पुणे
‘कित्ती उकडतंय ना, स्मार्ट फोनवर बघ ना किती तापमान आहे ते… अरे बापरे मार्चमध्येच ३९... आता पुढचे दोन महिने कसे जाणार... छ्या वैताग आहे राव. अंगाची काहिली होतीये नुसती, असं वाटतंय, कुठेतरी लांब जावं दोन महिने थंड हवेच्या ठिकाणी...’
असे संवाद सातत्याने कानी पडत आहेत. शहरात पारा नवे उच्चांक गाठू लागल्यानंतर सर्वच जण अस्वस्थ आहेत. त्यातच यंदाचा उन्हाळा कडक असेल आणि या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा (कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंशाने अधिक असेल, तर त्याला उष्णतेची लाट म्हटले जाते) अधिक प्रमाणात निर्माण होतील आणि त्या अधिक काळ टिकतीलही असा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तविला आहे. त्याची झलकच आपण अनुभवत आहोत.
खरेतर एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सर्वात कडक उन्हाळा असतो. या काळात पुण्यातही तापमान चाळीशी ओलांडते. मात्र, यंदा मार्चच्या अखेरच्या आठवड्यातच पुण्याचे कमाल तापमान चाळीशीपार गेले होते. पाऱ्याने गेल्या दहा वर्षांतला नवा उच्चांक गाठला होता. शहराचे महत्त्वाचे उपनगर असलेल्या लोहगावमध्ये तर पारा ४१. ५ अंशांवर पोहोचला होता.
याचबरोबर शहराच्या विविध भागांत गेल्या काही वर्षांपासून तापमानात विविधता आढळून येत आहे. शहराच्या विविध उपनगरांतील तापमानात अगदी दोन ते पाच अंशांपर्यंतचाही फरक आढळून येतो आहे. सध्या पुण्यात बिल्डिंगना काचेच्या भिंती उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्याचे हवामान आणि भौगोलिक रचना लक्षात घेता अशा बिल्डिंग पर्यावरणासाठी हानिकारक ठरतात. काचेची भिंत उभारल्याने हवा खेळती राहात नाही. त्यामुळे संबंधित मजल्यावरील अंतर्गत तापमानात वाढ होते. परिणामी तेथे कायमस्वरूपी एअर कंडिशनिंग करावे लागते. यामुळे विजेचा अपव्यय होतो. चारही बाजूस काचेच्या भिंती असलेल्या इमारतींमधून होणाऱ्या प्रकाश परिवर्तनामुळे परिसरातील तापमानातही वाढ होते.
अशा प्रकारच्या इमारतींची संख्या अधिक असल्यास त्यातून संबंधित परिसरातील हवामानाचे चक्र बदलण्याचीही शक्यता असते. बराच वेळ उन्हात पार्क केलेल्या कारमध्ये बसल्यावर जसे एकदम भट्टीत गेल्यासारखे वाटते, तशीच अवस्था काचेच्या भिंती असलेल्या बिल्डिंग असलेल्या परिसरात निर्माण होत आहे.
काचेची भिंत उभारल्याने हवा खेळती राहात नाही. त्यामुळे संबंधित मजल्यावरील अंतर्गत तापमानात वाढ होते. परिणामी तेथे कायमस्वरूपी एअर कंडिशनिंग करावे लागते.
त्यातच गेल्या दोन तीन वर्षात शहरात सिमेंट कॉँक्रिटचे रस्ते करण्याचे पेव फुटले आहे. त्यामुळेही स्थानिक पातळीवर तापमानवाढीला चालना मिळत आहे. कॉँक्रिटच्या रस्त्यांमुळे जमिनीत पावसाचे पाणीही मुरत नाही. त्यामुळे असे रस्ते असलेल्या परिसरात जरा अधिक उकाडा जाणवत राहतो.
वाढते प्रदूषण, काँक्रिटीकरण, घनदाट लोकवस्ती आणि भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी अशी ‘उष्णतेची बेटे’ तयार झाली असून, तेथील तापमान इतर भागांच्या तुलनेत २ ते ४ अंश अधिक असते. घनदाट झाडी, जुने बंगले-इमारती व पुरेशी मोकळी जागा असलेल्या भागातील तापमान २ ते ४ अंशांनी कमी असल्याचेही आढळून येत आहे.
ही समस्या गंभीर रूप धारण करत असून, त्यावर उपाययोजना न केल्यास भविष्यात ती अधिकच उग्र होण्याची भीती आहे. धूर ओकणारी वाहने आणि गरम हवा सोडणारे एसी प्लांट यांमुळेही एखाद्या भागात ग्रीन हाऊस इफेक्ट साधला जातो व त्यामुळेच त्या भागातील तापमान इतर भागांपेक्षा जास्त जाणवते, असे हवामानतज्ज्ञ सांगतात. आर्किटेक्चर क्षेत्रातील तज्ज्ञही स्थानिक पर्यावरणाला आणि परंपरांना अनुकूल असे हरित बांधकाम करण्याची शिफारस करत आहेत. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे, अशी केवळ तक्रार करून उपयोगाची नाही. तर प्रत्येकाने झाडे लावण्यासाठी तसेच पर्याय उपाययोजनांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘कित्ती उकडतंय ना, स्मार्ट फोनवर बघ ना किती तापमान आहे ते… अरे बापरे मार्चमध्येच ३९... आता पुढचे दोन महिने कसे जाणार... छ्या वैताग आहे राव. अंगाची काहिली होतीये नुसती, असं वाटतंय, कुठेतरी लांब जावं दोन महिने थंड हवेच्या ठिकाणी...’
