अ‍ॅपशहर

'मला लग्न करण्याची भीती वाटते कारण...' ब्रेकअपनंतर अध्ययन सुमन केलं मन मोकळं

मागच्या काही काळापासून अध्ययन सुमन त्याच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. टीव्ही अभिनेत्री मायरा मिश्रासोबत २ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते दोघंही वेगळे झाले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अध्ययननं यावर सविस्तर चर्चा केली.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला अपेक्षित यश अद्याप मिळालेलं नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड मायरा मिश्रासोबत ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिल्यानंतर अध्ययन चर्चेत आला होता. मायरासोबतच २ वर्षांचं नातं संपल्याचं अध्ययनने मान्य केलं होतं. त्यानंतर आता त्यानं लग्नाच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the real reason of breakup with maera mishra adhyayan suman share many things
'मला लग्न करण्याची भीती वाटते कारण...' ब्रेकअपनंतर अध्ययन सुमन केलं मन मोकळं


ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ब्रेकअपबद्दल बोलताना अध्ययन म्हणाला, '६ महिन्यांपूर्वीच आम्ही दोघंही वेगळे झालो होतो. मात्र त्यावर मी कधीच बोललो नाही. त्यावेळी मला या विषयावर बोलायचंच नव्हतं. जे काही झालं ते बंद दरवाजामागे झालं. हा खूप खासगी विषय असल्यानं यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. दोन व्यक्ती सोबत राहतात, नंतर वेगळे होतात. आयुष्यात कोणतीच गोष्ट कायमस्वरुपी नसते. तुम्हाला जन्म देणारे तुमचे आई-बाबा सुद्धा एक तुम्हाला सोडून निघून जातात. पण तुम्हाला यातून बाहेर यावं लागतं. मायरासोबत माझं नातं चांगलं होतं. मला आयुष्यात वाईट गोष्ट विसरून केवळ चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून जगायचं आहे.'
View this post on Instagram A post shared by TINKA SINGH (@adhyayansuman)


आपल्या जुन्या रिलेशनशिपबाबत बोलताना अध्ययन म्हणाला, 'मी खोट बोलणार नाही. एका मुलीवर माझं जीवापाड प्रेम होतं आणि ती मला सोडून गेली. त्यामुळे मी खूप खचलो होतो. त्यानंतर अनेक वर्ष मी रिलेशनशिपमध्ये नव्हतो. प्रेमावर माझा विश्वास नाही असं मी म्हणणार नाही. पण मला आता लग्न करण्याची भीती वाटते. कारण माझ्या बऱ्याच मित्रांचे घटस्फोट झाले आहेत. सर्व प्रेम फक्त सोशल मीडियावरच दिसत असतं. खऱ्या आयुष्यात त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे हे मी स्वतः पाहिलं आहे.'

अध्ययन पुढे म्हणाला, 'मला माझ्या आयुष्यात अशाप्रकारचं नातं नको आहे. हेच आयुष्य आहे आज मला वाटतंय की मला लग्न करण्याची भीती वाटते पण येत्या काही काळात मी लग्न सुद्धा करेन. माणसाचे विचार वेळेसोबत बदलत जातात. युवा पीढीला फक्त एकच सांगणं आहे, ब्रेकअप झालं म्हणून ड्रग्स घेणं, नशा करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं असं काहीही करू नका. याने काहीही साध्य होत नाही.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज