठालाल यांच्यातील संवाद प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यामुळे अनेक वर्षांनंतरही या शोची लोकप्रियता अद्याप कायम आहे. लोकांच्या मनोरंजनासोबत त्यांना एक उत्तम सामाजिक संदेश देण्याचं काम हा शो करताना दिसतो.

महत्वाचे लेख