मुंबई टाइम्स टीम
सोशल नेटवर्किंग म्हणजे टाइमपास करण्याचा, सगळ्यांशी जोडलेलं राहण्याचा एक उत्तम पर्याय असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. उलट सोशल मीडियामुळे एकटेपणाची भावना वाढत चाललीय असं एका अभ्यासातून दिसून आलंय.
कुणीतरी तुमचा फोटो क्रॉप करून डीपी ठेवतं अशावेळी तुमच्या मनात एकटेपणाची भावना दाटून येते का? किंवा आपली कुणालाच काही काळजी नाही, इतर लोक आपण नसतानाही छान मजा करत असतात याबद्दल कधीतरी तुम्हाला वाईट वाटलं आहे का? याचं उत्तर हो असेल तर सोशल मीडियामुळेच तुम्हाला एकटेपणा वाटू लागलाय असं म्हणता येऊ शकतं.
पेनिन्सुलामधल्या पिट्सबर्ग विद्यापीठात याबाबत नुकताच अभ्यास करण्यात आला. या विद्यापीठामध्ये १९ ते ३२ वर्षांच्या इंटरनेट युजर्सच्या अॅक्टिव्हीटींवर लक्ष ठेऊन एक अहवाल सादर केला गेला. त्यामध्ये त्यांनी फेसबुक, युट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, पीनट्रेस्ट, गुगल प्लस, स्नॅपचॅट, रेडइट, टंबलर, व्हिन आणि लिंक्डइन या ११ वेबसाइट्सचा अभ्यास केला. त्यामध्ये असं दिसून आलं की अनेकजण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी सोशल नेटवर्किंगवर शेअर करत असतात. मात्र त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या वर्तुळामध्ये असणाऱ्या व्हर्च्युअल फ्रेंड्सना, आपण यांच्यासारखं काहीच करत नाही, किंवा आपल्या मित्रांची संख्या कमी आहे यासारख्या भावना निर्माण होतात. जे लोकं एका आठवड्यामध्ये ५८पेक्षा जास्त वेळा सोशल नेटवर्किंग साइट पाहतात त्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना तीन पटींनी जास्त असते असं या अभ्यासात म्हटलं आहे.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे भेटणं, बोलणं यासारख्या गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सोशल नेटवर्किंगमुळे या गोष्टी इतर लोकांपर्यंत, म्हणजे खूप जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्याशी तुलना करण्याचं प्रमाण वाढलंय. म्हणून अनेकांना, आपल्यापेक्षा इतरांच्या मित्र-मैत्रिणींची संख्या जास्त आहेत, ते जास्त मजा करतात, जास्त सोशल आहेत अशी मतं तयार होऊन एक प्रकारचा मानसिक ताण येतो. मात्र लाइक, कमेन्टच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचे अपडेट्स आपल्याला आवडताहेत असं दाखवत आपण ठीक असल्याचं सांगण्याची युजर्सना सवय लागते असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
सोशल नेटवर्किंग म्हणजे टाइमपास करण्याचा, सगळ्यांशी जोडलेलं राहण्याचा एक उत्तम पर्याय असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. उलट सोशल मीडियामुळे एकटेपणाची भावना वाढत चाललीय असं एका अभ्यासातून दिसून आलंय.
कुणीतरी तुमचा फोटो क्रॉप करून डीपी ठेवतं अशावेळी तुमच्या मनात एकटेपणाची भावना दाटून येते का? किंवा आपली कुणालाच काही काळजी नाही, इतर लोक आपण नसतानाही छान मजा करत असतात याबद्दल कधीतरी तुम्हाला वाईट वाटलं आहे का? याचं उत्तर हो असेल तर सोशल मीडियामुळेच तुम्हाला एकटेपणा वाटू लागलाय असं म्हणता येऊ शकतं.
पेनिन्सुलामधल्या पिट्सबर्ग विद्यापीठात याबाबत नुकताच अभ्यास करण्यात आला. या विद्यापीठामध्ये १९ ते ३२ वर्षांच्या इंटरनेट युजर्सच्या अॅक्टिव्हीटींवर लक्ष ठेऊन एक अहवाल सादर केला गेला. त्यामध्ये त्यांनी फेसबुक, युट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, पीनट्रेस्ट, गुगल प्लस, स्नॅपचॅट, रेडइट, टंबलर, व्हिन आणि लिंक्डइन या ११ वेबसाइट्सचा अभ्यास केला. त्यामध्ये असं दिसून आलं की अनेकजण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी सोशल नेटवर्किंगवर शेअर करत असतात. मात्र त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या वर्तुळामध्ये असणाऱ्या व्हर्च्युअल फ्रेंड्सना, आपण यांच्यासारखं काहीच करत नाही, किंवा आपल्या मित्रांची संख्या कमी आहे यासारख्या भावना निर्माण होतात. जे लोकं एका आठवड्यामध्ये ५८पेक्षा जास्त वेळा सोशल नेटवर्किंग साइट पाहतात त्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना तीन पटींनी जास्त असते असं या अभ्यासात म्हटलं आहे.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे भेटणं, बोलणं यासारख्या गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सोशल नेटवर्किंगमुळे या गोष्टी इतर लोकांपर्यंत, म्हणजे खूप जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्याशी तुलना करण्याचं प्रमाण वाढलंय. म्हणून अनेकांना, आपल्यापेक्षा इतरांच्या मित्र-मैत्रिणींची संख्या जास्त आहेत, ते जास्त मजा करतात, जास्त सोशल आहेत अशी मतं तयार होऊन एक प्रकारचा मानसिक ताण येतो. मात्र लाइक, कमेन्टच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचे अपडेट्स आपल्याला आवडताहेत असं दाखवत आपण ठीक असल्याचं सांगण्याची युजर्सना सवय लागते असंही या अभ्यासात म्हटलं आहे.