अ‍ॅपशहर

कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री? 'मी पुन्हा येईन'मध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता शिगेला

Mi Punha Yein Web Series: वेब विश्वात सध्या नवनव्या विषयांवर वेब सीरिज प्रदर्शित केल्या जात आहेत. ‘महाराष्ट्रातील राजकारण’ हा विषय अनेक सिनेमा-वेब सीरिजमध्ये हाताळला गेला आहे. आता यावरच आधारीत ‘मी पुन्हा येईन’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Authored byजान्हवी भाटकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2022, 3:53 pm
मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळापासून असे काही राजकीय नाट्य घडत आहे, ज्याची कहाणी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही आहे. राज्यातील सरकार बदलले, नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली इ. अशा विविध घटना या काळात घडल्या आहेत. या सर्वादरम्यान प्लॅनेट मराठीवरील 'मी पुन्हा येईन' या वेब सीरिजची विशेष चर्चा सुरू आहे. या सीरिजच्या नावापासून ते त्यातील डायलॉग्जपर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा झाली. दरम्यान आता या सीरिजबाबत सोशल मीडियावर विशेष चर्चा होतेय कारण'मी पुन्हा येईन'चे अंतिम दोन एपिसोड्स शुक्रवारी प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mi Punha Yein


पळून गेलेले ४ अपक्ष आमदार परत रिसॉर्टवर कसे येतात? अपक्ष आमदारांनी सत्तेचा पाठिंबा काढल्यावर तपास यंत्रणेचा बेमालूमपणे वापर होतोय का? पोलिसांवरील दबावतंत्र वापरले जातेय का? अधिकाऱ्यांचा राजकारण्यांकडून वापर केला जातोय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या १२ ऑगस्टला प्रेक्षकांना मिळणार आहेत. मुख्य बाब म्हणजे वेबसीरिजच्या शेवटच्या दोन भागात कोण सत्तास्थापन करणार, नक्की दिवटे की मुरकुटे? याचेही उत्तर मिळणार आहे.

हे वाचा-रोहमनसोबत पार्टी करताना दिसली सुष्मिता, लोकांनी विचारले प्रश्न

‘प्लॅनेट मराठी’ चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, 'प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता लवकरच शेवटचे दोन महाएपिसोड्स प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. राजकारणावर भाष्य करणारी ही एक व्यंगात्मक वेबसीरिज आहे. राजकारणातील सध्याची घडामोड पाहता प्रेक्षकांना वेबसीरिज एक वेगळा विचार करायला भाग पाडणार हे नक्कीच. शेवटच्या दोन महाएपिसोड्समध्ये नक्की कोण मुख्यमंत्री होणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.'

या सीरिजमधील दृश्यांचा संबंध सध्या घडत असणाऱ्या राजकीय घटनांशी देखील जोडण्यात आला. मात्र वेब सीरिजचे दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी सीरिज प्रदर्शित होण्याआधीच स्पष्टीकरण दिले होते की, या सीरिजचा सध्या घडत असणाऱ्या राजकीय घटनांशी काही संबंध नाही.

View this post on Instagram A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

हे वाचा-रिंकू राजगुरूनं भावाबरोबर साजरं केलं रक्षाबंधन, दोघांचे Photo पाहून चाहते खूश

अभिनेता भारत गणेशपुरेची एक जुनी पोस्टही या निमित्ताने व्हायरल होत आहे. या वेब सीरिजमध्ये 'सम्राट वाकडे' ही भूमिका साकारत आहे. याआधीही भारतने सीरिजविषयी विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. वेब सीरिजचं प्रमोशनही जोरदार झालं. भारत एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'अरे आम्ही स्वत:हून आलो, मले आणायची गरज नाही पडली. भारत गणेशपुरे As सम्राट वाकड.'. तुम्ही प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहू शकता.

View this post on Instagram A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

अरविंद यांच्या माहितीनुसार ही सीरिज सध्याच्या राजकीय घडामोडींवर आधारीत नसून गेल्यावर्षीच बनवण्यात आली आहे.'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
लेखकाबद्दल
जान्हवी भाटकर
जान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख