मुंबई:'मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...' असं म्हणत मराष्ट्रात सुरू झालेलं सत्तानाट्य कुठल्या दिशेला जाईल , याचा काही नेम नाही. राजकारणातलं धक्कातंत्र, सत्तानाट्य आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षंकांच्या भेटीला येणार आहे. 'मी पुन्हा येईन... नावाची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच शेअर करण्यता आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आता हेच सगळं वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणातील सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे याचं लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केलं आहे. या वेब सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दीप्ती क्षीरसागर अशी दमदार कलाकारांची फळी आहे.
पाहा ट्रेलर:
वेब सीरिजविषयी अरविंद जगताप सांगतात, 'बहुमतासाठी पक्षांची चाललेली केविलवाणी धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थानं कुठल्या थराला जातात याचं गमतीशीर चित्रण 'मी पुन्हा येईन' या कलाकृतीत केलं आहे. याचा वास्तवाशी संबंध नाही. कारण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. हा राजकीय धुळवडीचा रंग आहे. हे राजकीय व्यंग आहे. पण शेवटी विषय राजकारण आहे. कधी-कधी काही गोष्टी खऱ्या वाटतील, पण त्या खऱ्या नाहीत. राजकारणाचं काही खरं नाही, हे सांगणारी ही वेब सीरिज आहे.'
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आता हेच सगळं वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणातील सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे याचं लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केलं आहे. या वेब सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दीप्ती क्षीरसागर अशी दमदार कलाकारांची फळी आहे.
पाहा ट्रेलर:
वेब सीरिजविषयी अरविंद जगताप सांगतात, 'बहुमतासाठी पक्षांची चाललेली केविलवाणी धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थानं कुठल्या थराला जातात याचं गमतीशीर चित्रण 'मी पुन्हा येईन' या कलाकृतीत केलं आहे. याचा वास्तवाशी संबंध नाही. कारण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. हा राजकीय धुळवडीचा रंग आहे. हे राजकीय व्यंग आहे. पण शेवटी विषय राजकारण आहे. कधी-कधी काही गोष्टी खऱ्या वाटतील, पण त्या खऱ्या नाहीत. राजकारणाचं काही खरं नाही, हे सांगणारी ही वेब सीरिज आहे.'