असे संवाद सातत्याने कानी पडत आहेत. शहरात पारा नवे उच्चांक गाठू लागल्यानंतर सर्वच जण अस्वस्थ आहेत. त्यातच यंदाचा उन्हाळा कडक असेल आणि या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा (कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंशाने अधिक असेल, तर त्याला उष्णतेची लाट म्हटले जाते) अधिक प्रमाणात निर्माण होतील आणि त्या अधिक काळ टिकतीलही असा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तविला आहे. त्याची झलकच आपण अनुभवत आहोत.
खरेतर एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सर्वात कडक उन्हाळा असतो. या काळात पुण्यातही तापमान चाळीशी ओलांडते. मात्र, यंदा मार्चच्या अखेरच्या आठवड्यातच पुण्याचे कमाल तापमान चाळीशीपार गेले होते. पाऱ्याने गेल्या दहा वर्षांतला नवा उच्चांक गाठला होता. शहराचे महत्त्वाचे उपनगर असलेल्या लोहगावमध्ये तर पारा ४१. ५ अंशांवर पोहोचला होता.
याचबरोबर शहराच्या विविध भागांत गेल्या काही वर्षांपासून तापमानात विविधता आढळून येत आहे. शहराच्या विविध उपनगरांतील तापमानात अगदी दोन ते पाच अंशांपर्यंतचाही फरक आढळून येतो आहे. सध्या पुण्यात बिल्डिंगना काचेच्या भिंती उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्याचे हवामान आणि भौगोलिक रचना लक्षात घेता अशा बिल्डिंग पर्यावरणासाठी हानिकारक ठरतात. काचेची भिंत उभारल्याने हवा खेळती राहात नाही. त्यामुळे संबंधित मजल्यावरील अंतर्गत तापमानात वाढ होते. परिणामी तेथे कायमस्वरूपी एअर कंडिशनिंग करावे लागते. यामुळे विजेचा अपव्यय होतो. चारही बाजूस काचेच्या भिंती असलेल्या इमारतींमधून होणाऱ्या प्रकाश परिवर्तनामुळे परिसरातील तापमानातही वाढ होते.
अशा प्रकारच्या इमारतींची संख्या अधिक असल्यास त्यातून संबंधित परिसरातील हवामानाचे चक्र बदलण्याचीही शक्यता असते. बराच वेळ उन्हात पार्क केलेल्या कारमध्ये बसल्यावर जसे एकदम भट्टीत गेल्यासारखे वाटते, तशीच अवस्था काचेच्या भिंती असलेल्या बिल्डिंग असलेल्या परिसरात निर्माण होत आहे.
काचेची भिंत उभारल्याने हवा खेळती राहात नाही. त्यामुळे संबंधित मजल्यावरील अंतर्गत तापमानात वाढ होते. परिणामी तेथे कायमस्वरूपी एअर कंडिशनिंग करावे लागते.
त्यातच गेल्या दोन तीन वर्षात शहरात सिमेंट कॉँक्रिटचे रस्ते करण्याचे पेव फुटले आहे. त्यामुळेही स्थानिक पातळीवर तापमानवाढीला चालना मिळत आहे. कॉँक्रिटच्या रस्त्यांमुळे जमिनीत पावसाचे पाणीही मुरत नाही. त्यामुळे असे रस्ते असलेल्या परिसरात जरा अधिक उकाडा जाणवत राहतो.
वाढते प्रदूषण, काँक्रिटीकरण, घनदाट लोकवस्ती आणि भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी अशी ‘उष्णतेची बेटे’ तयार झाली असून, तेथील तापमान इतर भागांच्या तुलनेत २ ते ४ अंश अधिक असते. घनदाट झाडी, जुने बंगले-इमारती व पुरेशी मोकळी जागा असलेल्या भागातील तापमान २ ते ४ अंशांनी कमी असल्याचेही आढळून येत आहे.
ही समस्या गंभीर रूप धारण करत असून, त्यावर उपाययोजना न केल्यास भविष्यात ती अधिकच उग्र होण्याची भीती आहे. धूर ओकणारी वाहने आणि गरम हवा सोडणारे एसी प्लांट यांमुळेही एखाद्या भागात ग्रीन हाऊस इफेक्ट साधला जातो व त्यामुळेच त्या भागातील तापमान इतर भागांपेक्षा जास्त जाणवते, असे हवामानतज्ज्ञ सांगतात. आर्किटेक्चर क्षेत्रातील तज्ज्ञही स्थानिक पर्यावरणाला आणि परंपरांना अनुकूल असे हरित बांधकाम करण्याची शिफारस करत आहेत. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे, अशी केवळ तक्रार करून उपयोगाची नाही. तर प्रत्येकाने झाडे लावण्यासाठी तसेच पर्याय उपाययोजनांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.